शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

लष्कराने अवघ्या ९ मिनिटात पादचारी पूलाचे टाकले गर्डर, भारत माता की जय च्या घोषणांनी दुमदुमले आंबिवली स्थानक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 19:46 IST

मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकात कसाराच्या दिशेने भारतीय लष्कराच्या मदतीने पादचारी पूल बांधण्यात येत असून गुरुवारी गर्डर टाकण्याचे काम भारतीय लष्कराच्या जवानांनी अवघ्या ९ मिनिटात पूर्ण करत भारत माता की जय अशा घोषणा देत काम पूर्ण झाल्याचे सूचित केले.

डोंबिवली - मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकात कसाराच्या दिशेने भारतीय लष्कराच्या मदतीने पादचारी पूल बांधण्यात येत असून गुरुवारी गर्डर टाकण्याचे काम भारतीय लष्कराच्या जवानांनी अवघ्या ९ मिनिटात पूर्ण करत भारत माता की जय अशा घोषणा देत काम पूर्ण झाल्याचे सूचित केले. ३१ जानेवारी महिन्याच्या अखेरीस हा पादचारी पूल हा प्रवाशांना उपलब्ध करुन देण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. भारतीय लष्कराचे कौशल्य बघून प्रवाशांनीही जवानांना मनोमन सलामी दिली.सकाळी ९.३० ते दुपारी ३ वाजता रेल्वेने कल्याण ते आसनगाव मेगाब्लॉक जाहीर केला होता. त्यानूसार रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी वगार्ने प्रथम ओव्हर हेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित करत ती खाली घेतली त्यानंतर सकाळी पावणे अकरा वाजता जवानांनी क्रेनच्या मदतीने गर्डर बसविण्याचे काम सुरू केले. केवळ अवघ्या नऊ मिनिटात रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाला जोडण्यात आले. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनानेअन्य तांत्रिक कामांना सुरुवात केली. हा पादचारी पूल कसारा दिशेला बांधण्यात येत असून त्याची लांबी सुमारे १८.२९ मीटर असून रुंदी ५ मीटर आहे.काम झाल्यावर दुपारी तीन वाजता कल्याण ते आसनगाव लोकल पूर्वरत सुरू करण्यात आल्या. एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकाचा सर्वे करण्यात आला होता. याच काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एल्फिस्टन, करीरोड, आंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पूल भारतीय लष्काराचे जवान बांधणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या धर्तीवर भारतीय लष्कराच्या जवानांनी आंबिवली रेल्वे स्थानकात नव्याने उभारण्यात येणा-या पादचारी पुलाच्या प्रत्यक्षात कामाला २० नोव्हेंबर पासून सुरवात केली होती. त्यासाठी लष्कराचे ३९ अधिक जवान काम करत असल्याचे सांगण्यात आले.या पादचारी पुलाच्या कामासाठी आंबिवली रेल्वे स्थानकातील मोडकळीस आलेले शौचालय तोडण्यात आले होते, ते पुन्हा बांधणार का?असा सवाल प्रवाशांनी प्रशासनाला केला असून प्रवासी संघटना त्याचा पाठपुरावा करत असल्याचे सांगण्यात आले. या कामाकरीता लष्कराला रेल्वे अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी कर्मचारी वर्ग मदत करत आहेत. नवीन पादचारी पूल ५० टन वजनाचा क्षमतेचा बनणार असून पुलावर गर्दी टाळण्यासाठी दोन्ही बाजूला उतरणे आणि चढण्यासाठी पाय-या बांधण्यात येणार आहेत.मिशन पूर्ण रेल्वे स्थानकातील गर्डर बसविण्याचे काम पूर्ण होताच भारतीय लष्कराच्या जवानांनी भारत माता की जयच्या घोषणा देत मिशन पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला. कल्याण ते आसनगाव मार्गावर रेल्वे ने मेगाब्लॉक जाहीर केल्याने, कल्याण ते टिटवाळा केडीएमटी बस सेवा सोडल्या होत्या. त्यासाठी केडीएमटी महाव्यस्थापक देविदास टेकाळे यांनी श्याम पष्टे, संदीप भोसले समवेत दहा अधिका-यांसह चालक-वाहक अशी रचना लावली होती. त्यानूसार तीन पर्यंत कल्याण ते टिटवाळा या दरम्यान सुमारे ५० फे-यांमधून तीन हजार प्रवाशांनी लाभ घेतल्याचेही सांगण्यात आले. ब्लॉक घेणार असल्याचे रेल्वेने आधीच जाहिर केले होते त्यामुळे कसारा, खर्डी, तसेच आसनगाव मार्गावरील बहुतांशी प्रवाशांनी पहिल्या सत्रातच कल्याण-मुंबईच्या दिशेने प्रवास करत होणारी अडचण टाळली. तसेच दुपारी रेल्वेसह लष्करानेही काम वेळेत केल्याने मेगाब्लॉक संपला, त्यामुळे संध्याकाळी परतणा-या प्रवाशांची गैरसोय टळली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेthaneठाणेMumbaiमुंबई