शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

लष्कराने अवघ्या ९ मिनिटात पादचारी पूलाचे टाकले गर्डर, भारत माता की जय च्या घोषणांनी दुमदुमले आंबिवली स्थानक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 19:46 IST

मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकात कसाराच्या दिशेने भारतीय लष्कराच्या मदतीने पादचारी पूल बांधण्यात येत असून गुरुवारी गर्डर टाकण्याचे काम भारतीय लष्कराच्या जवानांनी अवघ्या ९ मिनिटात पूर्ण करत भारत माता की जय अशा घोषणा देत काम पूर्ण झाल्याचे सूचित केले.

डोंबिवली - मध्य रेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकात कसाराच्या दिशेने भारतीय लष्कराच्या मदतीने पादचारी पूल बांधण्यात येत असून गुरुवारी गर्डर टाकण्याचे काम भारतीय लष्कराच्या जवानांनी अवघ्या ९ मिनिटात पूर्ण करत भारत माता की जय अशा घोषणा देत काम पूर्ण झाल्याचे सूचित केले. ३१ जानेवारी महिन्याच्या अखेरीस हा पादचारी पूल हा प्रवाशांना उपलब्ध करुन देण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. भारतीय लष्कराचे कौशल्य बघून प्रवाशांनीही जवानांना मनोमन सलामी दिली.सकाळी ९.३० ते दुपारी ३ वाजता रेल्वेने कल्याण ते आसनगाव मेगाब्लॉक जाहीर केला होता. त्यानूसार रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी वगार्ने प्रथम ओव्हर हेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित करत ती खाली घेतली त्यानंतर सकाळी पावणे अकरा वाजता जवानांनी क्रेनच्या मदतीने गर्डर बसविण्याचे काम सुरू केले. केवळ अवघ्या नऊ मिनिटात रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाला जोडण्यात आले. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनानेअन्य तांत्रिक कामांना सुरुवात केली. हा पादचारी पूल कसारा दिशेला बांधण्यात येत असून त्याची लांबी सुमारे १८.२९ मीटर असून रुंदी ५ मीटर आहे.काम झाल्यावर दुपारी तीन वाजता कल्याण ते आसनगाव लोकल पूर्वरत सुरू करण्यात आल्या. एल्फिस्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकाचा सर्वे करण्यात आला होता. याच काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एल्फिस्टन, करीरोड, आंबिवली रेल्वे स्थानकातील पादचारी पूल भारतीय लष्काराचे जवान बांधणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. या धर्तीवर भारतीय लष्कराच्या जवानांनी आंबिवली रेल्वे स्थानकात नव्याने उभारण्यात येणा-या पादचारी पुलाच्या प्रत्यक्षात कामाला २० नोव्हेंबर पासून सुरवात केली होती. त्यासाठी लष्कराचे ३९ अधिक जवान काम करत असल्याचे सांगण्यात आले.या पादचारी पुलाच्या कामासाठी आंबिवली रेल्वे स्थानकातील मोडकळीस आलेले शौचालय तोडण्यात आले होते, ते पुन्हा बांधणार का?असा सवाल प्रवाशांनी प्रशासनाला केला असून प्रवासी संघटना त्याचा पाठपुरावा करत असल्याचे सांगण्यात आले. या कामाकरीता लष्कराला रेल्वे अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी कर्मचारी वर्ग मदत करत आहेत. नवीन पादचारी पूल ५० टन वजनाचा क्षमतेचा बनणार असून पुलावर गर्दी टाळण्यासाठी दोन्ही बाजूला उतरणे आणि चढण्यासाठी पाय-या बांधण्यात येणार आहेत.मिशन पूर्ण रेल्वे स्थानकातील गर्डर बसविण्याचे काम पूर्ण होताच भारतीय लष्कराच्या जवानांनी भारत माता की जयच्या घोषणा देत मिशन पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला. कल्याण ते आसनगाव मार्गावर रेल्वे ने मेगाब्लॉक जाहीर केल्याने, कल्याण ते टिटवाळा केडीएमटी बस सेवा सोडल्या होत्या. त्यासाठी केडीएमटी महाव्यस्थापक देविदास टेकाळे यांनी श्याम पष्टे, संदीप भोसले समवेत दहा अधिका-यांसह चालक-वाहक अशी रचना लावली होती. त्यानूसार तीन पर्यंत कल्याण ते टिटवाळा या दरम्यान सुमारे ५० फे-यांमधून तीन हजार प्रवाशांनी लाभ घेतल्याचेही सांगण्यात आले. ब्लॉक घेणार असल्याचे रेल्वेने आधीच जाहिर केले होते त्यामुळे कसारा, खर्डी, तसेच आसनगाव मार्गावरील बहुतांशी प्रवाशांनी पहिल्या सत्रातच कल्याण-मुंबईच्या दिशेने प्रवास करत होणारी अडचण टाळली. तसेच दुपारी रेल्वेसह लष्करानेही काम वेळेत केल्याने मेगाब्लॉक संपला, त्यामुळे संध्याकाळी परतणा-या प्रवाशांची गैरसोय टळली.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानIndian Railwayभारतीय रेल्वेcentral railwayमध्य रेल्वेthaneठाणेMumbaiमुंबई