शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामप्रकरणी सेना नगरसेवकांचा संताप; कारवाईचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 23:56 IST

२०० खोल्यांच्या चाळी, आठ मजली इमारत राहिली उभी

कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात डोंबिवली पश्चिमेतील सरकारी जमिनींवर २०० खोल्यांच्या चाळींचे बांधकाम झाले आहे. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच एका आठ मजली बेकायदा इमारतीवर कारवाई करण्याकडे प्रशासनाकडून चालढकल केली जात आहे, असा मुद्दा शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत उपस्थित केला.म्हात्रे म्हणाले, ‘आचारसंहितेच्या काळात २०० खोल्यांच्या चाळींचे बेकायदा बांधकाम झाले आहे. याच चाळींना २६, २७ जुलै आणि ४ आॅगस्टला आलेल्या पुराचा फटका बसला. महापालिकाही या प्रकाराला जबाबदार आहे. अधिकाऱ्यांचे अभय असल्यानेच खाडीकिनारी चाळी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करा. चाळींतील २०० खोल्या आणि आठ मजली इमारत उभी राहिल्याबाबत प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.’ते पुढे म्हणाले, ‘बेकायदा चाळी व इमारतींमधील घरे नागरिकांना कमी किमतीत विकली जातात. त्यामुळे त्यात नागरिकांची फसवणूक होते. यंदा अशाच नागरिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. एक तर या बेकायदा चाळी व इमारतींवर हातोडा चालवावा, अन्यथा पुरात बाधित झालेल्या नागरिकांना इमारतींमधील घरे द्यावीत, याचा प्रशासनाने विचार करावा.’सभेला बेकायदा बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुनील जोशी उपस्थित नव्हते. त्यामुळे प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते यांनी संबंधित प्रभाग अधिकाºयांकडून याविषयीचा सविस्तर अहवाल मागवला आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करून त्याचा अहवाल पुढील सभेत सादर केला जाईल, असे आश्वासन दिले. दुसरीकडे या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाºयांविरोधात कारवाई करण्याचे आदेश सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिले आहेत.टाउनशिपच्या जागेवरही बेकायदा बांधकामेकल्याण-डोंबिवली महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्याने स्मार्ट सिटीच्या धर्तीवर सापर्डे, उंबर्डे, वाडेघर या परिसरांत महापालिका कोरियन कंपनीच्या गुंतवणुकीच्या आधारे ७०० हेक्टरवर विकास परियोजना (टाउनशिप) उभारणार आहे. त्याचा इरादा सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मात्र, योजनेच्या प्रस्तावित जागेवरही चाळी उभारल्या जात आहेत. प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे, असा मुद्दा स्थायी समिती सदस्य जयवंत भोईर यांनी उपस्थित केला. यासंदर्भात नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे व प्रभाग अधिकाºयांनी लक्ष घालून कारवाई करावी, अशा सूचना सभापतींनी दिल्या.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना