शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

इराण्यांच्या उपद्रवामुळे लष्कराला पाचारण? पोलिसांवर हल्ले केल्याचा पूर्वेतिहास असल्याने घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 04:13 IST

आंबिवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात इराणी टोळीचा उपद्रव असून या टोळीतील लोकांनी अनेकदा पोलिसांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे आंबिवलीतील वाढती वस्ती व इराणी टोळीचा उपद्रव याचा विचार करून येथील रेल्वे पूल उभारणी लष्कराकडे सोपवल्याची चर्चा आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : आंबिवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात इराणी टोळीचा उपद्रव असून या टोळीतील लोकांनी अनेकदा पोलिसांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे आंबिवलीतील वाढती वस्ती व इराणी टोळीचा उपद्रव याचा विचार करून येथील रेल्वे पूल उभारणी लष्कराकडे सोपवल्याची चर्चा आहे.मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली या ठिकाणी असलेला पादचारी पूल जीर्ण झालेला असल्याने त्याठिकाणी लष्कराच्या मदतीने ९० दिवसांत पादचारी पूल उभारला जाणार आहे. एल्फिन्स्टन रोड व करी रोडचा रेल्वे पूल लष्कराच्या मदतीने बांधण्याचे कारण हे तेथील गर्दी व त्या परिसरातील कार्यालयांमुळे पुलाची तातडीने असलेली गरज यामुळे समजू शकतो. मात्र, आंबिवलीचा पूल लष्कराच्या मदतीने बांधण्याचे कारण हे जवळील इराणी टोळीकडून या कामाला होणारा विरोध किंवा बांधकाम साहित्याची चोरी होण्याची संभाव्य भीती हे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील या भागात बेकायदा बांधकामे आहेत. स्टेशन परिसराला लागून इराण्यांची वस्ती आहे. या टोळीकडून अनेकदा कारवाईदरम्यान पोलिसांवर हल्ले झालेले आहे. दुचाकी आणि सोनसाखळी चोरीप्रकरणी त्यांच्या विरोधात पोलिसांनी ‘मोक्का’खाली कारवाई केली आहे.दरम्यान, लष्कराच्यावतीने गुरुवारपासून आंबिवली स्टेशन परिसरात पूल उभारणीकरिता मोजमाप करण्यास सुरुवात झाली. आंबिवली स्थानकातून दररोज प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या १० हजारांच्या घरात आहे. आंबिवली स्थानकातील पादचारी पूल कल्याण दिशेला आहे. कसारा दिशेला पादचारी पूलच नाही. कसाºयाच्या दिशेला पादचारी पूल असावा, अशी प्रवासीवर्गाची मागणी आहे. नव्या पुलामुळे काहींच्या जागा बाधित होणार असल्याने पुलाला विरोध होत आहे. जुना पूल २० वर्षांपूर्वी बांधला आहे.आंबिवली स्थानकात पादचारी पूल बांधण्याची मागणी होती. शहाड, टिटवाळा रेल्वे स्थानकांतही पादचारी पुलाची गरज आहे. पुलाच्या कामाला कोणाचा विरोध नाही. - नरेंद्र पवार,भाजपा आमदार, कल्याण पश्चिमगाळेगाव, मोहने, अटाळी या ठिकाणी लोकवस्ती वाढत असल्याने आंबिवली स्थानकातून प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या वाढत आहे. कल्याण-शीळ रस्त्यावरील देसाई खाडीपूल पडला, तेव्हा सैन्याची मदत घेऊन खोणी-तळोजा या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम तातडीने पूर्ण केले होते.- राजेंद्र देवळेकर, महापौर, कल्याण-डोंबिवलीआंबिवलीचा पूल लष्कराकडे देण्याचे कारण त्याठिकाणी असलेली इराणी वस्ती हे असू शकते. त्यांच्या टोळीचा उपद्रव आहे. रेल्वे इंजिनीअर्सचे काम अत्यंत बकवास असते. रेल्वे टक्केवारीने पोखरली आहे.- मनोहर शेलार,प्रवासी महासंघाचे पदाधिकारी

टॅग्स :kalyanकल्याण