शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

इराण्यांच्या उपद्रवामुळे लष्कराला पाचारण? पोलिसांवर हल्ले केल्याचा पूर्वेतिहास असल्याने घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 04:13 IST

आंबिवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात इराणी टोळीचा उपद्रव असून या टोळीतील लोकांनी अनेकदा पोलिसांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे आंबिवलीतील वाढती वस्ती व इराणी टोळीचा उपद्रव याचा विचार करून येथील रेल्वे पूल उभारणी लष्कराकडे सोपवल्याची चर्चा आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : आंबिवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात इराणी टोळीचा उपद्रव असून या टोळीतील लोकांनी अनेकदा पोलिसांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे आंबिवलीतील वाढती वस्ती व इराणी टोळीचा उपद्रव याचा विचार करून येथील रेल्वे पूल उभारणी लष्कराकडे सोपवल्याची चर्चा आहे.मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली या ठिकाणी असलेला पादचारी पूल जीर्ण झालेला असल्याने त्याठिकाणी लष्कराच्या मदतीने ९० दिवसांत पादचारी पूल उभारला जाणार आहे. एल्फिन्स्टन रोड व करी रोडचा रेल्वे पूल लष्कराच्या मदतीने बांधण्याचे कारण हे तेथील गर्दी व त्या परिसरातील कार्यालयांमुळे पुलाची तातडीने असलेली गरज यामुळे समजू शकतो. मात्र, आंबिवलीचा पूल लष्कराच्या मदतीने बांधण्याचे कारण हे जवळील इराणी टोळीकडून या कामाला होणारा विरोध किंवा बांधकाम साहित्याची चोरी होण्याची संभाव्य भीती हे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील या भागात बेकायदा बांधकामे आहेत. स्टेशन परिसराला लागून इराण्यांची वस्ती आहे. या टोळीकडून अनेकदा कारवाईदरम्यान पोलिसांवर हल्ले झालेले आहे. दुचाकी आणि सोनसाखळी चोरीप्रकरणी त्यांच्या विरोधात पोलिसांनी ‘मोक्का’खाली कारवाई केली आहे.दरम्यान, लष्कराच्यावतीने गुरुवारपासून आंबिवली स्टेशन परिसरात पूल उभारणीकरिता मोजमाप करण्यास सुरुवात झाली. आंबिवली स्थानकातून दररोज प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या १० हजारांच्या घरात आहे. आंबिवली स्थानकातील पादचारी पूल कल्याण दिशेला आहे. कसारा दिशेला पादचारी पूलच नाही. कसाºयाच्या दिशेला पादचारी पूल असावा, अशी प्रवासीवर्गाची मागणी आहे. नव्या पुलामुळे काहींच्या जागा बाधित होणार असल्याने पुलाला विरोध होत आहे. जुना पूल २० वर्षांपूर्वी बांधला आहे.आंबिवली स्थानकात पादचारी पूल बांधण्याची मागणी होती. शहाड, टिटवाळा रेल्वे स्थानकांतही पादचारी पुलाची गरज आहे. पुलाच्या कामाला कोणाचा विरोध नाही. - नरेंद्र पवार,भाजपा आमदार, कल्याण पश्चिमगाळेगाव, मोहने, अटाळी या ठिकाणी लोकवस्ती वाढत असल्याने आंबिवली स्थानकातून प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या वाढत आहे. कल्याण-शीळ रस्त्यावरील देसाई खाडीपूल पडला, तेव्हा सैन्याची मदत घेऊन खोणी-तळोजा या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम तातडीने पूर्ण केले होते.- राजेंद्र देवळेकर, महापौर, कल्याण-डोंबिवलीआंबिवलीचा पूल लष्कराकडे देण्याचे कारण त्याठिकाणी असलेली इराणी वस्ती हे असू शकते. त्यांच्या टोळीचा उपद्रव आहे. रेल्वे इंजिनीअर्सचे काम अत्यंत बकवास असते. रेल्वे टक्केवारीने पोखरली आहे.- मनोहर शेलार,प्रवासी महासंघाचे पदाधिकारी

टॅग्स :kalyanकल्याण