शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

इराण्यांच्या उपद्रवामुळे लष्कराला पाचारण? पोलिसांवर हल्ले केल्याचा पूर्वेतिहास असल्याने घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 04:13 IST

आंबिवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात इराणी टोळीचा उपद्रव असून या टोळीतील लोकांनी अनेकदा पोलिसांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे आंबिवलीतील वाढती वस्ती व इराणी टोळीचा उपद्रव याचा विचार करून येथील रेल्वे पूल उभारणी लष्कराकडे सोपवल्याची चर्चा आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : आंबिवली रेल्वे स्थानकाच्या परिसरात इराणी टोळीचा उपद्रव असून या टोळीतील लोकांनी अनेकदा पोलिसांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे आंबिवलीतील वाढती वस्ती व इराणी टोळीचा उपद्रव याचा विचार करून येथील रेल्वे पूल उभारणी लष्कराकडे सोपवल्याची चर्चा आहे.मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आंबिवली या ठिकाणी असलेला पादचारी पूल जीर्ण झालेला असल्याने त्याठिकाणी लष्कराच्या मदतीने ९० दिवसांत पादचारी पूल उभारला जाणार आहे. एल्फिन्स्टन रोड व करी रोडचा रेल्वे पूल लष्कराच्या मदतीने बांधण्याचे कारण हे तेथील गर्दी व त्या परिसरातील कार्यालयांमुळे पुलाची तातडीने असलेली गरज यामुळे समजू शकतो. मात्र, आंबिवलीचा पूल लष्कराच्या मदतीने बांधण्याचे कारण हे जवळील इराणी टोळीकडून या कामाला होणारा विरोध किंवा बांधकाम साहित्याची चोरी होण्याची संभाव्य भीती हे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील या भागात बेकायदा बांधकामे आहेत. स्टेशन परिसराला लागून इराण्यांची वस्ती आहे. या टोळीकडून अनेकदा कारवाईदरम्यान पोलिसांवर हल्ले झालेले आहे. दुचाकी आणि सोनसाखळी चोरीप्रकरणी त्यांच्या विरोधात पोलिसांनी ‘मोक्का’खाली कारवाई केली आहे.दरम्यान, लष्कराच्यावतीने गुरुवारपासून आंबिवली स्टेशन परिसरात पूल उभारणीकरिता मोजमाप करण्यास सुरुवात झाली. आंबिवली स्थानकातून दररोज प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या १० हजारांच्या घरात आहे. आंबिवली स्थानकातील पादचारी पूल कल्याण दिशेला आहे. कसारा दिशेला पादचारी पूलच नाही. कसाºयाच्या दिशेला पादचारी पूल असावा, अशी प्रवासीवर्गाची मागणी आहे. नव्या पुलामुळे काहींच्या जागा बाधित होणार असल्याने पुलाला विरोध होत आहे. जुना पूल २० वर्षांपूर्वी बांधला आहे.आंबिवली स्थानकात पादचारी पूल बांधण्याची मागणी होती. शहाड, टिटवाळा रेल्वे स्थानकांतही पादचारी पुलाची गरज आहे. पुलाच्या कामाला कोणाचा विरोध नाही. - नरेंद्र पवार,भाजपा आमदार, कल्याण पश्चिमगाळेगाव, मोहने, अटाळी या ठिकाणी लोकवस्ती वाढत असल्याने आंबिवली स्थानकातून प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या वाढत आहे. कल्याण-शीळ रस्त्यावरील देसाई खाडीपूल पडला, तेव्हा सैन्याची मदत घेऊन खोणी-तळोजा या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम तातडीने पूर्ण केले होते.- राजेंद्र देवळेकर, महापौर, कल्याण-डोंबिवलीआंबिवलीचा पूल लष्कराकडे देण्याचे कारण त्याठिकाणी असलेली इराणी वस्ती हे असू शकते. त्यांच्या टोळीचा उपद्रव आहे. रेल्वे इंजिनीअर्सचे काम अत्यंत बकवास असते. रेल्वे टक्केवारीने पोखरली आहे.- मनोहर शेलार,प्रवासी महासंघाचे पदाधिकारी

टॅग्स :kalyanकल्याण