शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काळातलावाचा डीपीआर, लोकग्राम पुलास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:36 IST

स्मार्ट सिटी संचालक मंडळ बैठक; स्टेशन परिसर विकासाचा विषय स्थगित

कल्याण : कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण स्टेशन परिसराच्या विकासकामासाठी आलेल्या निविदेचा विषय सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत तूर्तास स्थगित ठेवण्यात आला आहे. यावर, पुढील बैठकीत चर्चा होणार आहे. मात्र, कल्याण पूर्वेतील लोकग्राम पादचारी पुलाच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच कल्याण पश्चिमेतील काळातलावच्या सुशोभीकरणाच्या सविस्तर प्रकल्प अहवालास (डीपीआर) मंजुरी देण्यात आली आहे.कल्याण-डोंबिवलीतील पादचारी आणि रेल्वे उड्डाणपुलांची कामे विचारात घेतल्यास कल्याणमधील पत्रीपुलाचे काम सुरू आहे. ते मार्च २०२० मध्ये पूर्ण होणार आहे. डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद आहे. त्याच्या दुरुस्तीचे प्रकरण पुढे सरकलेले नाही. त्यात लोकग्राम पादचारी पुलाचीही भर पडली. कल्याण रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक सात ते लोकग्रामकडे जाणारा पादचारी पूल धोकादायक झाल्याने तो बंद करण्यात आला. या पुलाच्या पुनर्बांधणीचा मुद्दा रेल्वेकडे आहे. या पुलाचा खर्च कोणी करायचा, या मुद्द्यावर चर्चा झाली. मात्र, पादचारी पुलाची निकड पाहता आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता हा पूल स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचा विषय आज स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्यात आला होता. या पुलाच्या कामासाठी ३९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुलाच्या कामास आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पुलाचा खर्च रेल्वे आणि महापालिकेने किती करावा, याविषयी निर्णय झालेला नाही. त्यावर जो काही निर्णय घेतला जाईल, त्यानंतर त्याचा विचार केला जाईल. कल्याण पश्चिमेतील काळातलावाच्या सुशोभीकरणावर २००८ ते २०१२ कालावधीत १० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यापाठोपाठ या तलाव परिसरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात आले. आता नव्याने काळातलावाचा रिमेक करण्याचा सविस्तर अहवाल स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तयार केला आहे. हा सविस्तर अहवाल ५२ कोटी खर्चाचा आहे. मात्र, स्मार्ट सिटीच्या तलाव सुशोभीकरणाच्या यादीत तलावाच्या रिमेकवर २५ कोटींचा खर्च केला जाणार असल्याचे नमूद केले आहे. प्रकल्प अहवालास संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.प्रकल्पासाठी आलेल्या निविदेची रक्कम जास्तस्मार्ट सिटीअंतर्गत केल्या जाणाऱ्या कल्याण स्टेशन परिसर विकासाचे काम ३९४ कोटींचे आहे. त्यासाठी पहिल्या प्रयत्नात मागवलेल्या निविदेस प्रतिसाद मिळाला होता. मात्र, निविदाधारक कंपनीने ५१८ कोटींची निविदा सादर केली होती. प्रकल्पाच्या कामाची रक्कम आणि प्रत्यक्षात मिळालेली निविदा पाहता १०० कोटींची तफावत असल्याने ही निविदा रद्द केली. आता नव्याने निविदा मागविली आहे. त्यासाठी ५२२ कोटींची निविदा प्राप्त झालेली आहे.ही निविदा संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवली गेली असता कंत्राटदार कंपनीशी वाटाघाटी करून निविदेची रक्कम कमी करण्यावर भर दिला जावा. त्यानंतरच निविदा मंजूर करण्यावर विचार केला जावा, असे संचालक मंडळाचे म्हणणे होते. त्यामुळे हा विषय आधी वाटाघाटी केल्यावर पुढील बैठकीत मान्यतेसाठी ठेवला जाणार आहे.