शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

नगररचनाकाराच्या नियुक्तीने उल्हासनगर शहरविकासाला मिळणार चालना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 17:25 IST

धोकादायक इमारती व अवैध बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया यापूर्वी त्यांनी सुरू करून पालिकेला १० कोटींच्या उत्पन्न मिळून दिले होते. 

सदानंद नाईक उल्हासनगर : अखेर... महापालिकेच्या वादग्रस्त नगररचनाकार विभागाला ए. पी. गुडगुडे यांच्या रूपाने नगररचनाकार मिळाला असून, त्यांनी गुरुवारी नगररचनाकारपदाचा पदभार स्वीकारला आहे. धोकादायक इमारती व अवैध बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया यापूर्वी त्यांनी सुरू करून पालिकेला १० कोटींच्या उत्पन्न मिळून दिले होते. 

उल्हासनगर महापालिका नगररचनाकार नेहमी वादात राहिला असून, यापूर्वीचे बहुतांश नगररचनाकार कोणत्या ना कोणत्या वादात सापडले असून, अनेकवार गुन्हे दाखल होऊन जेलची हवा खावी लागली. तर गेल्या चार वर्षांपूर्वी पुणे येथे बैठकीला गेलेले तत्कालीन नगररचनाकार संजीव करपे बेपत्ता झाले. अद्यापही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. त्यांच्या कुटुंबाने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही त्यांचा अद्याप तपास लागला नाही. गेल्या वर्षी त्यांच्या सहीने बांधकाम परवान्याला मंजुरी मिळाल्याचा प्रकार उघड झाल्याने पुन्हा विभागाचा सावळागोंधळ उघड झाला होता. संजीव करपे यांच्या बेपत्ता झाल्याच्या प्रकरणानंतर येथे कोणताही नगररचनाकार येण्यास धजावत नव्हते. मध्यंतरी आलेले नगररचनाकारही वादात सापडले.

शहरातील धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रश्न लटकला असून, राज्य शासनाने काढलेले अवैध बांधकाम नियमित करण्याची प्रक्रियाही ठप्प पडली. यापूर्वी ए पी गुडगुडे नगररचनाकारपदी असताना बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. १०० पेक्षा जास्त बांधकामे नियमित होऊन पालिकेला १० कोटीच्या दंडात्मक कारवाईतून उत्पन्न मिळाले होते. तसेच दरमहा कोट्यवधी रुपयांचा महसूल पालिकेला मिळत होता. मात्र गेल्या ४ वर्षांपासून नगररचनाकार विभागापासून मिळणारे उत्पन्न ठप्प झाले. दरम्यान, भिवंडी महापालिकेचे नगररचनाकार प्रकाश देव यांच्याकडे महापालिकेचे प्रभारी नगररचनाकारपदाचा पदभार दिला होता. मात्र त्यांनी अपवाद सोडल्यास महापालिका कामकाजाकडे पाठ फिरविली होती. महापालिकेला कायमस्वरूपी नगररचनाकार द्या, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी शासनाकडे केली होती.  

शहर विकासासाठी सर्वांचे सहकार्य हवे- गुडगुडे 

शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिकांचे सहकार्य हवे. नवीन बांधकाम परवानगी, धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली काढणे, स्त्रॅक्चर अभियंत्याच्या परवान्याचे नूतनीकरण आदी अनेक कामे करावी लागणार आहे. विभागाचे काम अनेक दिवसांपासून ठप्प असल्याने त्याचाही निपटारा करावा लागणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर