शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आरटीईच्या १२ हजार शालेय जागांसाठी २७ हजार ३५३ हजार बालकांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:20 IST

२५ टक्के प्रवेश राखीव : जिल्ह्यातील ६७७ शाळांचा समावेश

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यातील गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आदी परिवारातील बालकांना उत्तम दर्जाचे शिक्षण देणाऱ्या त्यांच्या घराजवळील शाळेत २५ टक्के प्रवेश राखून ठेवले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ६७७ शाळांचा समावेश आहे. त्यातील १२ हजार ७४ शालेय प्रवेशासाठी २७ हजार ३५३ बालकांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत.शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली बालकांना त्यांच्या जवळच्या शाळेत शिकण्याचा हक्क मिळाला आहे. मात्र, शाळांकडून विविध शुल्काच्या माध्यमातून मोठमोठ्या रकमांची मागणी केली जाते. त्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम पालकांकडून पाठिंबा दिला जात आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांना प्राधान्याने या शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. त्यास आळा घालण्यासाठी या गरिबांच्या बालकांसाठी या मनमानी करणाऱ्या शाळांमध्ये आता एकूण प्रवेशाच्या २५ टक्के शालेय प्रवेश सक्तीने राखीव ठेवले जात आहेत. यानुसार जिल्ह्यातील ६७७ शाळांमध्ये पहिलीच्या वर्गासाठी ११ हजार ११४ व पूर्व प्राथमिकसाठी ९६० बालकांचे शालेय प्रवेश राखीव ठेवले आहेत.या १२ हजार ७४ शालेय प्रवेशासाठी यंदा पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. यासाठी तब्बल २७ हजार ३५३ अर्जांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित आठ हजार २७६ बालकांची नोंदणी अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. या प्राप्त अर्जांतून सद्य:स्थितीपर्यंत १९ हजार ७७ हजार अर्ज मान्य झाले आहेत. अपूर्ण अर्जांच्या पूर्ण नोंदणीसाठी प्रशासनाने जोरदार प्रयत्न करून ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केली आहे. या प्राप्त अर्जांतून लॉटरी सोडतीद्वारे बालकांचे प्रवेश संबंधित शाळेत करण्यात येणार आहेत. याद्वारे मिळणारे शालेय प्रवेश २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी राहणार आहेत.तालुका    शाळाअंबरनाथ -     २६७५भिवंडी मनपा -    २२७३भिवंडी ग्रा. -    ८६१कल्याण ग्रा. -    २२९९कल्याण डोंबिवली -    २७७९मीरा भाईंदर -     ३९५मुरबाड-     १०१नवी मुंबई-     ६४१०शहापूर-     ६५०ठाणे मनपा १ -     १४४७ठाणे मनपा २ -     ३५५०उल्हासनगर-     ९७७

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा