शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

एपीएमसी बरखास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:04 IST

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच भाजपा आमदार किसन कथोरे यांनी शिवसेना-राष्ट्रवादीला दणका देत बाजार समिती बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमला आहे

कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच भाजपा आमदार किसन कथोरे यांनी शिवसेना-राष्ट्रवादीला दणका देत बाजार समिती बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमला आहे. त्यांनी गुरुवारी पदभारही स्वीकारला. या राजकीय खेळीमुळे सभापतीपदाची निवडणूक रद्द झाली आणि त्या पदासाठी शह देणाऱ्यांना काटशह देण्यात आला.बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणल्याने त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतरही संचालक मंडळ सदस्यांनी घोडविंदे यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणला. घोडविंदे हे भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या विश्वासातील असल्याने त्यांनाच शह देण्याचा प्रयत्न झाल्याने त्यांनी वेगाने राजकीय हालचाली केल्या. संचालक मंडळाने काम करू दिले नाही, असा घोडविंदे यांचा आक्षेप होता; तर संचालक मंडळाने त्यांच्याविरोधात मनमानीचा आरोप केला होता. घोडविंदे यांनी केलेली विकासकामे संचालक मंडळाला मान्य नव्हती. त्यांनी बाजार समितीचे एकही काम मार्गी लावू दिले नाही, असे मुद्देही पुढे आले आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. बाजार समितीच्या संचालक मंडळात भाजपाचे नगरसेवक असलेल्या, जालिंदर पाटील यांना सोबत घेऊन शिवसेना-राष्ट्रवादीने सभापतीपदाची मोट बांधली. सभापतीपदाची निवडणूक आली की, दरवेळी संचालक मंडळावरील सदस्य हे परगावी निघून जातात. आताही सभापतीपदाची निवडणूक होणार असल्याने सेना-राष्ट्रवादीचे सदस्य केरळला गेले. तेथे फक्त घोडविंदे व दर्शना जाधव यांना नेण्यात आले नव्हते. समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीच्या आदल्या रात्री केरळला गेलेले सदस्य कल्याणमध्ये दाखल होणार होते. मात्र, बाजार समिती बरखास्त झाल्याची बातमी कळाल्याने ही मंडळी लवकर परतली.घोडविंदे म्हणाले, सदस्यांना केवळ आर्थिक हित जोपासायचे आहे. त्यांना विकासकामे नको आहेत. त्यामुळे त्यांच्या हिताच्या बाजूने राहणे मला शक्य नव्हते. शेतकरी व व्यापारी हिताच्या बाजूने मी होतो. मी सभापती झालो त्यात कथोरे, खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नरेंद्र पवार यांनी विश्वास दाखवला होता. बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आलेली असताना कथोरे यांनी तीन वेळा मुदतवाढ घेतली होती. पण संचालक मंडळाला कामच करायचे नव्हते. हेच यातून उघड होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादीचा डाव कथोरे यांनी उलथवून लावला आहे.समिती बरखास्त झाल्यावर तातडीने ठाण्याचे उपनिबंधक शहाजी पाटील यांची सरकारने समितीच्या प्रशासकपदी नियुक्ती केली आहे. ठाण्याचा कारभार पाहून बाजार समितीचा कारभार पाहण्याची अतिरिक्त जबाबदारी पाटील यांच्यावर सोपवली आहे. पाटील यांनी गुरुवारी सकाळी पदभार स्वीकारला.प्रशासक पाटील यांनी सांगितले, बाजार समितीने १४ कोटींचे कर्ज घेतले होते. त्यापैकी पाच कोटी ७५ लाखांची परतफेड केली आहे. उर्वरित सात कोटी ७५ लाख रुपये कर्जाची रक्कम फेडणे बाकी आहे. समिती कर्जाचे हप्ते वेळेवर भरू शकलेली नाही. त्यामुळे त्यांना मुदतवाढ देऊन संधी दिली. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे सरकारने प्रशासक म्हणून माझी नियुक्ती केली. उच्चतम दर्जाच्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न हे सहा कोटी रुपये आहे. हे उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न केले जातील. उत्पन्नवाढीच्या शक्यता तपासून त्याचे नियोजन करून ते नेमके किती वाढेल, याचे लक्ष्य ठरवले जाईल. ते गाठण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत. सगळ्यांचे सहकार्य घेऊनच उत्पन्न वाढवण्याचे काम करणार असल्याचा मानस पाटील यांनी व्यक्त केला आहे.