शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत कुणीही येवोत, खाबूगिरी थांबणार आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:37 IST

२५ मिनिटांचा प्रवास । मध्य मार्गावरून प्रवास करताना ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’

- प्रशांत माने ।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना, अंबरनाथ ते डोंबिवली रेल्वेस्थानकांतून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया ‘लोकमत आॅन द व्हील्स’ या उपक्रमांतर्गत ऐकायला मिळाल्या. सुरक्षा, व्यापार, पायाभूत-मूलभूत सुविधा व भ्रष्टाचार यासह विविध विषयांवर प्रवाशांनी दिलखुलास मते मांडली. यातून साधारणत: जनतेचा कल हा सक्षम पर्यायाकडे असल्याचे दिसून आले.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या अंबरनाथ ते डोंबिवली या साधारण २० ते २५ मिनिटांच्या प्रवासात लोकसभा निवडणुकीबाबत नागरिकांच्या मनात काय आहे, हे जाणून घेतले असता, काहींनी उघडपणे तर काहींनी ‘आॅफ द रेकॉर्ड’ बिनधास्त मते मांडली. एकीकडे विरोधी पक्षांकडून मोदींविरोधात जोरदार प्रचार सुरू असताना, काँग्रेसला ६० वर्षे सत्ता दिली; मग पुन्हा एकदा मोदींना संधी द्यायला काय हरकत आहे, असा एक मतप्रवाह प्रवासादरम्यान दिसून आला. दुसरीकडे, सत्तेवर कोणीही आले, तरी ते खिसे भरणारेच असणार, अशी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाष्य करणारी बोलकी प्रतिक्रियाही ऐकायला मिळाली. यंदाच्या निवडणुकीत मोदी यांच्याकडे पाहूनच मते दिली जातील. सक्षम पर्याय तेच आहेत. मोदी सरकार येण्याआधी बेरोजगारी नव्हती का? आता सर्वत्र आॅनलाइनचा गाजावाजा आहे. त्यामुळे त्यानुसार अपडेट राहायलाच हवे. जे राहत नाहीत, त्यांना फटका बसतो, अशी प्रतिक्रिया सुमित बालवानी याने दिली.

जीएसटी लागू झाल्याने छोटे उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. उपासमारीची वेळ आली आहे. स्वत:चा उद्योग सुरू करायलाही भांडवल राहिलेले नाही, याकडे अंबरनाथचे रहिवासी सैफ अली शेख यांनी लक्ष वेधले. जो येतो, तो केवळ आश्वासनेच देतो; पण त्यांची पूर्तता होताना दिसत नाही. तरुणांना नोकऱ्या नाहीत. सक्षम नेता असणे गरजेचे आहे. भूलथापा नकोत. जो काम करेल, त्याच उमेदवाराच्या पाठीशी मतदार उभे राहतील. पक्ष कोणता, हे पाहिले जाणार नाही, असे मत प्रकाश बागले यांनी व्यक्त केले. कल्याण स्थानकात लोकल बराच वेळ थांबते. त्यामुळे नियोजन बिघडते, असा स्थानिक मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. पोपट बनकर या ज्येष्ठ नागरिकाने लोकलमधील वाढत्या गर्दीकडे लक्ष वेधले. प्रवाशांना चांगली सेवा मिळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ६० वर्षांवरील व्यक्तींनाही ज्येष्ठांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करता यावा, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी सध्याची ६५ वर्षांची मर्यादा ६० वर आणावी, असाही मुद्दा त्यांनी मांडला. वाढलेल्या बेरोजगारीकडे लक्ष वेधताना नागरिकांचे स्थानिक प्रश्नही आहेत. त्याबाबतही निवडून येणाºया राजकीय पक्षाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. बाहेरचे लोंढे वाढत आहेत.

या निवडणुकीत उमेदवाराला पाहून मते दिली जातील, तर सक्षम नेतृत्व म्हणून मोदींनाच पसंती असल्याचे मत आशीष आणि श्वेता नंदनवार या जोडप्याने मांडले. सध्या जो काही प्रचार सुरू आहे, त्यात केवळ आरोप-प्रत्यारोप आहेत. राष्ट्रीय नेत्यांच्या भाषणातील त्याचत्याच मुद्द्यांनी अक्षरश: कंटाळा आला असून, यात स्थानिक मुद्द्यांना बगल दिली जात आहे. लोकलच्या फेºया वाढल्या पाहिजेत. त्यात लेडिज स्पेशल वाढवल्या पाहिजे. प्रवास सुखकर आणि सुरक्षित झाला पाहिजे, अशी मते काही महिला प्रवाशांनी व्यक्त केली.