शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

सत्तेत कुणीही येवोत, खाबूगिरी थांबणार आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:37 IST

२५ मिनिटांचा प्रवास । मध्य मार्गावरून प्रवास करताना ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’

- प्रशांत माने ।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना, अंबरनाथ ते डोंबिवली रेल्वेस्थानकांतून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया ‘लोकमत आॅन द व्हील्स’ या उपक्रमांतर्गत ऐकायला मिळाल्या. सुरक्षा, व्यापार, पायाभूत-मूलभूत सुविधा व भ्रष्टाचार यासह विविध विषयांवर प्रवाशांनी दिलखुलास मते मांडली. यातून साधारणत: जनतेचा कल हा सक्षम पर्यायाकडे असल्याचे दिसून आले.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या अंबरनाथ ते डोंबिवली या साधारण २० ते २५ मिनिटांच्या प्रवासात लोकसभा निवडणुकीबाबत नागरिकांच्या मनात काय आहे, हे जाणून घेतले असता, काहींनी उघडपणे तर काहींनी ‘आॅफ द रेकॉर्ड’ बिनधास्त मते मांडली. एकीकडे विरोधी पक्षांकडून मोदींविरोधात जोरदार प्रचार सुरू असताना, काँग्रेसला ६० वर्षे सत्ता दिली; मग पुन्हा एकदा मोदींना संधी द्यायला काय हरकत आहे, असा एक मतप्रवाह प्रवासादरम्यान दिसून आला. दुसरीकडे, सत्तेवर कोणीही आले, तरी ते खिसे भरणारेच असणार, अशी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाष्य करणारी बोलकी प्रतिक्रियाही ऐकायला मिळाली. यंदाच्या निवडणुकीत मोदी यांच्याकडे पाहूनच मते दिली जातील. सक्षम पर्याय तेच आहेत. मोदी सरकार येण्याआधी बेरोजगारी नव्हती का? आता सर्वत्र आॅनलाइनचा गाजावाजा आहे. त्यामुळे त्यानुसार अपडेट राहायलाच हवे. जे राहत नाहीत, त्यांना फटका बसतो, अशी प्रतिक्रिया सुमित बालवानी याने दिली.

जीएसटी लागू झाल्याने छोटे उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. उपासमारीची वेळ आली आहे. स्वत:चा उद्योग सुरू करायलाही भांडवल राहिलेले नाही, याकडे अंबरनाथचे रहिवासी सैफ अली शेख यांनी लक्ष वेधले. जो येतो, तो केवळ आश्वासनेच देतो; पण त्यांची पूर्तता होताना दिसत नाही. तरुणांना नोकऱ्या नाहीत. सक्षम नेता असणे गरजेचे आहे. भूलथापा नकोत. जो काम करेल, त्याच उमेदवाराच्या पाठीशी मतदार उभे राहतील. पक्ष कोणता, हे पाहिले जाणार नाही, असे मत प्रकाश बागले यांनी व्यक्त केले. कल्याण स्थानकात लोकल बराच वेळ थांबते. त्यामुळे नियोजन बिघडते, असा स्थानिक मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. पोपट बनकर या ज्येष्ठ नागरिकाने लोकलमधील वाढत्या गर्दीकडे लक्ष वेधले. प्रवाशांना चांगली सेवा मिळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ६० वर्षांवरील व्यक्तींनाही ज्येष्ठांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करता यावा, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी सध्याची ६५ वर्षांची मर्यादा ६० वर आणावी, असाही मुद्दा त्यांनी मांडला. वाढलेल्या बेरोजगारीकडे लक्ष वेधताना नागरिकांचे स्थानिक प्रश्नही आहेत. त्याबाबतही निवडून येणाºया राजकीय पक्षाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. बाहेरचे लोंढे वाढत आहेत.

या निवडणुकीत उमेदवाराला पाहून मते दिली जातील, तर सक्षम नेतृत्व म्हणून मोदींनाच पसंती असल्याचे मत आशीष आणि श्वेता नंदनवार या जोडप्याने मांडले. सध्या जो काही प्रचार सुरू आहे, त्यात केवळ आरोप-प्रत्यारोप आहेत. राष्ट्रीय नेत्यांच्या भाषणातील त्याचत्याच मुद्द्यांनी अक्षरश: कंटाळा आला असून, यात स्थानिक मुद्द्यांना बगल दिली जात आहे. लोकलच्या फेºया वाढल्या पाहिजेत. त्यात लेडिज स्पेशल वाढवल्या पाहिजे. प्रवास सुखकर आणि सुरक्षित झाला पाहिजे, अशी मते काही महिला प्रवाशांनी व्यक्त केली.