शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत कुणीही येवोत, खाबूगिरी थांबणार आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:37 IST

२५ मिनिटांचा प्रवास । मध्य मार्गावरून प्रवास करताना ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’

- प्रशांत माने ।लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना, अंबरनाथ ते डोंबिवली रेल्वेस्थानकांतून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया ‘लोकमत आॅन द व्हील्स’ या उपक्रमांतर्गत ऐकायला मिळाल्या. सुरक्षा, व्यापार, पायाभूत-मूलभूत सुविधा व भ्रष्टाचार यासह विविध विषयांवर प्रवाशांनी दिलखुलास मते मांडली. यातून साधारणत: जनतेचा कल हा सक्षम पर्यायाकडे असल्याचे दिसून आले.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या अंबरनाथ ते डोंबिवली या साधारण २० ते २५ मिनिटांच्या प्रवासात लोकसभा निवडणुकीबाबत नागरिकांच्या मनात काय आहे, हे जाणून घेतले असता, काहींनी उघडपणे तर काहींनी ‘आॅफ द रेकॉर्ड’ बिनधास्त मते मांडली. एकीकडे विरोधी पक्षांकडून मोदींविरोधात जोरदार प्रचार सुरू असताना, काँग्रेसला ६० वर्षे सत्ता दिली; मग पुन्हा एकदा मोदींना संधी द्यायला काय हरकत आहे, असा एक मतप्रवाह प्रवासादरम्यान दिसून आला. दुसरीकडे, सत्तेवर कोणीही आले, तरी ते खिसे भरणारेच असणार, अशी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाष्य करणारी बोलकी प्रतिक्रियाही ऐकायला मिळाली. यंदाच्या निवडणुकीत मोदी यांच्याकडे पाहूनच मते दिली जातील. सक्षम पर्याय तेच आहेत. मोदी सरकार येण्याआधी बेरोजगारी नव्हती का? आता सर्वत्र आॅनलाइनचा गाजावाजा आहे. त्यामुळे त्यानुसार अपडेट राहायलाच हवे. जे राहत नाहीत, त्यांना फटका बसतो, अशी प्रतिक्रिया सुमित बालवानी याने दिली.

जीएसटी लागू झाल्याने छोटे उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. उपासमारीची वेळ आली आहे. स्वत:चा उद्योग सुरू करायलाही भांडवल राहिलेले नाही, याकडे अंबरनाथचे रहिवासी सैफ अली शेख यांनी लक्ष वेधले. जो येतो, तो केवळ आश्वासनेच देतो; पण त्यांची पूर्तता होताना दिसत नाही. तरुणांना नोकऱ्या नाहीत. सक्षम नेता असणे गरजेचे आहे. भूलथापा नकोत. जो काम करेल, त्याच उमेदवाराच्या पाठीशी मतदार उभे राहतील. पक्ष कोणता, हे पाहिले जाणार नाही, असे मत प्रकाश बागले यांनी व्यक्त केले. कल्याण स्थानकात लोकल बराच वेळ थांबते. त्यामुळे नियोजन बिघडते, असा स्थानिक मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. पोपट बनकर या ज्येष्ठ नागरिकाने लोकलमधील वाढत्या गर्दीकडे लक्ष वेधले. प्रवाशांना चांगली सेवा मिळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ६० वर्षांवरील व्यक्तींनाही ज्येष्ठांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करता यावा, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी सध्याची ६५ वर्षांची मर्यादा ६० वर आणावी, असाही मुद्दा त्यांनी मांडला. वाढलेल्या बेरोजगारीकडे लक्ष वेधताना नागरिकांचे स्थानिक प्रश्नही आहेत. त्याबाबतही निवडून येणाºया राजकीय पक्षाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. बाहेरचे लोंढे वाढत आहेत.

या निवडणुकीत उमेदवाराला पाहून मते दिली जातील, तर सक्षम नेतृत्व म्हणून मोदींनाच पसंती असल्याचे मत आशीष आणि श्वेता नंदनवार या जोडप्याने मांडले. सध्या जो काही प्रचार सुरू आहे, त्यात केवळ आरोप-प्रत्यारोप आहेत. राष्ट्रीय नेत्यांच्या भाषणातील त्याचत्याच मुद्द्यांनी अक्षरश: कंटाळा आला असून, यात स्थानिक मुद्द्यांना बगल दिली जात आहे. लोकलच्या फेºया वाढल्या पाहिजेत. त्यात लेडिज स्पेशल वाढवल्या पाहिजे. प्रवास सुखकर आणि सुरक्षित झाला पाहिजे, अशी मते काही महिला प्रवाशांनी व्यक्त केली.