शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अंत्योदय कार्डधारक धान्यास मुकणार , २२,५५६ लाभधारक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 06:38 IST

दरमहा सुमारे ३५ किलो अन्नधान्य मिळणाºया अंत्योदय कार्डधारकांना वर्षअखेर धान्यास मुकावे लागणार आहे. यामध्ये महापालिकांसह ग्रामीण भागातील सुमारे २२ हजार ५५६ कार्डधारकांना झळ बसणार आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : दरमहा सुमारे ३५ किलो अन्नधान्य मिळणाºया अंत्योदय कार्डधारकांना वर्षअखेर धान्यास मुकावे लागणार आहे. यामध्ये महापालिकांसह ग्रामीण भागातील सुमारे २२ हजार ५५६ कार्डधारकांना झळ बसणार आहे. मात्र, दिवाळीसाठी जिल्ह्यात मुबलक अन्नधान्य असून नोव्हेंबरचा नियतव्ययदेखील मंजूर झालेला आहे.प्रधान सचिवांच्या आदेशान्वये ठाणे जिल्ह्यातील २२ हजार ५५६ अंत्योदय कार्डधारक त्यांच्या हक्काच्या ३५ किलो धान्यास मुकणार आहेत.यामध्ये १७ किलो गहू, तर १८ किलो तांदळाचा समावेश आहे. याविरोधात सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलन छेडले. या जिल्ह्यातील किती कुटुंबांना फटका बसणार, याविषयी लोकमतने शोध घेतला असता सुमारे २२ हजार ५५६ कुटुंबे या सवलतीच्या धान्यास मुकणार असल्याचे निदर्शनात आले आहे.या धान्याऐवजी केवळ पाच किलो अन्नधान्य या अंत्योदय कार्डधारकांना मिळणार आहेत. मात्र, त्यासाठी कदाचित नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. २१ सप्टेंबरच्या आदेशान्वये या कार्डधारकांचा समावेश प्राधान्य गटातील कार्डधारकांमध्ये होऊन त्यांना पाच किलो धान्य मिळणार आहे.मात्र, आजमितीस तरी नोव्हेंबर महिन्यांचा सुमारे सात हजार ८९४ क्विंटलचा अन्नधान्याचा कोठा (नियतव्यय) मंजूर झाला आहे. या अन्नधान्यापैकी महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील १३ शिधावाटप कार्यालयातील दुकानावर चार हजार ८३२ क्विंटल धान्याचा पुरवठा होणार आहे. तर, ग्रामीण भागातील आठ हजार ७५० अंत्योदय कार्डधारकांचे सुमारे तीन हजार ६४ क्विंटल ६० किलो धान्याचा पुरवठा त्यांच्या शिधावाटप दुकानावर १ नोव्हेंबरपासून होणार आहे.अंत्योदय कार्डधारक व बेघर कुटुंबांचा हा ३५ किलो धान्याचा पुरवठा बंद होण्याच्या दृष्टीने अध्यादेश जारी झाले आहेत. यामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर या महापालिका व अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिकांमधील १३ हजार ८०६ अंत्योदय कार्डधारकांना ३५ ऐवजी केवळ पाच किलो अन्नधान्य मिळणार असल्याचे येथील शिधावाटप कार्यालयाने स्पष्ट केले आहे. तर, ग्रामीण भागातील अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी या पाच तालुक्यांमधील आठ हजार ७५० कार्डधारक ३५ किलो या सवलतीच्या धान्याला मुकणार आहेत.

टॅग्स :Governmentसरकार