शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

अंत्योदय कार्डधारक धान्यास मुकणार , २२,५५६ लाभधारक वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 06:38 IST

दरमहा सुमारे ३५ किलो अन्नधान्य मिळणाºया अंत्योदय कार्डधारकांना वर्षअखेर धान्यास मुकावे लागणार आहे. यामध्ये महापालिकांसह ग्रामीण भागातील सुमारे २२ हजार ५५६ कार्डधारकांना झळ बसणार आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : दरमहा सुमारे ३५ किलो अन्नधान्य मिळणाºया अंत्योदय कार्डधारकांना वर्षअखेर धान्यास मुकावे लागणार आहे. यामध्ये महापालिकांसह ग्रामीण भागातील सुमारे २२ हजार ५५६ कार्डधारकांना झळ बसणार आहे. मात्र, दिवाळीसाठी जिल्ह्यात मुबलक अन्नधान्य असून नोव्हेंबरचा नियतव्ययदेखील मंजूर झालेला आहे.प्रधान सचिवांच्या आदेशान्वये ठाणे जिल्ह्यातील २२ हजार ५५६ अंत्योदय कार्डधारक त्यांच्या हक्काच्या ३५ किलो धान्यास मुकणार आहेत.यामध्ये १७ किलो गहू, तर १८ किलो तांदळाचा समावेश आहे. याविरोधात सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलन छेडले. या जिल्ह्यातील किती कुटुंबांना फटका बसणार, याविषयी लोकमतने शोध घेतला असता सुमारे २२ हजार ५५६ कुटुंबे या सवलतीच्या धान्यास मुकणार असल्याचे निदर्शनात आले आहे.या धान्याऐवजी केवळ पाच किलो अन्नधान्य या अंत्योदय कार्डधारकांना मिळणार आहेत. मात्र, त्यासाठी कदाचित नवीन वर्ष उजाडण्याची शक्यता आहे. २१ सप्टेंबरच्या आदेशान्वये या कार्डधारकांचा समावेश प्राधान्य गटातील कार्डधारकांमध्ये होऊन त्यांना पाच किलो धान्य मिळणार आहे.मात्र, आजमितीस तरी नोव्हेंबर महिन्यांचा सुमारे सात हजार ८९४ क्विंटलचा अन्नधान्याचा कोठा (नियतव्यय) मंजूर झाला आहे. या अन्नधान्यापैकी महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील १३ शिधावाटप कार्यालयातील दुकानावर चार हजार ८३२ क्विंटल धान्याचा पुरवठा होणार आहे. तर, ग्रामीण भागातील आठ हजार ७५० अंत्योदय कार्डधारकांचे सुमारे तीन हजार ६४ क्विंटल ६० किलो धान्याचा पुरवठा त्यांच्या शिधावाटप दुकानावर १ नोव्हेंबरपासून होणार आहे.अंत्योदय कार्डधारक व बेघर कुटुंबांचा हा ३५ किलो धान्याचा पुरवठा बंद होण्याच्या दृष्टीने अध्यादेश जारी झाले आहेत. यामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर या महापालिका व अंबरनाथ, बदलापूर या नगरपालिकांमधील १३ हजार ८०६ अंत्योदय कार्डधारकांना ३५ ऐवजी केवळ पाच किलो अन्नधान्य मिळणार असल्याचे येथील शिधावाटप कार्यालयाने स्पष्ट केले आहे. तर, ग्रामीण भागातील अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी या पाच तालुक्यांमधील आठ हजार ७५० कार्डधारक ३५ किलो या सवलतीच्या धान्याला मुकणार आहेत.

टॅग्स :Governmentसरकार