शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

कल्याणात डेंग्यूचा आणखी एक बळी'

By admin | Updated: October 24, 2016 02:06 IST

पावसाळा संपला तरी शहरात डेंग्यूचा प्रभाव कायम असून पत्रीपूल भागातील कृष्णानगरमध्ये राहणाऱ्या अब्दुल मैनुद्दीन सय्यद यांचा डेंग्यूच्या आजाराने रविवारी सकाळी मृत्यू झाला.

कल्याण : पावसाळा संपला तरी शहरात डेंग्यूचा प्रभाव कायम असून पत्रीपूल भागातील कृष्णानगरमध्ये राहणाऱ्या अब्दुल मैनुद्दीन सय्यद यांचा डेंग्यूच्या आजाराने रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.कल्याणच्या बैलबाजार परिसरात सीटमेकरचे काम करणाऱ्या सय्यद यांना पाच ते सहा दिवसांपासून ताप येत होता. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे निदान झाले. त्यात, त्यांची रविवारी प्राणज्योत मालवली. ऐन पावसाळ्यात साथीच्या आजारांचा कल्याण-डोंबिवली परिसरात प्रादुर्भाव होता. आताही आजारांचा प्रभाव कायम आहे. पावसाळा संपला तरी डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम असल्याचे सय्यद यांच्या मृत्यूने समोर आले आहे. साथीच्या वाढत्या आजारांबाबत नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात या आजारांच्या जनजागृतीसाठी केडीएमसीच्या वतीने विशेष मोहीम सुरू केली होती. यात शहरातील मुख्य चौकांसह अन्य भागांमध्ये पत्रके वाटणे, गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी पथनाट्यांचे सादरीकरण करणे, अशा उपाययोजना करण्यात आल्या. परंतु, याची मात्रा लागू झाली नाही. दुसरीकडे पावसाळा संपल्यानंतरही साथीचा प्रादुर्भाव पाहता अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी बैठक घेऊन वैद्यकीय विभागांसह आरोग्य विभाग आणि अन्य विभागांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाहीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, याआधीही डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाले आहेत. परंतु, केडीएमसीच्या वतीने दरवेळेला नकारघंटा वाजवण्यात आली. एकीकडे जुलै-आॅगस्टमध्ये डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असताना केडीएमसीकडे मात्र डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २९ च्या आसपास होती. या वाढत्या साथीच्या आजारांवर महासभेत वारंवार लोकप्रतिनिधींकडून आवाज उठवण्यात आला. खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर निर्बंध घाला, अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या. मात्र, ठोस अंमलबजावणीअभावी त्या केवळ कागदावरच राहत असल्याचे वास्तव आहे.(प्रतिनिधी)