शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणात डेंग्यूचा आणखी एक बळी'

By admin | Updated: October 24, 2016 02:06 IST

पावसाळा संपला तरी शहरात डेंग्यूचा प्रभाव कायम असून पत्रीपूल भागातील कृष्णानगरमध्ये राहणाऱ्या अब्दुल मैनुद्दीन सय्यद यांचा डेंग्यूच्या आजाराने रविवारी सकाळी मृत्यू झाला.

कल्याण : पावसाळा संपला तरी शहरात डेंग्यूचा प्रभाव कायम असून पत्रीपूल भागातील कृष्णानगरमध्ये राहणाऱ्या अब्दुल मैनुद्दीन सय्यद यांचा डेंग्यूच्या आजाराने रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.कल्याणच्या बैलबाजार परिसरात सीटमेकरचे काम करणाऱ्या सय्यद यांना पाच ते सहा दिवसांपासून ताप येत होता. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे निदान झाले. त्यात, त्यांची रविवारी प्राणज्योत मालवली. ऐन पावसाळ्यात साथीच्या आजारांचा कल्याण-डोंबिवली परिसरात प्रादुर्भाव होता. आताही आजारांचा प्रभाव कायम आहे. पावसाळा संपला तरी डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम असल्याचे सय्यद यांच्या मृत्यूने समोर आले आहे. साथीच्या वाढत्या आजारांबाबत नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात या आजारांच्या जनजागृतीसाठी केडीएमसीच्या वतीने विशेष मोहीम सुरू केली होती. यात शहरातील मुख्य चौकांसह अन्य भागांमध्ये पत्रके वाटणे, गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी पथनाट्यांचे सादरीकरण करणे, अशा उपाययोजना करण्यात आल्या. परंतु, याची मात्रा लागू झाली नाही. दुसरीकडे पावसाळा संपल्यानंतरही साथीचा प्रादुर्भाव पाहता अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी बैठक घेऊन वैद्यकीय विभागांसह आरोग्य विभाग आणि अन्य विभागांवर जबाबदारी निश्चित करून कार्यवाहीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, याआधीही डेंग्यूच्या आजाराने मृत्यू झाले आहेत. परंतु, केडीएमसीच्या वतीने दरवेळेला नकारघंटा वाजवण्यात आली. एकीकडे जुलै-आॅगस्टमध्ये डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असताना केडीएमसीकडे मात्र डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २९ च्या आसपास होती. या वाढत्या साथीच्या आजारांवर महासभेत वारंवार लोकप्रतिनिधींकडून आवाज उठवण्यात आला. खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर निर्बंध घाला, अशा सूचनाही करण्यात आल्या होत्या. मात्र, ठोस अंमलबजावणीअभावी त्या केवळ कागदावरच राहत असल्याचे वास्तव आहे.(प्रतिनिधी)