शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

१८ गावे न वगळण्याबाबत आणखी एक याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 00:54 IST

नगरसेवकाची उच्च न्यायालयात धाव : पदे रद्द करण्यास घेतली हरकत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून १८ गावे वगळू नका, या मागणीसाठी भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वीही एका सामाजिक कार्यकर्त्याने याच मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे एकाच मागणीकरिता दोन याचिका दाखल झाल्या आहेत. दरम्यान, भाजप नगरसेविका सुनीता खंडागळे याही उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

केडीएमसीतील २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगर परिषद तयार करण्याची मूळ मागणी होती. मात्र, राज्य सरकारने २७ पैकी नऊ गावे महापालिकेत ठेवून १८ गावे वगळली. तसेच १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. त्यावर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून हरकती, सूचना मागविल्या. ही प्रक्रिया सुरू असताना १८ गावे महापालिकेतून वगळू नयेत, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर प्रथम सुनावणी झाली असून, न्यायालयाने राज्य सरकारसह संबंधित यंत्रणांना १४ आॅगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.दुसरीकडे १८ गावे वगळण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना तेथील १३ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केल्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. या सगळ्या मुद्यांना हरकत घेत भोईर यांनी याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी १८ गावे महापालिकेतून वगळू नयेत. स्वतंत्र नगरपालिका केवळ १८ गावांची न करता २७ गावांची करावी, अन्यथा करू नये. जनगणनेचे काम सुरू असताना कोणत्याही शहर, तालुका, जिल्ह्याच्या हद्दीत फेरबदल करता येत नाही. गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू असताना नगरसेवकपदे रद्द करण्याची घाई महापालिका प्रशासनाने केली आहे. पदे रद्द करण्याचा अधिकार आयुक्तांना नाही. तसेच प्रक्रिया पूर्णच झालेली नसताना पद रद्द कसे केले, असा प्रश्नही त्यांनी याचिकेत विचारला आहे.कोविडकाळात ही गावे वगळून नगरसेवकपद रद्दे केल्याने या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. अनारोग्याची परिस्थिती उद्भवू शकते. ४ मे पासून राज्य सरकारने कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेतलेले नसताना अचानकपणे १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापनेची प्रक्रिया कशी सुरू करता येऊ शकते, असे विविध मुद्देही भोईर यांनी याचिकेद्वारे उपस्थितकेले आहेत.आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरभोईर यांच्यापाठोपाठ खंडागळे याही न्यायालयात धाव घेणार आहेत. त्यांच्या मते महापालिका आयुक्तांना पदे रद्द करण्याचा अधिकार नाही. त्याचबरोबर कोणतीही पूर्वसूचना न देता पदे रद्द कशी केली? अद्याप १८ गावांची स्वतंत्र नगर परिषदच स्थापन झालेली नाही.१८ गावे महापालिकेतून वगळण्यास आमचा विरोध आहे. प्रभागात कचऱ्याच्या गाड्या येत नाहीत. ही गावे वगळल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे, याकडे खंडागळे यांनीही लक्ष वेधले आहे.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका