शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

१८ गावे न वगळण्याबाबत आणखी एक याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 00:54 IST

नगरसेवकाची उच्च न्यायालयात धाव : पदे रद्द करण्यास घेतली हरकत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून १८ गावे वगळू नका, या मागणीसाठी भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वीही एका सामाजिक कार्यकर्त्याने याच मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे एकाच मागणीकरिता दोन याचिका दाखल झाल्या आहेत. दरम्यान, भाजप नगरसेविका सुनीता खंडागळे याही उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत.

केडीएमसीतील २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगर परिषद तयार करण्याची मूळ मागणी होती. मात्र, राज्य सरकारने २७ पैकी नऊ गावे महापालिकेत ठेवून १८ गावे वगळली. तसेच १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापन करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. त्यावर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून हरकती, सूचना मागविल्या. ही प्रक्रिया सुरू असताना १८ गावे महापालिकेतून वगळू नयेत, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर प्रथम सुनावणी झाली असून, न्यायालयाने राज्य सरकारसह संबंधित यंत्रणांना १४ आॅगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.दुसरीकडे १८ गावे वगळण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसताना तेथील १३ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केल्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. या सगळ्या मुद्यांना हरकत घेत भोईर यांनी याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी १८ गावे महापालिकेतून वगळू नयेत. स्वतंत्र नगरपालिका केवळ १८ गावांची न करता २७ गावांची करावी, अन्यथा करू नये. जनगणनेचे काम सुरू असताना कोणत्याही शहर, तालुका, जिल्ह्याच्या हद्दीत फेरबदल करता येत नाही. गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू असताना नगरसेवकपदे रद्द करण्याची घाई महापालिका प्रशासनाने केली आहे. पदे रद्द करण्याचा अधिकार आयुक्तांना नाही. तसेच प्रक्रिया पूर्णच झालेली नसताना पद रद्द कसे केले, असा प्रश्नही त्यांनी याचिकेत विचारला आहे.कोविडकाळात ही गावे वगळून नगरसेवकपद रद्दे केल्याने या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. अनारोग्याची परिस्थिती उद्भवू शकते. ४ मे पासून राज्य सरकारने कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेतलेले नसताना अचानकपणे १८ गावांची स्वतंत्र नगर परिषद स्थापनेची प्रक्रिया कशी सुरू करता येऊ शकते, असे विविध मुद्देही भोईर यांनी याचिकेद्वारे उपस्थितकेले आहेत.आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरभोईर यांच्यापाठोपाठ खंडागळे याही न्यायालयात धाव घेणार आहेत. त्यांच्या मते महापालिका आयुक्तांना पदे रद्द करण्याचा अधिकार नाही. त्याचबरोबर कोणतीही पूर्वसूचना न देता पदे रद्द कशी केली? अद्याप १८ गावांची स्वतंत्र नगर परिषदच स्थापन झालेली नाही.१८ गावे महापालिकेतून वगळण्यास आमचा विरोध आहे. प्रभागात कचऱ्याच्या गाड्या येत नाहीत. ही गावे वगळल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे, याकडे खंडागळे यांनीही लक्ष वेधले आहे.

टॅग्स :thaneठाणेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका