शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

जिल्ह्यातील शेतक-यांच्या माथी एमएमआरडीएचा आणखी एक महामार्ग; दोन दिवसात बाजारबोली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 22:58 IST

खाडीने चौबाजुंनी वेढलेल्या ठाणे जिल्ह्यास आता महामार्गांनी देखील मगरमीठी मारायला घेतली आहे. समृध्दी महामार्गासह गुजराथ बडोदरा जेएनपीटी एस्क्स्प्रेस हायवे पाठोपाठ आता विरार - अलिबाग सुमारे ८४ किमी.चा एमएमआरडीएचा महामार्ग पुन्हा शेतक-यांच्या माथी मारला जात आहे.

- सुरेश लोखंडे

ठाणे : खाडीने चौबाजुंनी वेढलेल्या ठाणे जिल्ह्यास आता महामार्गांनी देखील मगरमीठी मारायला घेतली आहे. समृध्दी महामार्गासह गुजराथ बडोदरा जेएनपीटी एस्क्स्प्रेस हायवे पाठोपाठ आता विरार - अलिबाग सुमारे ८४ किमी.चा एमएमआरडीएचा महामार्ग पुन्हा शेतक-यांच्या माथी मारला जात आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील सुमारे ७० हेक्टर जमीन जात आहे. त्यासाठी आगामी दोन दिवसात शासनाकडूनच बाजारभावाने बोली लागणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.विरार ते अलिबाग हा सुमारे ८४ किमी. लांबीचा मिनी महामार्ग तयार करण्याचे काम एमएमआरडीएने युध्दपातळीने हाती घेतले आहे. बहुउद्देशीय मार्गिका म्हणजेच कॅरिडोरचा हा महामार्ग थेट अलिबाग बंदरात जात आहे. या महामार्गामुळे सुमारे साडेचार तासाचा प्रवास अवघ्या एक ते दीड तासावर आला आहे. जेएनपीटी कॅरीडोरच्या आधी हा महामार्ग तयार करण्यासाठी सर्व शक्तनिशी काम सुरू आहे. या महामार्गासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ तालुक्यांमधील सुमारे ७० हेक्टर शेत जमीनचा वापर केला जाणार आहे. यासाठी अवघ्या दोन ते तीन दिवसात शेतकºयाच्या या शेत जमिनी बाजारभावाने खरेदी करण्याच्या सूचना जाहीर होणार आहेत. या भावापेक्षा दहा टक्के अधिक रक्कम शेतक-यांना देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.भिवंडीच्या २२ गावांसह कल्याणच्या बारा आणि अंबरनाथच्या हाजीमलंग पट्यातील उसाटणे, नारेन, खोपट, कारोली, पाली, किरक आदी गावांच्या शेतक-यांची शेत जमीन या प्रकल्पात जाणार आहे. अंबरनाथ तालुक्यातील या शेतक-यांची सुमारे ३० ते ४० हेक्टर शेतजमिनीवर हा कॉरीडोर तयार करण्यात येत आहे. ८४ किमी.चा हा महामार्ग सुमारे चार पदरी राहणार आहेत. एका वेळी चार वाहने त्यावरून धावणार आहेत. यामुळे ठाणे जिल्हह्यास आता चौबाजुनी महामार्गांनी वेढा टाकल्याचे उघड झाले आहे. समृध्दी महामार्गासह गुजराथला जाणार जेएनपीटी महामार्ग आदींना शेती देण्यास विरोध करणाºया शेतक-यांचा अनुभव लक्षात घेऊन आता सरळ बाजारभावाने या जमिनी विकत घेऊन त्यावर अधिक दहा टक्के रक्कम देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. शेतकºयांनी जमिनीच्या मोबदल्यात रक्कम मागावी आणि ती त्वरीत त्यांच्या हाती मिळवून देण्याची शासकीय यंत्रणा सतर्क आहे. त्यासाठी लवकरच संबंधीत शेतक-यांच्या नावांची यादी प्रसिध्द करून त्यांच्या मोबदल्याच्या रकमा देण्यासाठी शासन सर्व शक्तीनिशी सतर्क असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे