शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

ओडिशातील आणखी गांजा तस्करास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:48 IST

ठाणे : ओडिशामधून गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीतील श्रीकांत रावल सिंग (२२, रा. बेरौनवाडी, ओडिशा) या आणखी एकाला ठाणेनगर पोलिसांनी ...

ठाणे : ओडिशामधून गांजाची तस्करी करणाऱ्या टोळीतील श्रीकांत रावल सिंग (२२, रा. बेरौनवाडी, ओडिशा) या आणखी एकाला ठाणेनगर पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले आहे. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यानेच रमेश बादई आणि दीपक जेना यांच्याकडे तीन लाख ५० हजारांचा ३५ किलो गांजा सोपविल्याचे चौकशीतून उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे रेल्वेस्थानकाजवळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी आणि उपनिरीक्षक अजित बडे यांच्या पथकाने २९ ऑगस्ट २०२१ रोजी रमेश आणि दीपक या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीतून ३५ किलोचा गांजाही जप्त केला होता. सखोल चौकशीमध्ये ओडिशातून त्यांनी तो आणल्याची कबुली दिली. त्यांना ६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. याच दोघांच्या चौकशीतून त्यांनी ओडिशातील श्रीकांत याच्याकडून हा गांजा आणल्याची कबुली दिली होती. त्याच आधारे बडे यांच्या पथकाने ओडिशा पोलिसांच्या मदतीने त्यालाही ३ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. त्याला ६ सप्टेंबरपर्यंत ट्रान्सिस्ट रिमांड मिळाली होती. सोमवारी पुन्हा त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

* ठाणेनगर पोलिसांनी यापूर्वीही ओडिशातून गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करून २० किलोचा गांजा हस्तगत केला होता. आतापर्यंत ५५ किलोचा गांजा हस्तगत केला आहे. श्रीकांत याने ठाणे मुंबईमध्ये आणखी कुणाला गांजाची तस्करी केली, याचाही शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक विद्या पाटील यांनी सांगितले.