शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात सापडले आणखी ४८६ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 06:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक ४८६ इतके नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या नव्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक ४८६ इतके नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांचा आकडा आठ हजार २६७ एवढा झाला आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी १६ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा हा २५६ इतका झाला आहे. रविवारी ठाणे महानगरपालिका हद्दीत सर्वात जास्त १३१ रुग्ण सापडले. एकीकडे जिल्ह्यातील एकूण रुग्णांनी आठ हजारांचा टप्पा पार केला असताना दुसरीकडे ठामपातील रुग्णांनीही तीन हजारांचा तर कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण रुग्णसंख्येने एक हजारांचा आणि मिराभार्इंदरने सातशेचा टप्पा पार केला आहे.

नव्या रुग्णांमुळे ठामपातील एकूण रुग्णसंख्या तीन हजार ३२ वर पोहोचली आहे. ठामपा हद्दीत पाच जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ८९ झाला आहे. त्याचबरोबर १0६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याखालोखाल नवीमुंबईत ९४ नवीन रुग्ण निदान झाल्याने येथील एकूण रुग्णसंख्या दोन हजार २0४ झाली आहे. नवीमुंबईत तीन जण दगावल्याने तेथील मृतांचा आकडा ७३ झाला आहे. ८९ रुग्ण मिराभार्इंदर येथे सापडल्याने तेथील रुग्णसंख्या ७३८ वर गेली आहे. तेथे पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २९ झाला आहे. कल्याण डोंबिवलीत नवीन ५४ रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या एक हजार ३४ वर पोहोचली आहे.

एका रुग्णाच्या मृत्यूने मृताचा आकडा २९ वर गेला आहे. अंबरनाथ येथे ३५ नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या १६६ झाली आहे. भिवंडीत २८ नवीन रुग्ण मिळून एकूण रुग्णसंख्या १४७ झाली आहे. एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सात झाली आहे. उल्हासनगरला नवीन २५ रुग्ण मिळाल्याने एकूण संख्या ३६0 झाली आहे. तेथे एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ११ वर गेली आहे. १८ नवीन रुग्णांमुळे ठाणे ग्रामीणचा एकूण रुग्णांचा आकडा ३६१ वर गेला आहे. बदलापूर येथे १२ नवीन रुग्ण मिळाल्याने एकूण रुग्णसंख्या २२५ झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.वसई-विरारमध्ये २० नवे रुग्णवसई : वसई-विरार शहर पालिका हद्दीत रविवारी २० नवे रुग्ण आढळले. तर, नालासोपाºयातील ७० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७५२ वर पोहचली आहे. वसई, विरार व नालासोपारा पूर्व-पश्चिम भागातून रविवारी तीन रुग्ण मुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे. आजवर पालिका हद्दीत एकूण २९२ जण मुक्त झाले. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या २६ आहे. ४३४ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस