शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

ठाणे जिल्ह्यात सापडले आणखी ४८६ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 06:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक ४८६ इतके नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या नव्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक ४८६ इतके नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांचा आकडा आठ हजार २६७ एवढा झाला आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी १६ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा हा २५६ इतका झाला आहे. रविवारी ठाणे महानगरपालिका हद्दीत सर्वात जास्त १३१ रुग्ण सापडले. एकीकडे जिल्ह्यातील एकूण रुग्णांनी आठ हजारांचा टप्पा पार केला असताना दुसरीकडे ठामपातील रुग्णांनीही तीन हजारांचा तर कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रातील एकूण रुग्णसंख्येने एक हजारांचा आणि मिराभार्इंदरने सातशेचा टप्पा पार केला आहे.

नव्या रुग्णांमुळे ठामपातील एकूण रुग्णसंख्या तीन हजार ३२ वर पोहोचली आहे. ठामपा हद्दीत पाच जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ८९ झाला आहे. त्याचबरोबर १0६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याखालोखाल नवीमुंबईत ९४ नवीन रुग्ण निदान झाल्याने येथील एकूण रुग्णसंख्या दोन हजार २0४ झाली आहे. नवीमुंबईत तीन जण दगावल्याने तेथील मृतांचा आकडा ७३ झाला आहे. ८९ रुग्ण मिराभार्इंदर येथे सापडल्याने तेथील रुग्णसंख्या ७३८ वर गेली आहे. तेथे पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २९ झाला आहे. कल्याण डोंबिवलीत नवीन ५४ रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या एक हजार ३४ वर पोहोचली आहे.

एका रुग्णाच्या मृत्यूने मृताचा आकडा २९ वर गेला आहे. अंबरनाथ येथे ३५ नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या १६६ झाली आहे. भिवंडीत २८ नवीन रुग्ण मिळून एकूण रुग्णसंख्या १४७ झाली आहे. एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सात झाली आहे. उल्हासनगरला नवीन २५ रुग्ण मिळाल्याने एकूण संख्या ३६0 झाली आहे. तेथे एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ११ वर गेली आहे. १८ नवीन रुग्णांमुळे ठाणे ग्रामीणचा एकूण रुग्णांचा आकडा ३६१ वर गेला आहे. बदलापूर येथे १२ नवीन रुग्ण मिळाल्याने एकूण रुग्णसंख्या २२५ झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.वसई-विरारमध्ये २० नवे रुग्णवसई : वसई-विरार शहर पालिका हद्दीत रविवारी २० नवे रुग्ण आढळले. तर, नालासोपाºयातील ७० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७५२ वर पोहचली आहे. वसई, विरार व नालासोपारा पूर्व-पश्चिम भागातून रविवारी तीन रुग्ण मुक्त झाल्याने दिलासा मिळाला आहे. आजवर पालिका हद्दीत एकूण २९२ जण मुक्त झाले. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या २६ आहे. ४३४ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस