शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

एनआरसीची दिवाळखोरी जाहीर करा, ‘जनरल्स वर्क युनियन’चा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 03:56 IST

कल्याण : आंबिवली येथील एनआरसी कंपनीला २००९ मध्ये टाळे लावण्यात आले. मात्र, आठ वर्षे उलटूनही २ हजार २२५ कामगारांना जवळपास ६५० कोटी रुपयांची अपेक्षित असलेली देणी मिळालेली नाहीत.

कल्याण : आंबिवली येथील एनआरसी कंपनीला २००९ मध्ये टाळे लावण्यात आले. मात्र, आठ वर्षे उलटूनही २ हजार २२५ कामगारांना जवळपास ६५० कोटी रुपयांची अपेक्षित असलेली देणी मिळालेली नाहीत. देणी मिळाण्यासाठी कंपनीची दिवाळखोरी जाहीर करावी, असा ठराव आॅल इंडिया इंडस्ट्रीयल जनरल्स वर्क युनियनने केला आहे. दिवाळीखोरी जाहीर करण्याच्या मागणीची याचिका उच्च न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष उदय चौधरी यांनी दिली.आर्थिक डबघाईला आल्याचे कारण पुढे करत व्यवस्थापनाने ९ नोव्हेंबर २००९ ला कंपनीला टाळे ठोकले. त्यामुळे २ हजार २२५ कामगारांना त्यांची देणी मिळालेली नाहीत. देणीसाठी कामगारांनी मोर्चे, आंदोलने केली. तरीही सरकारला जाग आलेली नाही. आघाडी सरकारच्या काळात कामगारांना देणी देण्यासाठी मंत्रालयात बैठका घेण्यात आल्या. परंतु, त्यातून काहीच साध्य झालेले नाही. कामगारांना देणी मिळत नसल्याने कंपनी दिवाळीखोरीत निघाल्याचे जाहीर करावे, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.कंपनीचे प्रकरण हे ‘बीआयएफआर’मध्ये गेले होते. आजारी उद्योगांची प्रकरणे तेथे जातात. मात्र, सध्याच्या भाजपा सरकारने ‘बीआयएफआर’ हे फोरमच रद्द केले आहे. कंपनी मालकाने कामगारांची देणी न देताच कंपनीची जागा रहेजा बिल्डरला विकण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी केडीएमसीचे तत्कालीन आयुक्त गोविंद राठोड यांनी कंपनीची मालमत्ता कराची थकबाकी थकीत असताना जमीन करार करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिले होते. कंपनी व्यवस्थापन ‘रहेजा’ला जमीन विकत असल्याने कामगारांची देणी ‘रहेजा’कडून मिळणार, असे बोलले जात होते. ‘रहेजा’नेही देणी देण्यास तयारी दर्शवली होती. त्याबाबत एनआरसी कामगार संघटनेशी कंपनीने करार केला होता. त्यानुसार, निवृत्त कामगारांची देणी दिली नाही तरी चालतील, जमीन विकायला परवानगी देणे अशा स्वरूपाचे करार करण्यात आले होते. पण मान्यप्राप्त कामगार संघटनेने कंपनीशी केलेल्या करारांविरोधात आॅल इंडिया इंडस्ट्रीयल जनरल्स वर्क युनियनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेद्वारे न्यायालयाने मान्यताप्राप्त कामगार संघटनेशी केलेले करार रद्दबातल ठरविले आहेत. न्यायालयात तीन याचिका होत्या. परंतु, कामगारांची देणी मिळावी, या आशयाची एकही याचिका उच्च न्यायालयात नसल्याने कामगारांना देणी मिळालीच नाहीत. बीआयएफआर हे सरकारने रद्दबातल ठरवल्याने कामगारांची देणी देण्याबाबत सरकारने पुढाकार घेऊन नव्याने विचार करणे आवश्यक आहे. मात्र, तो होत नाही.कंपनीच्या बाजूने निकाल लागावा, यासाठी कंपनीच्या तीन अधिकाºयांविरोधात लाचप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. त्याची चौकशी सुरू आहे. आता तर बीआयएफआर रद्दबातल झाले आहे. त्यामुळे कामगारांची देणी द्यावीत, त्यासाठी कंपनची दिवाळीखोरी जाहीर करावी, अशी मागणी न्यायालयात याचिकेद्वारे केली जाणार आहे.>मोट बांधणारठाणे जिल्ह्यात जवळपास २०० कारखाने बंद आहेत. या सगळ््या बंद कारखान्यांमधील कामगारांचा एक जाहीर मेळावा लवकरच घेतला जाईल. त्यानंतर एक भव्य मोर्चाही काढण्यात येईल. कामगारांना त्याचा हक्क मिळालाच पाहिजे, यासाठी बंद कारखान्यातील कामगारांची एक भली मोठी मोट बांधली जाणार आहे, असेही चौधरी यांनी सांगितले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका