शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
2
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
3
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
4
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
5
Stock Market Today: शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजार सुस्साट.., बाजारमूल्य १० लाख कोटी रुपयांहून अधिक वाढलं
6
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
7
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
8
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
9
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
10
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
11
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
12
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
13
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
14
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
15
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
16
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
17
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
18
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
19
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
20
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा

सभागृह नेतेपदी अनिता गौरी

By admin | Updated: May 6, 2015 01:43 IST

स्थायी समिती सभापतीपदी नरेश म्हस्के यांची निवड झाल्याने रिक्त झालेल्या सभागृह नेतेपदाच्या शर्यतीत अनेक मातब्बर असतांना पक्ष श्रेष्ठींनी ठाण्यात सभागृह नेतेपदी अ‍ॅड. अनिता गौरी यांची निवड केली आहे.

ठाणे : स्थायी समिती सभापतीपदी नरेश म्हस्के यांची निवड झाल्याने रिक्त झालेल्या सभागृह नेतेपदाच्या शर्यतीत अनेक मातब्बर असतांना पक्ष श्रेष्ठींनी ठाण्यात सभागृह नेतेपदी अ‍ॅड. अनिता गौरी यांची निवड केली आहे. मंगळवारी झालेल्या या निवडीने त्या ठाणे महापालिकेतील पहिल्या महीला सभागृहनेत्या ठरल्या आहेत. मुंबई महापालिकेत तृष्णा विश्वासराव यांची मागील वर्षी सभागृह नेतेपदी निवड झाली होती. तीच परंपरा ठाण्यातही शिवसेनेने कायम ठेवली आहे.गेल्या आठवड्यात रिक्त झालेल्या सभागृह नेतेपदाच्या शयर्तीत माजी महापौर अशोक वैती, नरेश मणेरा, विलास सामंत, दशरथ पालांडे, राम एगडे आदींसह, अनिता गौरी, मीनाक्षी शिंदे, अनिता बिर्जे आदी महिला सुध्दा शर्यतीमध्ये होत्या. अखेर या सर्वांना पिछाडीवर टाकत अनिता गौरी यांनी यात बाजी मारली असून त्यांची मंगळवारी सभागृह नेतेपदी निवड झाली. दरम्यान सुरवातीला अशोक वैती यांचे नाव अंतिम मानले जात होते. परंतु त्यांचे नाव डावलण्यात आल्याने अनिता बिर्जे यांच्यासह मीनाक्षी शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. परंतु अखेर गौरी यांची या पदावर निवड झाली आहे. त्या सलग दोन वेळा निवडून आल्या आहेत. त्यांनी महापौरपदासाठीही चार ते पाच वेळा आग्रह धरला होता. परंतु त्यांना डावलण्यात आल्याने त्या नाराज होत्या. विशेष म्हणजे कळव्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असतांना गौरी या शिवसेनेतून निवडून येत आहेत. एकूणच उपमहापौर पद कळव्याला दिल्यानंतर आता पुन्हा कळवा पट्यात शिवसेनेला वाढविण्यासाठी गौरी यांची निवड केल्याचीही चर्चा सध्या सुरु आहे. (प्रतिनिधी)सर्व पदे वागळेलाच का...यापूर्वी सर्वच पदांचा मान हा वागळे इस्टेट आणि कोपरी भागातील शिवसेनेच्या मंडळींनाच मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीचे तिकीट असो अथवा, महापौरपदाची लॉटरी आदींसह इतर महत्वाच्या पदांवर देखील वागळे पट्याचाच वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे सर्व पदे वागळे इस्टेटलाच का असा काहीसा वादही गेले दिवस शिवसेनेत रंगला होता. त्यामुळेच कदाचित आता, वागळे पट्याला वगळून कळव्याला न्याय देण्याचा प्रयत्न पक्ष श्रेष्ठींनी केला असल्याचेही बोलले जात आहे. विरोधकांना शांत करणे अशक्यसध्या ठामपात महासभेचा कारभार अनागोंदी पध्दतीने सुरु आहे. कधी काय होईल हे सांगणे एकाही सदस्याला शक्य नाही. प्रत्येक महासभेत विरोधक जेव्हा आक्रमक झाले आहेत, तेव्हा त्यांना शांत करण्याची धमक नरेश म्हस्के यांनी दाखविली होती. तो समन्वय गौरी या कशा साधतात हे पहावे लागेल.