शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

भाजपच्या भूमिकेविरोधात उमटल्या संतप्त प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:53 IST

केंद्र सरकार भूमिकेवर ठाम असल्याचे संकेत; प्रवक्तीच्या वक्तव्याने निर्माण झाला वाद

पालघर : लोकांचा कितीही विरोध असला तरी वाढवण बंदर होणारच, असे संकेत दिले जात असल्याने किनारपट्टीवरील स्थानिकांमधून संतप्त भाव उमटले आहेत. केंद्र शासनाची वाढवण बंदर उभारणीबाबत यापूर्वी केलेली घोषणा आजही ठाम आहे. भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी यांच्या दाव्यानंतर मोदी सरकारची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने तर चालू नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.केंद्र शासनाने वाढवण बंदराच्या प्रोजेक्टसाठी मोठी गुंतवणूक केली असून केंद्राचा ७४ टक्के वाटा तर राज्य सरकारचा यात २६ टक्के वाटा असा सामंजस्य करार झाला असून एकूण ६५ हजार ५४४ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यताही देण्यात आली आहे. या बंदरासाठी हजारो एकर जमीन संपादन केले जाणार असून समुद्रात सुमारे पाच हजार एकर क्षेत्रात भरावासाठी पूर्वेकडील डोंगर फोडावे लागणार आहेत. दुसरा सर्वात मोठा फटका मच्छीमारांना बसणार असून मत्स्य संपदेचा ‘गोल्डन बेल्ट’ समजला जाणारा भागच या भराव क्षेत्रामुळे नष्ट केला जाणार आहे. यामुळे किनाऱ्यावर वसलेल्या धाकटी डहाणू, चिंचणी, दांडापाडा, वरोर, तारापूर, घिवली, कंबोडा, नवापूर, दांडी, सातपाटी आदी गावातील घरावर समुद्री लाटांचा तडाखा बसणार आहे. नरेंद्र मोदींना आम्ही मते दिल्यामुळे ते आज पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. तुमचे सरकार असले म्हणून तुम्ही काहीही करणार का? एके ठिकाणी पेसा कायदा तुम्हीच आणता आणि त्याचे उल्लंघनही तुम्हीच करता? आमच्या भावनांचा विचार करा.    - विनिता राऊत, सरपंच, वाढवणपंतप्रधान हुकूमशहा आहेत का? आम्ही हे बंदर कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे.- कुंदन राऊत, पर्यावरणप्रेमी, नरपडस्थानिकांच्या भावना दुखावणारी जाहीर वक्तव्ये सत्तेचा माज असलेलेच करतात. कोणी कितीही चमचेगिरी वक्तव्ये केली तरी कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. जोपर्यंत वाढवण बंदर कायमस्वरूपी रद्द होत नाही तोपर्यंत असाच लढा यापुढेही सुरू ठेवू.        - अनिकेत पाटील, कार्याध्यक्ष,     वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती

टॅग्स :BJPभाजपा