शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
3
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
4
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
5
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
6
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
7
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
8
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
9
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
10
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
11
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
12
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
13
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
14
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
15
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
16
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
17
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
18
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
19
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
20
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
Daily Top 2Weekly Top 5

नाराज भाजप नगरसेवकांच्या बहिष्काराचा झाला ‘फियास्को’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 03:52 IST

निवडणुकीत एकदिलाने काम करू : युतीच्या बैठकीत घेतली शपथ

ठाणे : भाजपच्या नाराज २३ नगरसेवकांनी अखेर पक्षश्रेष्ठींच्या आदेशापुढे नमते घेत, सोमवारी झालेल्या युतीच्या बैठकीला हजेरी लावली. या निवडणुकीत एकदिलाने काम करू, अशी शपथही त्यांनी घेतल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याबाबत त्यांनी दिलेल्या इशाऱ्याचा फियास्को झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ज्या गटनेत्यांनी यासाठी असंतुष्ट नगरसेवकांचे नेतृत्व करण्यासाठी पुढाकार घेतला होता, त्यांनीच नांगी टाकल्याने त्यांच्या तंबूतील उर्वरित भाजप नगरसेवकांपुढे शरणागती पत्करण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहिला नाही.

शिवसेनेकडून राजन विचारे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपच्या २३ नगरसेवकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. दुसरा कोणताही उमेदवार दिल्यास त्यासाठी काम करण्याची आमची तयारी असल्याची भूमिका या नगरसेवकांनी घेतली होती. भाजपचे गटनेते नारायण पवार, अशोक राऊळ, मिलिंद पाटणकर यांनी या नाराज नगरसेवकांची मोट बांधली होती. रविवारी झालेल्या एका बैठकीला हे नगरसेवक गैरहजर होते. त्यामुळे सोमवारच्या बैठकीला ही मंडळी हजर राहणार का, असा सवाल उपस्थित झाला होता. परंतु, सोमवारची सकाळ उजाडताच हालचाली वेगात झाल्या. सर्व नगरसेवकांचे फोन खणखणू लागले. त्यांना बैठकीला उपस्थित राहण्याची तंबीच पक्षाकडून देण्यात आली. बैठकीला न आल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांना देण्यात आला. नाराज नगरसेवकांचे नेतृत्व गटनेते नारायण पवार यांनी केले होते. त्यामुळे सर्व नगरसेवकांना बैठकीला आणण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच देण्यात आली होती.असंतुष्टांची जबाबदारी पवारांवरचसर्व नगरसेवक बैठकीला आले नाही, तर कारवाई करण्याचा इशारा नाराज गटाचे नेतृत्त्व करणाऱ्या नारायण पवार यांना देण्यात आला होता. त्यामुळे पवार यांनी सर्व नगरसेवकांना फोन करून बैठकीला हजेरी लावण्याची गळ घातली. त्यानुसार, सर्व नगरसेवक बैठकीस उपस्थित होते.या बैठकीत युतीच्या सर्वच नगरसेवकांनी विचारेंसाठी एकदिलाने काम करण्याचा नारा दिला आणि भाजपच्या नाराज नगरसेवकांचा फियास्को झाला. या २३ नगरसेवकांनी निवडणुकीच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते.त्यांनी राजन विचारे यांच्या उमेदवारीविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद ठाणे लोकसभा मतदारसंघात निर्माण झाला होता. पक्षस्तरावर याची गंभीर दखल घेण्यात आली. मात्र हा वाद अखेर पेल्यातील वादळच ठरला आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक