शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जुने गणपती मंदिर स्थलांतरित करण्यावरून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:18 IST

वाहतुकीस अडथळा : विकास आराखड्यानुसार १८ मीटर रस्ता, न्यायालयात दावा विरोधात गेला

मीरा रोड : भार्इंदर पोलीस ठाणे आवारातील जुने गणपती मंदिर रस्त्यात अडथळा ठरते म्हणून दुसरीकडे स्थलांतरित करण्यासाठी आयुक्त, माजी आमदार, नगरसेवक आदींनी केलेल्या पाहणी व चर्चेवरून संतापाचे वातावरण झाले आहे. विकास आराखड्यानुसार येथे १८ मीटर रस्ता असतानाही नाहक वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर, उच्च न्यायालयात दावा विरोधात गेल्याने मंदिर स्थलांतरित करण्याच्या चर्चेसाठी गेल्याचे भाजपा नगरसेवकाचे म्हणणे आहे.

भार्इंदर पश्चिमेला पोलीस ठाण्याच्या आवारातच जुने गणपतीचे मंदिर आहे. ही पोलीस ठाण्याची भिंत व मंदिर पालिका विकास आराखड्यातील १८ मीटर रुंद रस्त्याने बाधित होत असल्याने दोन वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार नरेंद्र मेहतांसह पालिकेने ते हटवण्यासाठी पुढाकार घेतला होता. पोलीस ठाण्याची भिंत तोडून टाकली होती. पण, मंदिराला नागरिकांचा मोठा विरोध झाला होता. दरम्यान, याप्रकरणी आय.जी. खंडेलवाल यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. परंतु, बुधवारी सकाळी माजी आमदार मेहतांसह भाजप नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, पालिका आयुक्त बालाजी खतगावकर, कार्यकारी अभियंता दीपक खांबित, माजी नगरसेवक आसिफ शेख, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव आदींच्या उपस्थितीत मंदिर स्थलांतरित करण्यासाठी पाहणी व चर्चा झाली. ही बाब समजताच भाविकांनी याचा निषेध करत कारवाईस विरोध केला.

या ठिकाणी रस्ता १८ मीटर इतका रुंद असून समोर रस्त्यात असलेला जुना क्रूस ख्रिस्तीबांधवांनी हटवल्यानंतर त्या ठिकाणी चक्क फेरीवाले आणि बेकायदा पार्किंग होत आहे. त्यावर पालिका आणि राजकारणी मूग गिळून आहेत. मंदिरामागे असलेल्या इमारती, बांधकामेही बाधित होत असून ती आधी हटवण्याची गरज आहे. या ठिकाणी मुख्य नाक्यावरील रिक्षातळ पुढे नेला, तर वाहतूककोंडी होणार नाही. पण, यात काहीजण राजकारण करत असून ते चुकीचे असल्याचे प्रदीप भाटिया यांनी सांगितले. बाधित मंदिराची याचिका उच्च न्यायालयात निकाली निघाल्याने याचिकाकर्त्यांच्या विनंतीवरूनच आमचे आमदार मेहता व आम्ही पाहणी आणि चर्चेसाठी गेलो होतो. येथे रस्ता रुंदीकरण आवश्यक असल्याची मेहता व आमची आधीपासूनची भूमिका आहे. पण, नागरिकांच्या सहमतीनेच मंदिर स्थलांतरित केले जाईल, असे भाजप नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी सांगितले. आपण महापालिकेत जात असताना मंदिराजवळ हे सर्व थांबले होते. त्यांनी बोलावून घेतल्याने मी पाहणी व चर्चेत सहभागी झालो, असे पालिका आयुक्त बालाजी खतगावकर म्हणाले. या बाबतीत योग्य ती नियमानुसार कारवाई सहमतीने ठरवली जाईल.आवश्यक नसताना नाहक वादआवश्यकता नसताना नाहक हा वाद राजकारणी आणि प्रशासनाने निर्माण केला असून ज्या ठिकाणी वाहतुकीची व रहदारीची कोंडी होत आहे, अशा ठिकाणी पालिकेने मार्किंग करून दोनदोन वर्षे झाली तरी कारवाई करायला ही राजकारणी मंडळी का जात नाही, असा सवाल वेदाली परळकर यांनी केला आहे.

टॅग्स :thaneठाणेMira Bhayanderमीरा-भाईंदर