शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

ठाण्याच्या वर्तकनगर म्हाडा वसाहतीमध्ये दूषित पाण्यामुळे संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:25 IST

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतील अत्यंत गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना त्वचेचे विकार, सर्दी आणि खोकला असे आजार जडले आहेत. येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे तीन हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यातजिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार ५० सार्वजनिक नळ बसविण्याची मागणी

ठाणे : वर्तकनगर प्रभागातील म्हाडा वसाहतीमधील इमारती तसेच बैठ्या घरांना गेल्या तीन आठवडयांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुरक्षेसाठी या परिसरात ५० सार्वजनिक नळ द्यावेत, अशी मागणी जनता दलाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष धनाजी सुरोसे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.येथील वर्तकनगर, शिवाईनगर भागातील म्हाडा वसाहतीला मुंबई महापालिकेच्या तानसा आणि वैतरणा या वाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सध्या ते शुद्ध न करताच पुरवठा होत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पोलीस वसाहत इमारत क्रमांक ५१ ते ५३ तसेच १४ आणि १६ तसेच इतर इमारतींमधील सुमारे तीन हजार कुटुंबियांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळेच येथील नळांना मातीसारखे लाल गढूळ पाणी येत आहे. या दूषित पाण्याच्या प्रादूर्भावामुळे येथील नागरिकांना त्त्वचारोग, सर्दी, खोकला आणि तापाचे आजार वाढले आहेत. यात लहान मुले आणि वृद्धांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येकालाच विकत पाणी घेणे शक्य नाही. त्यामुळे येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी किमान ५० सार्वजनिक नळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने सुरोसे यांनी आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

‘‘ वर्तकनगर म्हाडा वसाहतीला मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तानसा वाहिनीतून पाणी पुरविले जाते. सध्या ते वैतरणा वाहिनीवर वळविण्यात आले आहे. त्याला क्लोरिंगचा डोस दिला जात असला तरी ते शुद्ध होत नाही. जी नविन बांधकामे आहेत. त्याठिकाकाणी शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. पण, जुन्या वसाहतीमध्ये अशुद्ध पाणी पुरवठ्याची समस्या आहे. पावसाळ्याचे काही दिवस ही समस्या राहील. त्यानंतर हा पाणीपुरवठा सुरळीत होईल.’’अतुल कुलकर्णी, उप अभियंता, पाणीपुरवठा विभाग, ठाणे महापालिका.......................

टॅग्स :thaneठाणेwater pollutionजल प्रदूषणmhadaम्हाडा