शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

ठाण्याच्या वर्तकनगर म्हाडा वसाहतीमध्ये दूषित पाण्यामुळे संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 22:25 IST

गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतील अत्यंत गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना त्वचेचे विकार, सर्दी आणि खोकला असे आजार जडले आहेत. येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे तीन हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यातजिल्हाधिकाऱ्यांकडे केली तक्रार ५० सार्वजनिक नळ बसविण्याची मागणी

ठाणे : वर्तकनगर प्रभागातील म्हाडा वसाहतीमधील इमारती तसेच बैठ्या घरांना गेल्या तीन आठवडयांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुरक्षेसाठी या परिसरात ५० सार्वजनिक नळ द्यावेत, अशी मागणी जनता दलाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष धनाजी सुरोसे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केली आहे.येथील वर्तकनगर, शिवाईनगर भागातील म्हाडा वसाहतीला मुंबई महापालिकेच्या तानसा आणि वैतरणा या वाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सध्या ते शुद्ध न करताच पुरवठा होत असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पोलीस वसाहत इमारत क्रमांक ५१ ते ५३ तसेच १४ आणि १६ तसेच इतर इमारतींमधील सुमारे तीन हजार कुटुंबियांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळेच येथील नळांना मातीसारखे लाल गढूळ पाणी येत आहे. या दूषित पाण्याच्या प्रादूर्भावामुळे येथील नागरिकांना त्त्वचारोग, सर्दी, खोकला आणि तापाचे आजार वाढले आहेत. यात लहान मुले आणि वृद्धांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येकालाच विकत पाणी घेणे शक्य नाही. त्यामुळे येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी किमान ५० सार्वजनिक नळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने सुरोसे यांनी आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

‘‘ वर्तकनगर म्हाडा वसाहतीला मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणा-या तानसा वाहिनीतून पाणी पुरविले जाते. सध्या ते वैतरणा वाहिनीवर वळविण्यात आले आहे. त्याला क्लोरिंगचा डोस दिला जात असला तरी ते शुद्ध होत नाही. जी नविन बांधकामे आहेत. त्याठिकाकाणी शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. पण, जुन्या वसाहतीमध्ये अशुद्ध पाणी पुरवठ्याची समस्या आहे. पावसाळ्याचे काही दिवस ही समस्या राहील. त्यानंतर हा पाणीपुरवठा सुरळीत होईल.’’अतुल कुलकर्णी, उप अभियंता, पाणीपुरवठा विभाग, ठाणे महापालिका.......................

टॅग्स :thaneठाणेwater pollutionजल प्रदूषणmhadaम्हाडा