शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

अंगणवाडीसेविकांचा निवडणुकीच्या कामास गुरुवारपासून विरोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 05:39 IST

मानधन वेळेवर न मिळाल्यामुळे संतापलेल्या ६० हजार अंगणवाडीसेविका २५ एप्रिलपासून केवळ आहारवाटपाचे काम करणार आहेत.

ठाणे : मानधन वेळेवर न मिळाल्यामुळे संतापलेल्या ६० हजार अंगणवाडीसेविका २५ एप्रिलपासून केवळ आहारवाटपाचे काम करणार आहेत. उर्वरित निवडणुकीच्या कामांसह योजनांचे व इतर कोणतेही काम करणार नसल्याचा इशारा त्यांनी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांसह प्रधान सचिव आणि एकात्मिक बालविकास आयुक्तांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.एकात्मिक बालविकास विभागाच्या नियंत्रणात अंगणवाडीसेविका, मदतनीस आदी सुमारे दोन लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना मार्चपासून अद्यापही मानधन मिळालेले नाही. त्या अर्धपोटी काम करत आहेत. गरीब, कष्टकरी कुटुंबातील या सेविका, मदतनीस आदी कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर होत नाही. मार्च महिन्याचे मानधन अजूनही मिळालेले नाही. या मानधनासह एप्रिलचे मानधन १ मे पूर्वीच मिळावे, यासाठी त्यांनी लाभार्थ्यांना आहारवाटपाव्यतिरिक्त करावे लागणारे काम गुरुवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निवडणुकीच्या कामांसह विविध योजनांची कामे, विविध सभांची भागीदारी, अन्य अहवाल आदी कामे अंगणवाडीसेविका, मदतनीस करणार नसल्याचे महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले. याची पूर्वकल्पना मुख्यमंत्री, प्रधान सचिव, आयुक्तांना दिलेली असूनही मार्चचे थकीत मानधन अजून दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.कामबंदचा फटका आहाराच्या लाभार्थ्यांना बसू नये म्हणून सेविका, मदतनीस त्यांचे दैनंदिन आहारवाटपाचे काम सुरू ठेवले आहेत. मात्र, मतदानाच्या दोन दिवस आधी व मतदानाच्या दिवशी मतदारांना चिठ्ठीवाटप करणे, मतदान केंद्रांवरील पाळणाघराचे काम, मतदान अधिकारी आदी लोकसभा निवडणुकीची कामेदेखील २९ एप्रिल रोजी कोकणातील सुमारे ६० हजार अंगणवाडीसेविका करणार नाहीत, असे बृजपालसिंह यांनी सांगितले.‘१ मे पूर्वी मानधन मिळावे’या निवडणुकीच्या कामाविरोधात न्यायालयातदेखील याचिका दाखल करण्यात आली आहे. मार्चचे थकीत व एप्रिलचे मानधन १ मे पूर्वी मिळावे, असा ठोस निर्णय घेतल्याशिवाय निवडणुकीसह कोणतेही कामे करणार नसल्याचे बृजपालसिंह यांनी निदर्शनात आणून दिले. यामुळे लोकसभेच्या मतदान केंद्रांवरील विविध कामांवर त्यांचा परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक