शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अंगणवाडीसेविकांचा निवडणुकीच्या कामास गुरुवारपासून विरोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 05:39 IST

मानधन वेळेवर न मिळाल्यामुळे संतापलेल्या ६० हजार अंगणवाडीसेविका २५ एप्रिलपासून केवळ आहारवाटपाचे काम करणार आहेत.

ठाणे : मानधन वेळेवर न मिळाल्यामुळे संतापलेल्या ६० हजार अंगणवाडीसेविका २५ एप्रिलपासून केवळ आहारवाटपाचे काम करणार आहेत. उर्वरित निवडणुकीच्या कामांसह योजनांचे व इतर कोणतेही काम करणार नसल्याचा इशारा त्यांनी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांसह प्रधान सचिव आणि एकात्मिक बालविकास आयुक्तांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.एकात्मिक बालविकास विभागाच्या नियंत्रणात अंगणवाडीसेविका, मदतनीस आदी सुमारे दोन लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना मार्चपासून अद्यापही मानधन मिळालेले नाही. त्या अर्धपोटी काम करत आहेत. गरीब, कष्टकरी कुटुंबातील या सेविका, मदतनीस आदी कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर होत नाही. मार्च महिन्याचे मानधन अजूनही मिळालेले नाही. या मानधनासह एप्रिलचे मानधन १ मे पूर्वीच मिळावे, यासाठी त्यांनी लाभार्थ्यांना आहारवाटपाव्यतिरिक्त करावे लागणारे काम गुरुवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निवडणुकीच्या कामांसह विविध योजनांची कामे, विविध सभांची भागीदारी, अन्य अहवाल आदी कामे अंगणवाडीसेविका, मदतनीस करणार नसल्याचे महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले. याची पूर्वकल्पना मुख्यमंत्री, प्रधान सचिव, आयुक्तांना दिलेली असूनही मार्चचे थकीत मानधन अजून दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.कामबंदचा फटका आहाराच्या लाभार्थ्यांना बसू नये म्हणून सेविका, मदतनीस त्यांचे दैनंदिन आहारवाटपाचे काम सुरू ठेवले आहेत. मात्र, मतदानाच्या दोन दिवस आधी व मतदानाच्या दिवशी मतदारांना चिठ्ठीवाटप करणे, मतदान केंद्रांवरील पाळणाघराचे काम, मतदान अधिकारी आदी लोकसभा निवडणुकीची कामेदेखील २९ एप्रिल रोजी कोकणातील सुमारे ६० हजार अंगणवाडीसेविका करणार नाहीत, असे बृजपालसिंह यांनी सांगितले.‘१ मे पूर्वी मानधन मिळावे’या निवडणुकीच्या कामाविरोधात न्यायालयातदेखील याचिका दाखल करण्यात आली आहे. मार्चचे थकीत व एप्रिलचे मानधन १ मे पूर्वी मिळावे, असा ठोस निर्णय घेतल्याशिवाय निवडणुकीसह कोणतेही कामे करणार नसल्याचे बृजपालसिंह यांनी निदर्शनात आणून दिले. यामुळे लोकसभेच्या मतदान केंद्रांवरील विविध कामांवर त्यांचा परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक