शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

निवडणुकीच्या कामास अंगणवाडी सेविकांचा गुरूवारपासून विरोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 19:50 IST

एकात्मिक बालविकास विभागाच्या नियंत्रणात अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी सुमारे दोन लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना मार्चपासून अजून ही मानधन मिळालेले नाही. त्या अर्ध्यापोटी काम करीत आहेत. गरीब, कष्ठकरी कुटुंबातील या सेविका, मदतीनस आदी कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर होत नाही, मार्च महिन्याचे माधन अजूनही मिळालेले नाही. या मानधनासह एप्रिलचे मानधन १ मे पूर्वीच मिळावे, यासाठी त्यांनी लाभार्थ्यांना आहार वाटपा व्यतिरिक्त करावे लागणारे कामे गुरूवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला

ठळक मुद्देकाम बंदचा फटका आहाराच्या लाभार्थ्यांना बसू नये म्हणून सेविका, मदतनीस त्यांचे दैनंदिन आहार वाटपाचे काम सुरूलोकसभा निवडणुकीचे कामे देखील २९ एप्रिल रोजी कोकणातील सुमारे ६० हजार अंगणवाडी सेविका करणार नाहीमार्च महिन्याचे मानधनासह एप्रिलचे मानधन १ मे पूर्वीच मिळावे

ठाणे : मानधन वेळेवर न मिळाल्यामुळे संतापलेल्या ६० हजार अंगणवाडी सेविका २५ एप्रिलपासून केवळ आहार वाटपाचे काम करणार आहेत, उर्वरित निवडणुकीच्या कामांसह योजनांचे व इतर कोणतेही कामे करणार नसल्याचा ईशारा त्यांनी महाराष्ट्र  राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांसह प्रधान सचिव आणि एकात्मिक बालविकास आयुक्तांना लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.एकात्मिक बालविकास विभागाच्या नियंत्रणात अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी सुमारे दोन लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना मार्चपासून अजून ही मानधन मिळालेले नाही. त्या अर्ध्यापोटी काम करीत आहेत. गरीब, कष्ठकरी कुटुंबातील या सेविका, मदतीनस आदी कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर होत नाही, मार्च महिन्याचे माधन अजूनही मिळालेले नाही. या मानधनासह एप्रिलचे मानधन १ मे पूर्वीच मिळावे, यासाठी त्यांनी लाभार्थ्यांना आहार वाटपा व्यतिरिक्त करावे लागणारे कामे गुरूवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निवडणुकीच्या कामांसह विविध योजनांचे कामे, विविध सभांची भागिदारी, अन्य अहवाल आदी कामे अंगणवाडी सेविका, मदतनीस करणार नसल्याचे महाराष्ट्र  राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी सांगितले. याची पूर्व कल्पना मुख्यमंत्री, प्रधानसचिव, आयुक्तांना दिलेली असूनही मार्चचे थकीत मानधन अजून दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.काम बंदचा फटका आहाराच्या लाभार्थ्यांना बसू नये म्हणून सेविका, मदतनीस त्यांचे दैनंदिन आहार वाटपाचे काम सुरू ठेवले आहेत. मात्र मतदानाच्या दोन दिवस आधी व मतदानाच्या दिवशी मतदारांना चिट्टी वाटप करणे, मतदान केद्रांवरील पाळणा घराचे काम, मतदान अधिकारी आदी लोकसभा निवडणुकीचे कामे देखील २९ एप्रिल रोजी कोकणातील सुमारे ६० हजार अंगणवाडी सेविका करणार नाही, असे बृजपालसिंह यांनी सांगितले. या निवडणुकीच्या कामा विरोधात न्यायालयात देखील याचिका दाखल केली असल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले आहेत. मार्चचे थकीत व एप्रिलचे मानधन १ मे पूर्वी मिळावे, असे ठोस निर्णय घेतल्या शिवाय सेविका, मदतनीस निवडणुकीसह कोणतेही कामे करणार नसल्याचे त्यांनी निदर्शनात आणून दिले आहे. यामुळे लोकसभेच्या मतदान केंद्रांवरील विविध कामांवर त्यांचा परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक