शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

अंबरनाथमधील जीआयपी धरणाची तातडीने दुरुस्ती करा- खा. डॉ. शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 18:11 IST

अंबरनाथजवळील रेल्वेच्या जीआयपी धरणाच्या भिंतीला मोठ्या चिरा गेल्या असून, या चिरांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्यामुळे भिंतीला धोका निर्माण झाला आहे.

ठाणे, दि. 28 - अंबरनाथजवळील रेल्वेच्या जीआयपी धरणाच्या भिंतीला मोठ्या चिरा गेल्या असून, या चिरांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्यामुळे भिंतीला धोका निर्माण झाला आहे. धरण फुटण्याच्या शक्यतेमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण आहे. यामुळे २० लाखांहून अधिक नागरिकांच्या जिवाला धोका उत्पन्न झाला असून, या धरणाची ताबडतोब डागडुजी करण्याची आग्रही मागणी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शुक्रवारी लोकसभेत केली. त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची व्यक्तिश: भेट घेऊन त्यांच्याशीही या विषयावर सविस्तर चर्चा केली.

शून्य प्रहरात धरणाच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करताना खा. डॉ. शिंदे म्हणाले की, या ब्रिटिशकालीन धरणाच्या पाण्याचा वापर पूर्वी वाफेच्या इंजिनासाठी केला जायचा. सध्या या पाण्याचा वापर रेल नीर प्रकल्पासाठी केला जात असून, या धरणातून दररोज २० लाख लीटर पाण्याचा पुरवठा रेल नीर प्रकल्पाला केला जातो. मात्र, धरणाच्या सुरक्षिततेकडे रेल्वेचे दुर्लक्ष होत असून धरणाला अनेक ठिकाणी चिरा पडल्या आहेत. या चिरांमधून पाण्याची धार लागली आहे. धरणाच्या भिंतीला धरून जंगल माजले असून वड, पिंपळासारख्या झाडांची मुळे खोलवर गेल्यामुळे धरणाच्या भिंतीलाच धोका निर्माण झाला आहे.धरणाच्या खालच्या बाजूस कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आदी शहरे, तसेच अनेक गावांचा समावेश असून २० लाखांहून अधिक नागरिकांच्या जीवितालाच धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने या धरणाची दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी खा. डॉ. शिंदे यांनी लोकसभेत केली. त्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन खा. डॉ. शिंदे यांनी या विषयावर सविस्तर चर्चा केली. तसेच त्यांना धरणाच्या भिंतीतून सुरू असलेल्या गळतीचे फोटोही दाखवले. धरणाच्या परिस्थितीविषयी सविस्तर विवेचन करून खा. डॉ. शिंदे यांनी तातडीने या धरणाच्या दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी विनंती प्रभू यांच्याकडे केली.