शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस संपविण्याचे काम ठाण्यात आव्हाडांनीच केले, अजितदादा गटाच्या आनंद परांजपेंचा दावा

By अजित मांडके | Updated: March 14, 2024 19:00 IST

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात आव्हाडांची पत्रकार परिषद

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: एकीकडे ठाण्यात राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने ठाण्यातील काँग्रेसमध्ये दोन गटातील वाद उफाळून आला असताना आणि आव्हाडांनी ही यात्रा मुंब्य्रातून वळविली असल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्याने केला, असा दावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आव्हाडांबाबत केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'चे संयोजन करणाऱ्या आव्हाड यांनी, ठाण्यात काँग्रेस संपविण्याचे काम केले असल्याचा गंभीर आरोप परांजपे यांनी केला. ठाणे महापालिकेच्या २०१७ निवडणुकीत कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसला एकही तिकीट आमदार  जितेंद्र आव्हाड यांनी दिली नसल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ठाणे जिल्ह्यात येणार आहे. त्या निमित्ताने ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. परंतु ही पत्रकार परिषद आव्हाडांनी का घेतली असा सवाल काँग्रेसचे प्रदेश सचिव मनोज शिंदे यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी यात्रेचा मार्ग का बदलला असा सवालही उपस्थित केला. त्यानंतर आता परांजपे यांनी थेट आव्हाड यांचे नाव घेत त्यांच्यावर ठाण्यात काँग्रेस संपविल्याचा आरोप केला आहे.

सिन्नरच्या सभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बेछूट असे आरोप केले. माझ्याबरोबर सकाळी ६ वाजता देवगिरी बंगल्यावर चला आणि आलेला समुदाय पहा. महाराष्ट्रातल्या कानाकोपºयातून लोक आपले प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी साडेपाच पावणेसहा पासून देवगिरी बंगल्यावर रांग लावतात. पण आपल्याला कदाचित सकाळी उठायची सवय नसेल कारण आपले रात्रीस खेळ चालतो, अशी आपली प्रवृत्ती आहे असेही परांजपे म्हणाले. सकाळी सहा वाजल्यापासून अजित पवार जनसेवा करतात. बैलाचे शिंग देखील आपल्याला लागले तर चालायला त्रास होईल, हाच माझा आपल्याला सल्ला आहे असे परांजपे यांनी सांगितले.

आव्हाड यांनी शिवसेनेला २०१९ पर्यंत विरोध केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध केला. धर्मवीर आनंद दिघे यांचा दुस्वास केला. पण मुंब्रा येथील शाखा पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांबरोबर जितेंद्र आव्हाड होते. कळव्याची शिवसेनेची शाखा व खारीगाव नाका येथील शाखा आव्हाड यांच्यामुळे तुटली असा आरोप देखील त्यांनी केला.

मुख्यमत्र्यांनी आश्वासित केले, वाद मिटला!

बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे हे पक्षापेक्षा वेगळी भूमिका मांडत आहेत. त्याबद्दल आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी तटकरे यांना आश्वासित केले आहे की, विजय शिवतारे यांना बोलवून योग्य ती समज देईन. यामुळे स्थानिक पातळीवर या विषयावर पडदा टाकलेला आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी या तीनही मतदारसंघातुन महायुतीचे उमेदवार विजयी करणे हा आमचा संकल्प आहे असे परांजपे म्हणाले.

 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधी