शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कॉंग्रेसची विस्तारीत कार्यकारणीची बैठक होणार ठाण्यात

By अजित मांडके | Updated: April 6, 2023 14:42 IST

राज्यातील दिग्गज नेते लावणार हजेरी, कॉंग्रेस करणार शक्तीप्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कॉंग्रेसची ठाण्यात गेलेली पत परत मिळविण्यासाठी कॉंग्रेसने पुन्हा हालचाली सुरु केल्या आहेत. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी यात पुढे निघाली आहे. त्यामुळे कॉंग्रेस मागे कशी राहिली. त्यांनी देखील आता ठाण्याकडे पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार आता ठाण्यात पहिल्यांदाच राज्यातील दिग्गज नेत्यांची फळी ठाण्यात अवतरनार आहे. ठाण्यात विस्तारीत कार्यकारणीची बैठक येत्या १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.

कॉंग्रेसच्या वतीने जय भारत सत्याग्रह हा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या विस्तारीत कार्यकारणीची बैठक प्रदेश प्रभारी एच. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण तसेच प्रदेश कार्याध्यक्ष, सहप्रभारी आदींसह इतर दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. येत्या १० एप्रिल रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे सकाळी ११ वाजता ही बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीत नवीन कार्यकारणीची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठरावही केले जाणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिली. तसेच या निमित्ताने जय भारत यात्रेचा शुभांरभ केला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी सत्याग्रह आणि स्वातंत्रविरांची रॅली देखील काढली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यातून गटबाजीला तिलांजली दिली जाणार असून मतदारापर्यंत कॉंग्रेसचा प्रयत्न असणार आहे.

एकूणच मागील काही महिन्यापूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर ठाकरे गट आणि राष्ट्रवादी जनतेची सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच ठाण्यात रोशनी शिंदे हिला झालेल्या मारहाणीनंतर ठाणेकरांची सहानभुती मिळविण्यासाठी महाविकास आघाडीने मोर्चो काढला होता. परंतु यात ठाकरे गट आणि राष्ट्रवादीची छाप दिसून आली. त्यात कॉंग्रेस काहीसा मागे पडल्याचे दिसून आले आहे. परंतु आता कॉंग्रेसला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी आता कॉंग्रेसने देखील ठाण्याकडे लक्ष केंद्रीत केल्याचे या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिसत आहे. त्यामुळे या विस्तारीत कार्यकारणीच्या बैठकीच्या माध्यमातून कॉंग्रेस शक्तीप्रदर्शनही करणार असल्याचे दिसत आहे.

 राहुल गांधी यांनी सावरकरांचा विरोध केला असतांना शहर कॉंग्रेसच्या वतीने या विस्तारीत बैठकीच्या अनुषंगांना स्वांतत्र्यविरांची यात्रा काढणार आहे. यात सावरकरांचा देखील सन्मान केला जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. सावरकर हे मराठी असून ते महाराष्टÑातील होते. त्यामुळे त्यांचा सन्मान केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :congressकाँग्रेस