शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

अमृतकुंभ धरणामुळे होणार २०० गावपाड्यांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 00:44 IST

शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कसारा घाटातील खोऱ्यात अमृतकुंभ जलसागर धरण उभारावे

ठाणे : शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कसारा घाटातील खोऱ्यात अमृतकुंभ जलसागर धरण उभारावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी लावून धरली आहे. त्यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे शहापूरकरांचे लक्ष लागून आहे.या नियोजित धरणातून गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणीपुरवठा झाल्यास शहापूर तालुक्यातील सुमारे २०० गावपाड्यांची पाणीटंचाईतून कायमची मुक्तता होईल, याकडे डावखरे यांनी लक्ष वेधले आहे. एकीकडे मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे असतानाच, शहापूरच्या आदिवासी दुर्गम भागातील सुमारे २०० गाव-पाड्यांतील ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत असल्याचे वास्तव चित्र आहे. पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहे. याचे वास्तव शहापूरच्या गावखेड्यांना भेटी दिल्यानंतर डावखरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले आहे. या दौºयाप्रसंगी खर्र्डी विभाग कुणबी समाजोन्नती संघाचे पदाधिकारी त्र्यंबक डोंगरे, प्रकाश सांडे आणि भरत पांढरे यांनी या अमृतकुंभ जलसागर धरणाच्या प्रस्तावाकडे डावखरे यांचे लक्ष वेधले. त्यास अनुसरून त्यांनी या धरणासाठी आता मुख्यमंत्र्याना साकडे घातले आहे.शहापूर तालुक्याच्या उत्तरेकडील घाटनदेवी माता मंदिराच्या दक्षिण बाजूला आणि कसारा घाट रस्त्याच्या डावीकडील खोऱ्यांमधील पाच ते सात दºयांच्या परिसरात धरण बांधता येणार आहे.प्रस्तावित धरणाचा परिसर शहापूर तालुक्याच्या २०० ते ५०० मीटर उंच भूभागावर असल्याने गुरु त्वाकर्षण पद्धतीने गावांना सहजपणे पाणीपुरवठा होईल. प्रस्तावित धरणाची जमीन वन विभागाच्या मालकीची असून, धरणाच्या परिसरात एकही गाव वसलेले नाही. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार नाही.>साखरोली, मानिवली धरणातील गाळ उपसण्याची गरजशहापूर तालुक्यातील साखरोली व मुरबाड तालुक्यातील मानिवली येथील धरणांमध्ये गाळ साचला असल्याचे निदर्शनास आले. गाळ काढण्याबरोबरच दोन्ही तलावांचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यास परिसराला चांगला पाणीसाठा होण्याबरोबरच विहिरी व विंधण विहीरींच्या पाणीपातळीतही वाढ होऊ शकेल. या पार्श्वभूमीवर दोन्ही धरणातील गाळ काढण्यासह खोली तसेच रुंदीकरणासाठी डावखरे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांना पत्र दिले.>टंचाईमुक्त होणारा परिसर : शहापूर तालुक्यातील खर्डी, वाशाळा, तलवाडा-डोळखांब, कसारा-मोखावणे, अजनूप, शिरोळ, वरस्कोळ, दहिगाव, पळशीण, आटगाव, भोसपाडा, आंबिवली, टेंभा, बेलवड, धामणी, जरंडी, गोलभण, दळखण, बिरवाडी, चांदे, कानविंदे, पेंढरघोळ, कळमगाव, पेंढरघोळ, किन्हवली आदी परिसराची प्रस्तावित धरण झाल्यास पाणीटंचाईतून मुक्तता होऊ शकेल.