शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमृतकुंभ धरणामुळे होणार २०० गावपाड्यांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 00:44 IST

शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कसारा घाटातील खोऱ्यात अमृतकुंभ जलसागर धरण उभारावे

ठाणे : शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कसारा घाटातील खोऱ्यात अमृतकुंभ जलसागर धरण उभारावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी लावून धरली आहे. त्यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे शहापूरकरांचे लक्ष लागून आहे.या नियोजित धरणातून गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणीपुरवठा झाल्यास शहापूर तालुक्यातील सुमारे २०० गावपाड्यांची पाणीटंचाईतून कायमची मुक्तता होईल, याकडे डावखरे यांनी लक्ष वेधले आहे. एकीकडे मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे असतानाच, शहापूरच्या आदिवासी दुर्गम भागातील सुमारे २०० गाव-पाड्यांतील ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत असल्याचे वास्तव चित्र आहे. पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहे. याचे वास्तव शहापूरच्या गावखेड्यांना भेटी दिल्यानंतर डावखरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले आहे. या दौºयाप्रसंगी खर्र्डी विभाग कुणबी समाजोन्नती संघाचे पदाधिकारी त्र्यंबक डोंगरे, प्रकाश सांडे आणि भरत पांढरे यांनी या अमृतकुंभ जलसागर धरणाच्या प्रस्तावाकडे डावखरे यांचे लक्ष वेधले. त्यास अनुसरून त्यांनी या धरणासाठी आता मुख्यमंत्र्याना साकडे घातले आहे.शहापूर तालुक्याच्या उत्तरेकडील घाटनदेवी माता मंदिराच्या दक्षिण बाजूला आणि कसारा घाट रस्त्याच्या डावीकडील खोऱ्यांमधील पाच ते सात दºयांच्या परिसरात धरण बांधता येणार आहे.प्रस्तावित धरणाचा परिसर शहापूर तालुक्याच्या २०० ते ५०० मीटर उंच भूभागावर असल्याने गुरु त्वाकर्षण पद्धतीने गावांना सहजपणे पाणीपुरवठा होईल. प्रस्तावित धरणाची जमीन वन विभागाच्या मालकीची असून, धरणाच्या परिसरात एकही गाव वसलेले नाही. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार नाही.>साखरोली, मानिवली धरणातील गाळ उपसण्याची गरजशहापूर तालुक्यातील साखरोली व मुरबाड तालुक्यातील मानिवली येथील धरणांमध्ये गाळ साचला असल्याचे निदर्शनास आले. गाळ काढण्याबरोबरच दोन्ही तलावांचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यास परिसराला चांगला पाणीसाठा होण्याबरोबरच विहिरी व विंधण विहीरींच्या पाणीपातळीतही वाढ होऊ शकेल. या पार्श्वभूमीवर दोन्ही धरणातील गाळ काढण्यासह खोली तसेच रुंदीकरणासाठी डावखरे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांना पत्र दिले.>टंचाईमुक्त होणारा परिसर : शहापूर तालुक्यातील खर्डी, वाशाळा, तलवाडा-डोळखांब, कसारा-मोखावणे, अजनूप, शिरोळ, वरस्कोळ, दहिगाव, पळशीण, आटगाव, भोसपाडा, आंबिवली, टेंभा, बेलवड, धामणी, जरंडी, गोलभण, दळखण, बिरवाडी, चांदे, कानविंदे, पेंढरघोळ, कळमगाव, पेंढरघोळ, किन्हवली आदी परिसराची प्रस्तावित धरण झाल्यास पाणीटंचाईतून मुक्तता होऊ शकेल.