शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

अमृतकुंभ धरणामुळे होणार २०० गावपाड्यांना लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 00:44 IST

शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कसारा घाटातील खोऱ्यात अमृतकुंभ जलसागर धरण उभारावे

ठाणे : शहापूर तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी कसारा घाटातील खोऱ्यात अमृतकुंभ जलसागर धरण उभारावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी लावून धरली आहे. त्यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे शहापूरकरांचे लक्ष लागून आहे.या नियोजित धरणातून गुरुत्वाकर्षण पद्धतीने पाणीपुरवठा झाल्यास शहापूर तालुक्यातील सुमारे २०० गावपाड्यांची पाणीटंचाईतून कायमची मुक्तता होईल, याकडे डावखरे यांनी लक्ष वेधले आहे. एकीकडे मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे असतानाच, शहापूरच्या आदिवासी दुर्गम भागातील सुमारे २०० गाव-पाड्यांतील ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण भटकत असल्याचे वास्तव चित्र आहे. पाण्याची पातळी खोल गेल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहे. याचे वास्तव शहापूरच्या गावखेड्यांना भेटी दिल्यानंतर डावखरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले आहे. या दौºयाप्रसंगी खर्र्डी विभाग कुणबी समाजोन्नती संघाचे पदाधिकारी त्र्यंबक डोंगरे, प्रकाश सांडे आणि भरत पांढरे यांनी या अमृतकुंभ जलसागर धरणाच्या प्रस्तावाकडे डावखरे यांचे लक्ष वेधले. त्यास अनुसरून त्यांनी या धरणासाठी आता मुख्यमंत्र्याना साकडे घातले आहे.शहापूर तालुक्याच्या उत्तरेकडील घाटनदेवी माता मंदिराच्या दक्षिण बाजूला आणि कसारा घाट रस्त्याच्या डावीकडील खोऱ्यांमधील पाच ते सात दºयांच्या परिसरात धरण बांधता येणार आहे.प्रस्तावित धरणाचा परिसर शहापूर तालुक्याच्या २०० ते ५०० मीटर उंच भूभागावर असल्याने गुरु त्वाकर्षण पद्धतीने गावांना सहजपणे पाणीपुरवठा होईल. प्रस्तावित धरणाची जमीन वन विभागाच्या मालकीची असून, धरणाच्या परिसरात एकही गाव वसलेले नाही. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार नाही.>साखरोली, मानिवली धरणातील गाळ उपसण्याची गरजशहापूर तालुक्यातील साखरोली व मुरबाड तालुक्यातील मानिवली येथील धरणांमध्ये गाळ साचला असल्याचे निदर्शनास आले. गाळ काढण्याबरोबरच दोन्ही तलावांचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यास परिसराला चांगला पाणीसाठा होण्याबरोबरच विहिरी व विंधण विहीरींच्या पाणीपातळीतही वाढ होऊ शकेल. या पार्श्वभूमीवर दोन्ही धरणातील गाळ काढण्यासह खोली तसेच रुंदीकरणासाठी डावखरे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. यासाठी जिल्हाधिकाºयांना पत्र दिले.>टंचाईमुक्त होणारा परिसर : शहापूर तालुक्यातील खर्डी, वाशाळा, तलवाडा-डोळखांब, कसारा-मोखावणे, अजनूप, शिरोळ, वरस्कोळ, दहिगाव, पळशीण, आटगाव, भोसपाडा, आंबिवली, टेंभा, बेलवड, धामणी, जरंडी, गोलभण, दळखण, बिरवाडी, चांदे, कानविंदे, पेंढरघोळ, कळमगाव, पेंढरघोळ, किन्हवली आदी परिसराची प्रस्तावित धरण झाल्यास पाणीटंचाईतून मुक्तता होऊ शकेल.