शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

अंबरनाथचा तावली डोंगर खचतोय..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 00:51 IST

डोंबिवलीपासून बदलापूरपर्यंतच्या भागातून हा तीन टोकांचा तावलीचा डोंगर दिसतो. मलंगगडाच्या डोंगररांगेतील हा उंच डोंगर असून त्या डोंगराला सध्या तडा गेला आहे.

अंबरनाथ : तालुक्यातला तीन टोकांचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेला तावलीचा डोंगर खचायला सुरुवात झाली आहे. या डोंगराचे एक टोक ढासळले असून यामुळे मोठ्या प्रमाणात दगड-धोंडे, मोठमोठे खडक खाली आले आहेत. डोंबिवलीपासून बदलापूरपर्यंतच्या भागातून हा तीन टोकांचा तावलीचा डोंगर दिसतो. मलंगगडाच्या डोंगररांगेतील हा उंच डोंगर असून त्या डोंगराला सध्या तडा गेला आहे. या तीन टोकांपैकी मधल्या टोकावर काही दिवसांपूर्वी वीज कोसळली. तेव्हापासून हा भाग खचायला सुरुवात झाली. सध्या या डोंगराचा लक्षणीय भाग ढासळला असून मधल्या भागात एक मोठा पट्टा तयार झाला आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात दगड, धोंडे, मोठे खडक सातत्याने खाली येत आहेत. या डोंगरातून उगम पावणारा ओढा हा अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाचा प्रमुख जलस्रोत आहे. मात्र, सध्या हा ओढाही बुजण्याच्या मार्गावर आहे. शिवाय, हेच दगड-धोंडे चिखलोली धरणाच्या पात्रात जात असल्याने चिखलोली धरणाच्या भिंतीवर दाब वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे. महसूल विभाग, वनविभाग, लघुपाटबंधारे विभागाने अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही.अंबरनाथमधील निसर्गमित्र सुधाकर झोरे हे यासाठी पाठपुरावा करत आहेत. शिवाय, स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांनीही याबाबत पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अजून तरी शासकीय यंत्रणेला जाग आलेली नाही.