शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

अंबरनाथचा काकोळे पूल धोकादायक, अपघाताची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 09:02 IST

अपघाताची भीती : नवीन पूल उभारण्याची स्थानिकांची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीला जोडणारा आणि काटई नाका ते कर्जतकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावरील काकोळे गावचा पूल धोकादायक झाला आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद करून त्याठिकाणी नवीन पूल उभारावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

काटई नाक्यावरून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग हा अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीला जोडला आहे. या एमआयडीसीजवळ काकोळे गाव असून, राज्य महामार्गावरून काकोळे वळणावर उभारलेला पूल धोकादायक झाला आहे. या पुलाखालून वालधुनी नदी वाहत असून,हा पूल कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या राज्य महामार्गाचे काम करताना कर्जत दिशेकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन पूल उभारण्यात आला असून,काटई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल अजूनही तसाच ठेवण्यात आला आहे. 

वास्तविक,या पुलाचीही नव्याने उभारणी करणे गरजेचे होते. मात्र,निधीअभावी या पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तो धोकादायक ठरवावा आणि त्या ठिकाणी नव्याने पूल उभारावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. जर वाहतूक सुरु ठेवल्यास अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सळ्या गंजल्या, काँक्रिटचा थर निखळला राज्य महामार्गावरील वालधुनी नदीवरील हा पूल महत्त्वपूर्ण असून,त्या ठिकाणी कोणताही अपघात होऊ नये, यासाठी वेळीच नवीन पूल उभारण्याची गरज व्यक्त होत आहे. या पुलावरील लोखंडी सळ्या पूर्णपणे गंजल्या असून,अनेक ठिकाणी काँक्रिटचा थर निखळून पडला आहे. या पुलावर अनेकवेळा अपघात घडले असून, ते टाळण्यासाठी नवीन पूल बांधणे हा एकमेव पर्याय आहे.

टॅग्स :thaneठाणे