शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अंबरनाथचा काकोळे पूल धोकादायक, अपघाताची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 09:02 IST

अपघाताची भीती : नवीन पूल उभारण्याची स्थानिकांची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीला जोडणारा आणि काटई नाका ते कर्जतकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावरील काकोळे गावचा पूल धोकादायक झाला आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद करून त्याठिकाणी नवीन पूल उभारावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

काटई नाक्यावरून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग हा अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीला जोडला आहे. या एमआयडीसीजवळ काकोळे गाव असून, राज्य महामार्गावरून काकोळे वळणावर उभारलेला पूल धोकादायक झाला आहे. या पुलाखालून वालधुनी नदी वाहत असून,हा पूल कोसळल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या राज्य महामार्गाचे काम करताना कर्जत दिशेकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवीन पूल उभारण्यात आला असून,काटई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल अजूनही तसाच ठेवण्यात आला आहे. 

वास्तविक,या पुलाचीही नव्याने उभारणी करणे गरजेचे होते. मात्र,निधीअभावी या पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तो धोकादायक ठरवावा आणि त्या ठिकाणी नव्याने पूल उभारावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. जर वाहतूक सुरु ठेवल्यास अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सळ्या गंजल्या, काँक्रिटचा थर निखळला राज्य महामार्गावरील वालधुनी नदीवरील हा पूल महत्त्वपूर्ण असून,त्या ठिकाणी कोणताही अपघात होऊ नये, यासाठी वेळीच नवीन पूल उभारण्याची गरज व्यक्त होत आहे. या पुलावरील लोखंडी सळ्या पूर्णपणे गंजल्या असून,अनेक ठिकाणी काँक्रिटचा थर निखळून पडला आहे. या पुलावर अनेकवेळा अपघात घडले असून, ते टाळण्यासाठी नवीन पूल बांधणे हा एकमेव पर्याय आहे.

टॅग्स :thaneठाणे