शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

अंबरनाथचे बारवी धरण कोणत्याही क्षणी भरणार, दरवाजे आपोआप उघडणार; धरणाखालील गावांना सतर्कतेचा इशारा

By सुरेश लोखंडे | Updated: July 27, 2023 16:39 IST

सततच्या पावसामुळे या बारवी धरणात पाण्याचा येवा सतत सुरू आहे. त्यामुळे पाणीपातळीत सतत वाढ होत आहे.

ठाणे : जिल्हह्यात संततधार पाऊस सुरू आहे. पाणी पुरवठा करणाºया धरणांच्या पाणलोटातही या पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे तानसा धरणाच्या पाठोपाठ आता बारवी धरण कोणत्याही क्षणी भरून त्याचे ११ स्वयंचलित दरवाजे (वक्र व्दारे) आपोआप उघडणार आहेत. सध्या या धरणाची पाणी पातळी ७०. ८० मीटर झाली आहे. सततच्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी ७२.६० मीटर होताच धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी आपोआप उघडल्या जाणार आहे. त्यामुळे या धरणातील पाण्याचा मोठ्याप्रमाणात विसर्ग होऊन धरणाखालील पाण्याचा वेग वाढणार. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून धरणाखालील व बारवी नदी काठावरील शहरांसह १२ गांवपाड्यांना सतर्कतचा इशारा एमआयडीसीने जारी केला आहे.

सततच्या पावसामुळे या बारवी धरणात पाण्याचा येवा सतत सुरू आहे. त्यामुळे पाणीपातळीत सतत वाढ होत आहे. या धरणाची उच्चतम विसर्ग पाणी पातळी ७२.६० मी. होताच धरणाचे ११ स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार आहे.त्यामुळे बारवी नदीच्या या धरणाखाली पाण्याचा प्रवाह वाढून त्याचा वेगही वाढणार आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून या धरणाखालील व नदी काठावरील तब्बल १२ गांवाना सतर्कतेचा इशारा एमआयडीसीने जारी केला आहे. सद्यस्थितीतील अतिवृष्टीमुळे या धरण परिसरातील उल्हास नदीत पूर परिस्थिती उद्भवलेली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करणे शक्य होत नसल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होत आहे. या सर्व बाबींचा विचार करता धरणाची पाणी पातळी कधीही ७२.६० मी. तलांक गाठुन स्वयंचलित वक्रद्वारे आपोआप उघडले जाणार आहे. त्यामुळे बारवी धरणातून बारवी नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात सुरु होऊ शकतो.'

बारवी नदीच्या तीरावरील विशेषत: अस्नोली, चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागांव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, मोयाचापाडा, चोण, रहाटोली व नदी काठावरील इतर शहरे व शहरातील सरकारी यंत्रणा, गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील आदींना गांवातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्याचे एमआयडीसीने सुचीत केले आहे. या कालावधीत कोणीही नागरीक, ग्रामस्था आणि पर्यटकांनी नदीच्या पात्रात उतरू नये. पोहण्यास मज्जाव करण्याचा सूचना या एमआयडीसीच्या बारवी धरण कार्यकारी अभियंता यांनी जारी केल्या आहेत.धरणातील पाणी साठा व टक्केवारी- भातसा धरणात  ६०२.८० (६३.९८ टक्के) दशलक्ष घनमीटर (दलघमी.) बारवीत  २८७.२२ (८५ टक्के) दलघमी. पाणी साठा झाला. आंध्रा धरणात २१६.५१ (६३.८४ टक्के)दलघमी साठा मध्ये वैतरणात १३७ (७०.७९ टक्के) दलघमी तर अप्पर वैतरणात १७९.५३ (५४.१९ टक्के) दलघमी साठा आहे. मोडक सागरमध्ये ११७.९६ (९१.४९ टक्के) दलघमी  पाणी साठा आजपर्यंत झाला आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ