शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

अंबरनाथकर त्रस्त : स्कायवॉकला फेरीवाल्यांचा गराडा,पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:19 IST

अंबरनाथ शहरातील रेल्वे पादचारी पुलावर एकही फेरीवाला बसत नाही. पण, या पुलाला लागून असलेल्या स्कायवॉकला मात्र फेरीवाल्यांनी गराडा घातला आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील रेल्वे पादचारी पुलावर एकही फेरीवाला बसत नाही. पण, या पुलाला लागून असलेल्या स्कायवॉकला मात्र फेरीवाल्यांनी गराडा घातला आहे. पालिकेचा अतिक्रमण विभाग या फेरीवाल्यांवर कारवाई करत नसल्यानेच या पुलावर त्यांची दादागिरी वाढल्याचे चित्र आहे. एल्फिन्स्टन येथील रेल्वे पादचारी पुलावरील अपघातानंतर सर्वच स्थानकातील पूल आणि पुलावरील फेरीवाल्यांच्या बाबतीत रेल्वे प्रशासन ठोस निर्णय घेत आहे.अंबरनाथ रेल्वे स्थानकात बाहेर पडण्यासाठी दोन पादचारी पूल आहेत. मात्र, त्यापैकी कर्जत दिशेकडे असलेल्या पुलाचाच वापर ९० टक्के प्रवासी करतात. त्यामुळे या पुलावरून बाहेर पडणाºया प्रवाशांना ग्राहक बनवण्यासाठी फेरीवाले याच पुलावर आपला बाजार मांडत होते. एल्फिन्स्टनच्या प्रकारानंतर रेल्वे पुलावरून सर्व फेरीवाल्यांना बाहेर काढत रेल्वे सुरक्षा दलाने आपली जबाबदारी योग्यरीत्या हाताळली. मात्र, याच पुलाला लागून असलेला पालिकेच्या ताब्यातील स्कायवॉक मात्र फेरीवाल्यांचा आश्रयस्थान झाला आहे. रेल्वे पुलावरून हाकललेले हे सर्व फेरीवाले आता पालिकेच्या स्कायवॉकवर बसले आहेत. पालिकेचा अतिक्रमण विभाग मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्टेशनपासून २०० मीटर अंतरावर फेरीवाल्यांना बंदी आहे. असे असतानाही अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागांत स्टेशनपासून १० मीटर अंतरापासून फेरीवाल्यांची गर्दी दिसते. एवढेच नव्हे तर पादचारी पुलावरदेखील त्यांचीच गर्दी असते. पूल संपल्यावर लगेचच पुलाच्या खाली या फेरीवाल्यांनी मार्गच अडवून ठेवला आहे. ज्या ठिकाणी रेल्वेची हद्द संपते, त्या ठिकाणापासून फेरीवाल्यांची गर्दी दिसते. इतकी की, स्टेशनमधून बाहेर पडणाºया रेल्वे प्रवासी आणि नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. एवढेच नव्हे तर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनादेखील फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाल्याने वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. अपघाताच्या परिस्थितीत या ठिकाणी रुग्णवाहिकादेखील येऊ शकणार नाही, अशी परिस्थिती या फेरीवाल्यांनी निर्माण केली आहे. असाच प्रकार अंबरनाथ पश्चिमेकडे असून येथेही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आणि रस्त्याच्या मध्यभागीदेखील फेरीवाले बसलेले आहेत. अनेक गावगुंडांनी स्टेशन परिसरातील जागा अडवून त्या जागा फेरीवाल्यांना भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. पालिका अधिकारीही या प्रकरणात गुंतले असण्याची शक्यता आहे.