शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
4
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
5
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
6
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
7
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
8
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
9
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
10
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
12
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
13
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
15
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
16
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
17
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
19
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
20
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

अंबरनाथकर त्रस्त : स्कायवॉकला फेरीवाल्यांचा गराडा,पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:19 IST

अंबरनाथ शहरातील रेल्वे पादचारी पुलावर एकही फेरीवाला बसत नाही. पण, या पुलाला लागून असलेल्या स्कायवॉकला मात्र फेरीवाल्यांनी गराडा घातला आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील रेल्वे पादचारी पुलावर एकही फेरीवाला बसत नाही. पण, या पुलाला लागून असलेल्या स्कायवॉकला मात्र फेरीवाल्यांनी गराडा घातला आहे. पालिकेचा अतिक्रमण विभाग या फेरीवाल्यांवर कारवाई करत नसल्यानेच या पुलावर त्यांची दादागिरी वाढल्याचे चित्र आहे. एल्फिन्स्टन येथील रेल्वे पादचारी पुलावरील अपघातानंतर सर्वच स्थानकातील पूल आणि पुलावरील फेरीवाल्यांच्या बाबतीत रेल्वे प्रशासन ठोस निर्णय घेत आहे.अंबरनाथ रेल्वे स्थानकात बाहेर पडण्यासाठी दोन पादचारी पूल आहेत. मात्र, त्यापैकी कर्जत दिशेकडे असलेल्या पुलाचाच वापर ९० टक्के प्रवासी करतात. त्यामुळे या पुलावरून बाहेर पडणाºया प्रवाशांना ग्राहक बनवण्यासाठी फेरीवाले याच पुलावर आपला बाजार मांडत होते. एल्फिन्स्टनच्या प्रकारानंतर रेल्वे पुलावरून सर्व फेरीवाल्यांना बाहेर काढत रेल्वे सुरक्षा दलाने आपली जबाबदारी योग्यरीत्या हाताळली. मात्र, याच पुलाला लागून असलेला पालिकेच्या ताब्यातील स्कायवॉक मात्र फेरीवाल्यांचा आश्रयस्थान झाला आहे. रेल्वे पुलावरून हाकललेले हे सर्व फेरीवाले आता पालिकेच्या स्कायवॉकवर बसले आहेत. पालिकेचा अतिक्रमण विभाग मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्टेशनपासून २०० मीटर अंतरावर फेरीवाल्यांना बंदी आहे. असे असतानाही अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागांत स्टेशनपासून १० मीटर अंतरापासून फेरीवाल्यांची गर्दी दिसते. एवढेच नव्हे तर पादचारी पुलावरदेखील त्यांचीच गर्दी असते. पूल संपल्यावर लगेचच पुलाच्या खाली या फेरीवाल्यांनी मार्गच अडवून ठेवला आहे. ज्या ठिकाणी रेल्वेची हद्द संपते, त्या ठिकाणापासून फेरीवाल्यांची गर्दी दिसते. इतकी की, स्टेशनमधून बाहेर पडणाºया रेल्वे प्रवासी आणि नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. एवढेच नव्हे तर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनादेखील फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाल्याने वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. अपघाताच्या परिस्थितीत या ठिकाणी रुग्णवाहिकादेखील येऊ शकणार नाही, अशी परिस्थिती या फेरीवाल्यांनी निर्माण केली आहे. असाच प्रकार अंबरनाथ पश्चिमेकडे असून येथेही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आणि रस्त्याच्या मध्यभागीदेखील फेरीवाले बसलेले आहेत. अनेक गावगुंडांनी स्टेशन परिसरातील जागा अडवून त्या जागा फेरीवाल्यांना भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. पालिका अधिकारीही या प्रकरणात गुंतले असण्याची शक्यता आहे.