शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

अंबरनाथकर त्रस्त : स्कायवॉकला फेरीवाल्यांचा गराडा,पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:19 IST

अंबरनाथ शहरातील रेल्वे पादचारी पुलावर एकही फेरीवाला बसत नाही. पण, या पुलाला लागून असलेल्या स्कायवॉकला मात्र फेरीवाल्यांनी गराडा घातला आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील रेल्वे पादचारी पुलावर एकही फेरीवाला बसत नाही. पण, या पुलाला लागून असलेल्या स्कायवॉकला मात्र फेरीवाल्यांनी गराडा घातला आहे. पालिकेचा अतिक्रमण विभाग या फेरीवाल्यांवर कारवाई करत नसल्यानेच या पुलावर त्यांची दादागिरी वाढल्याचे चित्र आहे. एल्फिन्स्टन येथील रेल्वे पादचारी पुलावरील अपघातानंतर सर्वच स्थानकातील पूल आणि पुलावरील फेरीवाल्यांच्या बाबतीत रेल्वे प्रशासन ठोस निर्णय घेत आहे.अंबरनाथ रेल्वे स्थानकात बाहेर पडण्यासाठी दोन पादचारी पूल आहेत. मात्र, त्यापैकी कर्जत दिशेकडे असलेल्या पुलाचाच वापर ९० टक्के प्रवासी करतात. त्यामुळे या पुलावरून बाहेर पडणाºया प्रवाशांना ग्राहक बनवण्यासाठी फेरीवाले याच पुलावर आपला बाजार मांडत होते. एल्फिन्स्टनच्या प्रकारानंतर रेल्वे पुलावरून सर्व फेरीवाल्यांना बाहेर काढत रेल्वे सुरक्षा दलाने आपली जबाबदारी योग्यरीत्या हाताळली. मात्र, याच पुलाला लागून असलेला पालिकेच्या ताब्यातील स्कायवॉक मात्र फेरीवाल्यांचा आश्रयस्थान झाला आहे. रेल्वे पुलावरून हाकललेले हे सर्व फेरीवाले आता पालिकेच्या स्कायवॉकवर बसले आहेत. पालिकेचा अतिक्रमण विभाग मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्टेशनपासून २०० मीटर अंतरावर फेरीवाल्यांना बंदी आहे. असे असतानाही अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागांत स्टेशनपासून १० मीटर अंतरापासून फेरीवाल्यांची गर्दी दिसते. एवढेच नव्हे तर पादचारी पुलावरदेखील त्यांचीच गर्दी असते. पूल संपल्यावर लगेचच पुलाच्या खाली या फेरीवाल्यांनी मार्गच अडवून ठेवला आहे. ज्या ठिकाणी रेल्वेची हद्द संपते, त्या ठिकाणापासून फेरीवाल्यांची गर्दी दिसते. इतकी की, स्टेशनमधून बाहेर पडणाºया रेल्वे प्रवासी आणि नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. एवढेच नव्हे तर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनादेखील फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाल्याने वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. अपघाताच्या परिस्थितीत या ठिकाणी रुग्णवाहिकादेखील येऊ शकणार नाही, अशी परिस्थिती या फेरीवाल्यांनी निर्माण केली आहे. असाच प्रकार अंबरनाथ पश्चिमेकडे असून येथेही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आणि रस्त्याच्या मध्यभागीदेखील फेरीवाले बसलेले आहेत. अनेक गावगुंडांनी स्टेशन परिसरातील जागा अडवून त्या जागा फेरीवाल्यांना भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. पालिका अधिकारीही या प्रकरणात गुंतले असण्याची शक्यता आहे.