शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

अंबरनाथ : नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू,उपनगराध्यक्षांचा आरोप : पुलाचे काम न केल्याने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:28 IST

अंबरनाथच्या स्वामीनगर भागात वाहणाºया नाल्यात पडून एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा चिमुकला तीन दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह नाल्यात सापडल्यावर त्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. मात्र हा मुलगा स्वामीनगरच्या धोकादायक पुलावरून नाल्यात पडल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी केला. पुलाचे काम न झाल्यानेच हा अपघात घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अंबरनाथ : अंबरनाथच्या स्वामीनगर भागात वाहणाºया नाल्यात पडून एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा चिमुकला तीन दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह नाल्यात सापडल्यावर त्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. मात्र हा मुलगा स्वामीनगरच्या धोकादायक पुलावरून नाल्यात पडल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी केला. पुलाचे काम न झाल्यानेच हा अपघात घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अंबरनाथ पश्चिमेकडील स्वामीनगर परिसराला लागून नाला आहे. त्यामुळे नाल्यावरील जुन्या पुलावरुनच या नागरिकांची येजा असते. नाल्यावरील पूल धोकादायक झाल्याने त्याच्या दुरूस्तीची मागणी शेख यांनी पालिकेत केली होती. मात्र प्रत्येकवेळी त्याला बगल देण्याचे काम केले. या पुलाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव प्रलंबित असतानाच तीन दिवसांपूर्वी अडीच वर्षाचा राघवन वीरमुरगन हा मुलगा अचानक बेपत्ता झाला. त्याच्या घरच्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र तो सापडलाच नाही. त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रारही दिली होती. तीन दिवसांनी त्याचा मृतदेह स्वामीनगरच्या नाल्यात सापडला. या चिमुकल्याच्या मृत्यूस धोकादायक पूलच जबाबदार असल्याचा निष्कर्ष शेख यांनी काढला आहे.पुलावर खेळत असताना तो नाल्यात पडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मुलाच्या मृत्यूस पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पुलाच्या कामासाठी पालिकेने ६० लाख मंजूर केले आहे. मात्र त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झालेच नाही असा आरोप त्यांनी केला आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ