शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

अंबरनाथ : नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू,उपनगराध्यक्षांचा आरोप : पुलाचे काम न केल्याने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 02:28 IST

अंबरनाथच्या स्वामीनगर भागात वाहणाºया नाल्यात पडून एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा चिमुकला तीन दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह नाल्यात सापडल्यावर त्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. मात्र हा मुलगा स्वामीनगरच्या धोकादायक पुलावरून नाल्यात पडल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी केला. पुलाचे काम न झाल्यानेच हा अपघात घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अंबरनाथ : अंबरनाथच्या स्वामीनगर भागात वाहणाºया नाल्यात पडून एका अडीच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. हा चिमुकला तीन दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह नाल्यात सापडल्यावर त्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याचे समोर आले. मात्र हा मुलगा स्वामीनगरच्या धोकादायक पुलावरून नाल्यात पडल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांनी केला. पुलाचे काम न झाल्यानेच हा अपघात घडल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अंबरनाथ पश्चिमेकडील स्वामीनगर परिसराला लागून नाला आहे. त्यामुळे नाल्यावरील जुन्या पुलावरुनच या नागरिकांची येजा असते. नाल्यावरील पूल धोकादायक झाल्याने त्याच्या दुरूस्तीची मागणी शेख यांनी पालिकेत केली होती. मात्र प्रत्येकवेळी त्याला बगल देण्याचे काम केले. या पुलाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव प्रलंबित असतानाच तीन दिवसांपूर्वी अडीच वर्षाचा राघवन वीरमुरगन हा मुलगा अचानक बेपत्ता झाला. त्याच्या घरच्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र तो सापडलाच नाही. त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रारही दिली होती. तीन दिवसांनी त्याचा मृतदेह स्वामीनगरच्या नाल्यात सापडला. या चिमुकल्याच्या मृत्यूस धोकादायक पूलच जबाबदार असल्याचा निष्कर्ष शेख यांनी काढला आहे.पुलावर खेळत असताना तो नाल्यात पडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या मुलाच्या मृत्यूस पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पुलाच्या कामासाठी पालिकेने ६० लाख मंजूर केले आहे. मात्र त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झालेच नाही असा आरोप त्यांनी केला आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ