शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

अंबरनाथमधील नागरिक त्रस्त : वीज, पाण्यासाठी शिवसेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 04:03 IST

अंबरनाथमधील नागरिक त्रस्त : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

अंबरनाथ : बदलापूरमध्ये नियमित वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्याचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. तसेच शहरातील पाण्याचे वितरण करताना जीवन प्राधिकरण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिवसेनेने मंगळवारी महावितरण आणि पाण्यासाठी मोर्चा काढला. या मोर्चादरम्यान पावसाने हजेरी लावल्यावरही शिवसैनिकांनी भर पावसात मोर्चा काढला.

बदलापूरमध्ये वर्षभरापासून पाण्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शहरातील अनेक भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत असतानाही प्राधिकरणाचे अधिकारी पाणीपुरवठा सुरळीत करत नाहीत. अनेक ठिकाणी लहान जलवाहिन्या असल्याने नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. नियमित होणाऱ्या त्रासाला कंटाळून शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बदलापूरमध्ये महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाविरोधात मोर्चा काढला. यावेळी मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

रमेशवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला प्रारंभ झाला. जीवन प्राधिकरणाच्या विरोधात घोषणाबाजी करत हा मोर्चा प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडकला. त्याचठिकाणी महावितरण विभागाच्या अधिकाºयांनाही बोलावले. यावेळी अधिकाºयांशी चर्चा करताना नियमित वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणी वितरण व्यवस्थेत अडचणी येत आहेत. त्यामुळे प्राधिकरणाने या ठिकाणी जनरेटरची सोय करावी अशी मागणी केली.शहरासाठी अतिरीक्त ३० दशलक्ष लिटर पाणी उचलून त्यातून शहरात पाणी पुरवठा करावा, नवीन वडवली, हेंद्रेपाडा, बेलवली, शिरगांव, माणकिवली या भागात नवीन जलकुंभ उभारणे, पाणीपुरवठा करताना कामचुकारपणा करणारे अधिकारी आणि कर्मचाºयांवर कारवाई करणे, पाण्याचे दर कमी करणे, पाणी न देता थेट बिल देणाºयांवर कारवाई करणे, ज्या भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे त्या ठिकाणी त्वरित सुरळीत पाणीपुरवठा करणे, बेकायदा जोडण्या अधिकृत करणे आणि अमृत योजनेतील कामाची निविदा काढून त्याचे काम त्वरित करणे अशी मागणी यावेळी केली. अधिकाºयांना जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, रूपेश म्हात्रे, शहरप्रमुख वामन म्हात्रे, ग्रामीण तालुकाध्यक्ष बाळाराम कांबरी, गटनेते श्रीधर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित हाते.दरम्यान, या आंदोलनानंतर पाणीपुरवठा वितरणात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.भोंगळ कारभाराने कामकाज ठप्पच्उल्हासनगर : भोंगळ कारभारामुळे पालिकेचे कामकाज ठप्प पडले असून त्याच्या निषेधार्थ मागील आठवड्यात तीन मोर्चे काढले. तसेच सामाजिक संस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ऐन पावसाळयात पाणीटंचाई, कचºयाचे ढीग, खड्डे, विविध विभागातील सावळागोंधळ, कबरस्तान आदी समस्यांच्याविरोधात सर्वपक्षीयांनी मोर्चा काढला. सोमवारी कॅम्प नं-५ येथील नागरिकांनी पाणीटंचाई, रस्त्याची दुरवस्था याच्या निषेधार्थ मोर्चा काढून समस्यांचा पाढा वाचला. विविध समस्यांवरून बेमुदत उपोषण सुरू आहे.च्सावळागोंधळाने हैराण झालेल्या आयुक्तांनी मालमत्ता कर वसुलीचे अधिकार प्रभाग अधिकाºयांना दिले आहेत. तसेच मालमत्ता कर विभागातील कर्मचाºयांच्या बदल्याही प्रभाग समिती कार्यालयात केल्या आहेत. प्रतिनियुक्तीवरील सहायक आयुक्त महापालिकेत नसल्याने कनिष्ठ कर्मचारी व लिपिक दर्जाचे अजित गोवारी, नंदलाल समतानी, भगवान कुमावत व गणेश शिंपी यांच्याकडे सहायक आयुक्तपदाचा प्रभारी पदभार दिला. अशा कनिष्ठ कर्मचाºयांच्याखाली काम करण्यास तयार नसल्याने अन्य अधिकारी, कर्मचाºयांमध्ये असंतोष आहे.वर्षभरात भाजपाकडून नागरिकांची फसवणूक; शिवसेनेने गाजर वाटून केला निषेधमीरा रोड : मीरा-भार्इंदर शिवसेनेतील महत्त्वाच्या पदांवर काहींच्या कार्याचा आढावा न घेता झालेल्या नियुक्त्या, महापालिकेत विरोधीपक्षात असूनही बहुतांश नगरसेवकांचे मौन यावरून सेनेतील अंतर्गत तक्रारींचा सूर ‘लोकमत’ने मांडल्याने खळबळ उडाली असतानाच मंगळवारी सेनेचे पदाधिकारी व नगरसेवक आक्रमक झाल्याचे दिसले. भाजपा सत्तेची वर्षपूर्ती साजरी करत असताना शिवसेनेने महापालिका मुख्यालयाबाहेर नागरिकांना गाजर वाटून भाजपाच्या फसव्या आश्वासनांचा निषेध नोंदवला. मीरा- भार्इंदर महापालिकेत भाजपा सत्तेवर येऊन मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. सकाळी आमदार प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानंतर जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, जिल्हा संघटक स्नेहल सावंत, विरोधी पक्षनेते राजू भोईर, दिनेश नलावडे, तारा घरत, दीप्ती भट, प्रवीण पाटील, नीलम ढवण, जयंती पाटील, भावना भोईर, स्नेहा पांडे, अनंत शिर्के, वंदना पाटील, कमलेश भोईर आदी नगरसेवकांसह उपजिल्हा संघटक निशा नार्वेकर, शहरप्रमुख लक्ष्मण जंगम यांनी पालिका मुख्यालयाबाहेर भाजपाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत नागरिकांना गाजर वाटले. महापौर डिंपल मेहता यांची गाडी अडवण्याचा व त्यांना गाजर देण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या महिलांनी केला. भाजपाची सत्ता आल्यानंतर वर्षभरात शहराची दुरवस्था झाली आहे. निवडणुकीत दिलेली २४ तास पाणी, मेट्रो, चांगले रस्ते, भ्रष्टचारमुक्त पारदर्शक कारभार, चांगली परिवहन सेवा आदी सर्व आश्वासने खोटी ठरली आहेत, असे सेनेने सांगितले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका