शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

अंबरनाथ, बदलापूर नगराध्यक्षांची निवडणूक तीन तासात रद्द, नवा आदेश आणि नवी तारीख आज जाहीर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 02:10 IST

अंबरनाथ नगरपालिका आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिल्हाधिका-यांनी जाहीर केल्यावर अवघ्या तीन तासात त्यांनी आपला आदेश रद्द केला.

बदलापूर/अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका आणि कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक जिल्हाधिका-यांनी जाहीर केल्यावर अवघ्या तीन तासात त्यांनी आपला आदेश रद्द केला. २४ नोव्हेंबरला नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार होती. निवडणुकीची नवीन तारीख उद्या उपविभागीय अधिकारी जाहीर करणार आहेत.अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ हा संपल्याने या पदासाठी नव्याने निवडणूका घेण्यात येणार आहे. अंबरनाथ पालिकेचे नगराध्यक्षपद हे पुढील अडीच वर्षाकरिता महिलांना राखीव आहे. तर बदलापूरचे पद हे अनुसूचित जातीच्या उमेदवारासाठी राखीव ठेवले आहे. दोन्ही पालिकांमध्ये उमेदवारीसाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू असतानाच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी निवडणुकीची तारीख जाहीर केली. निवडणुकीचा कार्यक्र म पालिका कार्यालयाला प्राप्त होताच राजकीय पक्ष कामाला लागले होते. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एकच दिवस असल्याने या प्रकरणी राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी किमान तीन दिवस देणे गरजेचे होते असे मत पुढे आले. जिल्हाधिकाºयांनी काढलेल्या आदेशानंतर निवडणूक कार्यक्र मासंदर्भात झालेली चूक लक्षात येताच त्यांनी लागलीच या निवडणुकीचा कार्यक्र म रद्द केला. तसेच जास्त वादात न पडता या निवडणुकीच्या कार्यक्र माची जबाबदारी थेट कल्याणच्या उपविभागीय अधिकाºयांवर सोपवण्यात आली. नवीन निवडणुकीचा कार्यक्र म ठरवण्याचा अधिकार उपविभागीय अधिकाºयांना मिळाल्याने बुधवारी नव्याने तारीख निश्चित होण्याचे संकेत आहेत.जिल्हाधिकाºयांनी काढलेल्या सुरूवातीच्या आदेशात १४ नोव्हेंबरला निवडणूक जाहीर झाल्यावर १५ नोव्हेंबरला दुपारी २ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. नगराध्यक्षपदासाठी निवडणूक ही २४ नोव्हेंबरला असली तरी अर्ज भरण्यासाठी अल्प कालावधी मिळाल्याने समीकरणे जुळवण्यासाठी शिवसेनेवर तारेवरची कसरत करण्याची वेळ आली होती. त्यामुळेच राजकीय दबाव टाकून हा निवडणुकीचा कार्यक्र म रद्द केल्याची चर्चा सुरू झाली. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये भाजपा शिवसेनेसोबत सत्तेत असली तरी सत्ताधारी सेनेच्या नाराज गटाला सोबत घेऊन सत्तेची गणिते रचण्याची स्वप्न भाजपा पाहत आहे. त्यामुळे भाजपाच्या या रणनितीला शिवसेना कशा पध्दतीने उत्तर देणार हे उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. भाजपाच्या गोटातून उमेदवारी अर्ज दाखल होतो की नाही याची उत्सुकता लागलेली आहे. तर अंबरनाथमध्ये काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार की विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे सांभाळणार याकडे लक्ष आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथbadlapurबदलापूर