शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

अंबरनाथला यंदाही नालेसफाईचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:27 IST

नालेसफाई दरवर्षी केली जात असतानाही पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे यंदाही नालेसफाईच्या कामाला विलंब झाला आहे

पंकज पाटीलअंबरनाथ : नालेसफाई दरवर्षी केली जात असतानाही पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे यंदाही नालेसफाईच्या कामाला विलंब झाला आहे. ३१ मे पर्यंत काम पूर्ण करणे गरजेचे असतानाही पालिकेने २५ मे नंतर नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली. कमी कालावधीत अधिक नालेसफाई करावी लागणार असल्याने कामाचा दर्जा योग्य राखणे अधिकाऱ्यांना त्रासाचे जात आहे. नालेसफाईचा घोळ दरवर्षीप्रमाणे तसाच राहिल्याने पालिका प्रशासन नालेसफाईच्या बाबतीत गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे.अंबरनाथ नगरपालिकेने प्रत्येकवर्षी नालेसफाईच्या कामाकडे दुर्लक्ष केले आहे. नालेसफाईच्या नावावर केवळ आर्थिक तरतूद करून ती तरतूद संपवण्याकडेच पालिकेचे लक्ष केंद्रित झाले आहे. शहरातील लहानमोठ्या नाल्यांची सफाई करण्यासाठी दरवर्षी निविदा काढण्याची प्रक्रिया असते. मात्र, प्रत्येकवेळी नालेसफाईचा विषय एप्रिल आणि मे मध्येच मंजूर करून पुढे निविदा प्रक्रिया होते. दरवर्षीचे काम असल्याने या कामाची मंजुरी जानेवारी, फेब्रुवारीमध्येच पूर्ण करून निविदा प्रक्रिया करणे गरजेचे असते. मात्र, पालिका अधिकारी कंत्राटदारांच्या सोयीसाठी प्रत्येकवेळी शेवटच्या महिन्यातच विषय मंजूर करून घेत आहे.अनेक वर्षांची परंपरा माजी मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी मोडीत काढली होती. डिसेंबरमध्येच नालेसफाईचे काम मंजूर करून त्या कामाला मे महिन्यातच सुरुवात केली होती. मात्र, देशमुख यांची बदली झाल्यावर पुन्हा जुनीच कामाची पद्धत अवलंबली जात आहे. मे महिन्यात जे काम करायचे आहे, त्या कामाला मंजुरी घेण्यासाठी त्याच महिन्यात विशेष सभा लावण्याची वेळ पालिकेवर येते. ज्या कामाचे नियोजन पाच ते सहा महिन्यांपूर्वी करणे गरजेचे आहे, ते काम शेवटच्या क्षणी मंजूर करून कंत्राटदाराला झुकते माप दिले जात आहे.नालेसफाईच्या निविदेसोबत नालेसफाईच्या कामातही तेवढ्याच प्रमाणात त्रुटी निर्माण झाल्या आहेत. नालेसफाई केल्यावर नाल्यातील गाळ हा सुकण्यासाठी नाल्याच्या बाजूला ठेवला जात आहे. मात्र, हा सुकलेला गाळ पुन्हा दोन ते तीन दिवसांत भरून नेणे गरजेचे आहे. मात्र, अनेक ठिकाणी असे होत नसल्याने काढलेला गाळ पुन्हा पावसाळ्यात नाल्यात जातो. अंबरनाथ पालिकेने सुरू केलेल्या नालेसफाईच्या कामात यंदाही अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे प्रयत्न केले जात आहे. मात्र, सुरुवातीचे तीन ते चार दिवस काम योग्य दाखवल्यावर शेवटच्या टप्प्यात काम मारून नेण्याचे काम कंत्राटदार करत आले आहेत. त्यामुळे यंदाच्या नालेसफाईच्या कामावर अधिकाºयांसोबत नगरसेवकांनीही लक्ष ठेवावे, असे आवाहन नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी केले आहे.अंबरनाथमधील महत्त्वाच्या नाल्यांपैकी एक नाला म्हणजे विम्को कंपनीशेजारील नाला. या नाल्यात दरवर्षी प्रचंड गाळ अडकलेला असतो. मात्र, या नाल्यातील गाळ काढण्याकडे कुणाचेच लक्ष गेलेले नाही. प्रत्येकवेळी या नाल्याची वरवर स्वच्छता केली जाते. शिव मंदिरापासून वाहणारा दुसरा महत्त्वाचा नाला म्हणजे वालधुनी नदी.नावाला नदी असली तरी त्याचे रूपांतर नाल्यात झाले आहे. या नाल्याच्या स्वच्छतेची जबाबदारी उल्हासनगर पालिकेसोबत अंबरनाथ पालिकेचीही आहे.अधिकाºयांनाच शाश्वती नाहीकमलाकरनगर येथील मोठा नाला, बालाजीनगर नाला, बी-केबिन नाला, लोकनगरी नाला, गोविंद तीर्थपूल नाला यांची नियमानुसार स्वच्छता न झाल्यास त्याचा त्रास नागरिकांना होणार आहे. या नालेसफाईच्या कामावर प्रत्येकवर्षी आरोप होत असले, तरी त्या कामासाठी असलेला खर्च आणि त्याची तरतूद ही हवी तशी वाढलेली नाही. नालेसफाईवर खर्च वाढवला, तरी ते काम योग्य प्रकारे होईलच, याची शाश्वती अधिकाºयांना नाही. त्यामुळेच कमीतकमी खर्चात काम कसे होईल, याकडे पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. यंत्राद्वारे नालेसफाई करताना अनेक ठिकाणी अडचणी येत असल्याने त्या ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करून नालेसफाईचा प्रस्ताव आहे. कंत्राटदाराकडून कामगार घेऊन ती नालेसफाई करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, ते काम करतानाही वरवर काम केले जात आहे. कामगारांनी काढलेल्या गाळाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नाही. एकंदरीत नालेसफाईबाबत अधिकारी कूचकामी पडत आहे, हे उघड होत आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर अंबरनाथमधील नागरिकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.नालेसफाईच्या बाबतीत दरवर्षी तक्रारी येत असतात. नालेसफाईच्या कामाबाबत नागरिक समाधानी दिसत नाहीत. त्यामुळे यंदा नालेसफाईच्या कामात नगरसेवकांना लक्ष घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कामात हयगत झाल्यास अधिकाºयांवर कारवाई केली जाईल.- मनीषा वाळेकर, नगराध्यक्ष