शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

अंबरनाथमधील वीज वितरणाच्या विरोधात आमरण उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 18:06 IST

अंबरनाथमधील वीज वितरण विभागाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आणि वाढत्या वीज दराच्या विरोधात स्वाभिमान संघटनेच्या वतीने आमरण उपोषण बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे.

अंबरनाथ: अंबरनाथमधील वीज वितरण विभागाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आणि वाढत्या वीज दराच्या विरोधात स्वाभिमान संघटनेच्या वतीने आमरण उपोषण बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. वीज वितरण विभागाच्या कार्यालयाबाहेर हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. स्वाभिमान संघटनेचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष विकास सोमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. वीज ग्राहकांना वीज वितरण विभागामार्फत वाढीव बिल देण्यात येते, चुकीचे बिल देऊन ग्राहकांची लूट केली जाते, कार्यालयात येणा-या ग्राहकांना मानसिक त्रास देण्याचे काम केले जाते, असे आरोप करीत सोमेश्वर यांनी हे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या मागण्यांमध्ये वीज बिलातील स्थिर आकाराच्या नावावर केलेली वाढ रद्द करणे, मुंबईत खासगी वीज कंपनी स्वस्त वीज विकत आहेत, तर शासनाची यंत्रणा असताना अंबरनाथच्या ग्राहकांना महाग दराने वीज घ्यावी लागत असल्याने या भागातील विजेचे दर कमी करणे, वीजबिलांचे वाटप वेळेवर होत नसल्याने नागरिकांना दंडात्मक रक्कम भरावी लागत असल्याने त्यातील त्रुटी कमी करणे, तक्रार घेऊन येणा-या नागरिकांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात.योग्य प्रकारे काम केले जात नाहीत, वीजबिल न भरल्यास 2 महिन्यांत वीज जोडणी तोडण्याची तरतूद आहे. सोबत एक नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र अंबरनाथ शहरात एका महिन्याचे बिल भरले गेले नाही तर थेट वीज जोडणी तोडण्याचे काम केले जाते. जोडणी तोडल्यावर पुन्हा त्याची जोडणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी आर्थिक व्यवहार करतात.  सर्वसामान्य नागरिकांना होणा-या या त्रासाची दखल घेत स्वाभिमान संघटनेच्या पुढाकाराने उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यात विकास सोमेश्वर, विशाल सोनावणे, अ‍ॅड. अमोल वाजे, लखन चौहान, गुरू चलवादी आणि शंकर कोळी आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमरण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत या समस्यांवर तोडगा निघत नाही तोवर उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे.