शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

अंबरनाथमधील वीज वितरणाच्या विरोधात आमरण उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 18:06 IST

अंबरनाथमधील वीज वितरण विभागाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आणि वाढत्या वीज दराच्या विरोधात स्वाभिमान संघटनेच्या वतीने आमरण उपोषण बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे.

अंबरनाथ: अंबरनाथमधील वीज वितरण विभागाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात आणि वाढत्या वीज दराच्या विरोधात स्वाभिमान संघटनेच्या वतीने आमरण उपोषण बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. वीज वितरण विभागाच्या कार्यालयाबाहेर हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. स्वाभिमान संघटनेचे अंबरनाथ तालुका अध्यक्ष विकास सोमेश्वर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. वीज ग्राहकांना वीज वितरण विभागामार्फत वाढीव बिल देण्यात येते, चुकीचे बिल देऊन ग्राहकांची लूट केली जाते, कार्यालयात येणा-या ग्राहकांना मानसिक त्रास देण्याचे काम केले जाते, असे आरोप करीत सोमेश्वर यांनी हे उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या मागण्यांमध्ये वीज बिलातील स्थिर आकाराच्या नावावर केलेली वाढ रद्द करणे, मुंबईत खासगी वीज कंपनी स्वस्त वीज विकत आहेत, तर शासनाची यंत्रणा असताना अंबरनाथच्या ग्राहकांना महाग दराने वीज घ्यावी लागत असल्याने या भागातील विजेचे दर कमी करणे, वीजबिलांचे वाटप वेळेवर होत नसल्याने नागरिकांना दंडात्मक रक्कम भरावी लागत असल्याने त्यातील त्रुटी कमी करणे, तक्रार घेऊन येणा-या नागरिकांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली जातात.योग्य प्रकारे काम केले जात नाहीत, वीजबिल न भरल्यास 2 महिन्यांत वीज जोडणी तोडण्याची तरतूद आहे. सोबत एक नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र अंबरनाथ शहरात एका महिन्याचे बिल भरले गेले नाही तर थेट वीज जोडणी तोडण्याचे काम केले जाते. जोडणी तोडल्यावर पुन्हा त्याची जोडणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी आर्थिक व्यवहार करतात.  सर्वसामान्य नागरिकांना होणा-या या त्रासाची दखल घेत स्वाभिमान संघटनेच्या पुढाकाराने उपोषण सुरू करण्यात आले आहे. त्यात विकास सोमेश्वर, विशाल सोनावणे, अ‍ॅड. अमोल वाजे, लखन चौहान, गुरू चलवादी आणि शंकर कोळी आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमरण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत या समस्यांवर तोडगा निघत नाही तोवर उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली आहे.