शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

आमच्या घशाला कोरड का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:42 IST

एकीकडे पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही पश्चिमेतील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचे कमालीचे दुर्भिक्ष जाणवत आहे. विशेषत: फडके मैदान प्रभाग आणि बिर्ला कॉलेज प्रभागांमध्ये तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे.

कल्याण : एकीकडे पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही पश्चिमेतील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचे कमालीचे दुर्भिक्ष जाणवत आहे. विशेषत: फडके मैदान प्रभाग आणि बिर्ला कॉलेज प्रभागांमध्ये तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ ओढवली आहे. पाणीटंचाईबाबत वारंवार तक्रारी करूनही केडीएमसी प्रशासन ठोस कार्यवाही करत नसल्याने स्थानिक नगरसेवकही नाराज झाले आहेत.फडके मैदान प्रभागातील साईबाबानगर, दुर्गानगर, महाराष्ट्रनगर, माता रमाबाई आंबेडकरनगर या विभागांमध्ये महिना-दीड महिन्यापासून पाणीटंचाई जाणवत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पाण्याअभावी बोअरिंग तसेच टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. धरण भरले आहे, मग आमच्या घशाला कोरड का, असा सवाल येथील रहिवाशांचा आहे.यासंदर्भात नगरसेवक मोहन उगले यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. याबाबत, उगले यांना विचारले असता प्रभागांमधील बहुतांश भागांमध्ये पाणी येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मोहने उदंचन केंद्राच्या पंपात बिघाड झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे कारण पाणीपुरवठा विभागाकडून दिले जात आहे. पण, हे कारण पटणारे नाही. सध्या पाऊस पडत असतानाही नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, हे दुर्दैव आहे. तीन महिने पाठपुरावा करूनही त्यांना दोष सापडत नाही, पण याचे खापर पंपिंगवर फोडतात, हा आमचा आरोप असल्याचे ते म्हणाले.यासंदर्भात केडीएमसीचे ‘क’ प्रभागाचे कनिष्ठ अभियंता चंद्रकांत सोनवणे म्हणाले, १० ते १२ दिवस पाणी सुरळीत येत नव्हते, परंतु आता दोष निकाली काढला आहे. दोन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचा दावा त्यांनी केला.बिर्ला कॉलेज प्रभागातही महिनाभरापासून पाणी येत नसल्याने तेथील रहिवाशांचीही पाण्यासाठी वणवण सुरू आहे. स्थानिक नगरसेविका छाया वाघमारे याही पाणीटंचाईच्या तक्रारीने हैराण झाल्या आहेत.प्रशासनाच्या कारभारावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. वारंवार लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आजूबाजूच्या प्रभागांना पुरेसे पाणी मिळत आहे, मग आमच्याच प्रभागाला सापत्न वागणूक का, असा सवाल त्यांनी केला आहे.