शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

आमच्या घशाला कोरड का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:42 IST

एकीकडे पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही पश्चिमेतील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचे कमालीचे दुर्भिक्ष जाणवत आहे. विशेषत: फडके मैदान प्रभाग आणि बिर्ला कॉलेज प्रभागांमध्ये तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे.

कल्याण : एकीकडे पावसाच्या सरींवर सरी येत असतानाही पश्चिमेतील काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचे कमालीचे दुर्भिक्ष जाणवत आहे. विशेषत: फडके मैदान प्रभाग आणि बिर्ला कॉलेज प्रभागांमध्ये तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ ओढवली आहे. पाणीटंचाईबाबत वारंवार तक्रारी करूनही केडीएमसी प्रशासन ठोस कार्यवाही करत नसल्याने स्थानिक नगरसेवकही नाराज झाले आहेत.फडके मैदान प्रभागातील साईबाबानगर, दुर्गानगर, महाराष्ट्रनगर, माता रमाबाई आंबेडकरनगर या विभागांमध्ये महिना-दीड महिन्यापासून पाणीटंचाई जाणवत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पाण्याअभावी बोअरिंग तसेच टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. धरण भरले आहे, मग आमच्या घशाला कोरड का, असा सवाल येथील रहिवाशांचा आहे.यासंदर्भात नगरसेवक मोहन उगले यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. याबाबत, उगले यांना विचारले असता प्रभागांमधील बहुतांश भागांमध्ये पाणी येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मोहने उदंचन केंद्राच्या पंपात बिघाड झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे कारण पाणीपुरवठा विभागाकडून दिले जात आहे. पण, हे कारण पटणारे नाही. सध्या पाऊस पडत असतानाही नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, हे दुर्दैव आहे. तीन महिने पाठपुरावा करूनही त्यांना दोष सापडत नाही, पण याचे खापर पंपिंगवर फोडतात, हा आमचा आरोप असल्याचे ते म्हणाले.यासंदर्भात केडीएमसीचे ‘क’ प्रभागाचे कनिष्ठ अभियंता चंद्रकांत सोनवणे म्हणाले, १० ते १२ दिवस पाणी सुरळीत येत नव्हते, परंतु आता दोष निकाली काढला आहे. दोन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचा दावा त्यांनी केला.बिर्ला कॉलेज प्रभागातही महिनाभरापासून पाणी येत नसल्याने तेथील रहिवाशांचीही पाण्यासाठी वणवण सुरू आहे. स्थानिक नगरसेविका छाया वाघमारे याही पाणीटंचाईच्या तक्रारीने हैराण झाल्या आहेत.प्रशासनाच्या कारभारावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. वारंवार लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. आजूबाजूच्या प्रभागांना पुरेसे पाणी मिळत आहे, मग आमच्याच प्रभागाला सापत्न वागणूक का, असा सवाल त्यांनी केला आहे.