शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

दाेनाचे तीन झाले, तरी वाढीव भाडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:47 IST

अंबरनाथ आणि बदलापुरात पूर्वी प्रत्येक ऑटो रिक्षाचालक हा चार ते पाच सीट भरून प्रवास करत होता. मात्र, दोन वर्षापूर्वी ...

अंबरनाथ आणि बदलापुरात पूर्वी प्रत्येक ऑटो रिक्षाचालक हा चार ते पाच सीट भरून प्रवास करत होता. मात्र, दोन वर्षापूर्वी वाहतूक पोलीस आणि रिक्षाचालक संघटनेच्या पुढाकाराने प्रत्येक रिक्षात केवळ तीन सीट घेण्याची सक्ती करण्यात आली. त्या मोबदल्यात प्रतिप्रवासी १० रुपये एवजी १५ रुपये भाडे करण्यात आले. या नियमांची अंमलबजावणी केवळ काही रिक्षाचालकच करीत होते. उर्वरित बेशिस्त रिक्षाचालक हे ओव्हर सीट भरून इतर प्रामाणिक रिक्षाचालकांना त्रास देत होते. त्यातच कोराेनाकाळात शासकीय नियमानुसार रिक्षामध्ये केवळ दोन प्रवासी घेण्याचा नियम पुढे केल्याने प्रतिप्रवसी भाडे १५ ऐवजी २० रुपये करण्यात आले. ते दर प्रवाशांनी दिलेही. मात्र आता कोविडचा प्रभाव कमी झाल्यावर रिक्षाचालकांनी पुन्हा तीन सीट भरण्यास सुरुवात केली आहे. यानंतर काही प्रमाणिक रिक्षाचालक वगळता बेशिस्त रिक्षाचालक हे २० रुपये दर आकारत आहेत. यासोबतच पेट्रोलचे दरवाढ कारण पुढे करून रिक्षा भाडेवाढ करण्याचा घाट रचला जात आहे. प्रत्यक्षात अंबरनाथ आणि बदलापुरात सर्वच रिक्षा या सीएनजीवर आहेत. असे असतानाही पेट्रोल दरवाढीमुळे भाडेवाढ करणे अंबरनाथ आणि बदलापूरकरांना पचनी पडत नाही. भाडेवाढीबाबत ठोस निर्णय झालेला नसला तरी त्याबाबत चर्चा होणेही चुकीचे आहे.