शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

दाेनाचे तीन झाले, तरी वाढीव भाडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:47 IST

अंबरनाथ आणि बदलापुरात पूर्वी प्रत्येक ऑटो रिक्षाचालक हा चार ते पाच सीट भरून प्रवास करत होता. मात्र, दोन वर्षापूर्वी ...

अंबरनाथ आणि बदलापुरात पूर्वी प्रत्येक ऑटो रिक्षाचालक हा चार ते पाच सीट भरून प्रवास करत होता. मात्र, दोन वर्षापूर्वी वाहतूक पोलीस आणि रिक्षाचालक संघटनेच्या पुढाकाराने प्रत्येक रिक्षात केवळ तीन सीट घेण्याची सक्ती करण्यात आली. त्या मोबदल्यात प्रतिप्रवासी १० रुपये एवजी १५ रुपये भाडे करण्यात आले. या नियमांची अंमलबजावणी केवळ काही रिक्षाचालकच करीत होते. उर्वरित बेशिस्त रिक्षाचालक हे ओव्हर सीट भरून इतर प्रामाणिक रिक्षाचालकांना त्रास देत होते. त्यातच कोराेनाकाळात शासकीय नियमानुसार रिक्षामध्ये केवळ दोन प्रवासी घेण्याचा नियम पुढे केल्याने प्रतिप्रवसी भाडे १५ ऐवजी २० रुपये करण्यात आले. ते दर प्रवाशांनी दिलेही. मात्र आता कोविडचा प्रभाव कमी झाल्यावर रिक्षाचालकांनी पुन्हा तीन सीट भरण्यास सुरुवात केली आहे. यानंतर काही प्रमाणिक रिक्षाचालक वगळता बेशिस्त रिक्षाचालक हे २० रुपये दर आकारत आहेत. यासोबतच पेट्रोलचे दरवाढ कारण पुढे करून रिक्षा भाडेवाढ करण्याचा घाट रचला जात आहे. प्रत्यक्षात अंबरनाथ आणि बदलापुरात सर्वच रिक्षा या सीएनजीवर आहेत. असे असतानाही पेट्रोल दरवाढीमुळे भाडेवाढ करणे अंबरनाथ आणि बदलापूरकरांना पचनी पडत नाही. भाडेवाढीबाबत ठोस निर्णय झालेला नसला तरी त्याबाबत चर्चा होणेही चुकीचे आहे.