शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

आधीच ‘उल्हास’ त्यात उद्यानेही भकास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:39 IST

सकाळी शुद्ध हवेत फिरायला जायला प्रत्येकाला आवडते. प्रकृतीसाठी ते चांगलेही असते. मात्र उल्हासनगरात आज एकही असे उद्यान नाही जेथे फिरायला जाता येईल, व्यायाम करता येईल, मोकळा श्वास घेता येईल

सदानंद नाईक, उल्हासनगरसकाळी शुद्ध हवेत फिरायला जायला प्रत्येकाला आवडते. प्रकृतीसाठी ते चांगलेही असते. मात्र उल्हासनगरात आज एकही असे उद्यान नाही जेथे फिरायला जाता येईल, व्यायाम करता येईल, मोकळा श्वास घेता येईल. नगरसेवक आणि पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शहराचे आरोग्यच बिघडून गेले आहे. ते सुधारण्यासाठी हवी निरामय वृत्ती. पण तिचीच वानवा आहे.शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरवण्याचे महापालिकेचे कर्तव्य आहे. पण प्रत्येक गोष्टीतून स्वत:चा आर्थिक लाभ करून घ्यायचा या उद्देशामुळे कामात नित्कृष्टपणा येतो. त्यामुळे त्यावर खर्च झालेली रक्कम वाया जाते. अर्थात हा पैसा नागरिकांच्या विविध प्रकारच्या करातून जामा झालेला असतो. याचाच अर्थ नागरिकांच्या पैशांची पालिका, अधिकारी, नगरसेवक नासाडी करतात असा थेट होतो. पण नागरिक रस्त्यावर उतरून थेट विरोध करत नसल्याने या मंडळींचे चांगलेच फावते. वास्तविक आपल्या हक्कांसाठी सामान्य माणसाने आवाज उठवला पाहिजे.आज उल्हासनगर शहरात असे एकही काम नाही ज्यात भ्रष्टाचार झालेला नाही. पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार, राजकीय पक्षांचे त्रांगडे, यामुळे त्यांचाच प्रशासनावर वचक राहिलेला नाही. उल्हासनगर पालिकेत भाजपाने अन्य पक्षांच्या कुबड्या घेऊन सत्ता मिळवली. शहराचा विकास होईल अशी माफक अपेक्षा नागरिकांची आहे. पण शहरातील स्थिती पाहता ‘विकास’ शोधावा लागतो. आज सिमेंटच्या जंगलात निसर्ग हरवत चाललेला आहे. सकाळी शुद्ध हवा घ्यायची ठरवली तरी ती मिळत नाही. कारण झाडेच लावली जात नाही. किंवा विकासाच्या नावाखाली कत्तल केली जाते. नागरिकांचा विरंगुळा व्हावा यासाठी शहरात मैदान, उद्याने यांची सुविधा पालिकेने करून देणे गरजेचे आहे. तशी उल्हासनगरमध्ये ६४ उद्याने आहेत. पण त्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच चांगली आहे. बाकी उद्यानांबद्दल न बोलले बरे. कोट्यवधी खर्च करूनही त्यांची दुरवस्था झालेली आहे. ही उद्याने म्हणजे भुरटे चोर, गर्दुल्ले यांची आश्रयस्थान झाल्याने नागरिक खास करून महिला, तरूणी फिरायला जाण्याचे टाळतात.या उद्यानांकडे पाहून त्यांना उद्यान का म्हणावे असा प्रश्न सामान्यांना पडतो. इतकी त्यांची वाट लागलेली आहे. काही ठिकाणी चक्क गाडयांचे पार्किंग केले जाते. शहरात चांगल्या सुविधा असाव्यात असा साक्षात्कार पालिकेला झाल्याने २०१७-१८ मध्ये उद्यानांच्या विकासासाठी ८ कोटीचा निधी खर्च करण्यात येणार असून माळी, मजूर व सुरक्षारक्षक मानधनवर कंत्राटदाराकडून घेण्यात येणार आहे.उल्हासनगरमध्ये खुल्या जागा, आरक्षित भूखंड, उद्याने, मैदान सुरक्षित नसल्याचे बोलले जाते. महापालिकेच्या ७० टक्के आरक्षित भूखंडावर अतिक्रमण झाले असून मुख्यालयासमोरील लहान उद्यानावर एका भूमाफियाने चक्क बांधकाम परवाना काढला होता. हा प्रकार उघड झाल्यावर उद्यानाच्या विकासाचा प्रश्न उभा ठाकला. या उद्यानाचे सुशोभिकरण व नूतनीकरण महापालिकेने केले असून कॅम्प नं-५ येथील लाललोई उद्यान कोटयवधीच्या निधीतून माजी उपमहापौर विनोद ठाकूर यांनी विकसित केले. माजी महापौर आशा इदनानी यांनी कॅम्प नं-३ येथील ७०५ भूखंडावर उघान विकसित केले. शेकडो नागरिक, महिला, वृध्द मुले उघानाचा उपयोग करतात.