शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

७२ अधिकाऱ्यांविरोधात कारवाईला परवानगी द्या; ‘एसीबी’ने नगरविकास विभागाकडे मागितली दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:11 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांना जबाबदार असलेल्या ७२ अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सरकारच्या नगरविकास विभागाकडे परवानगी मागितली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांना जबाबदार असलेल्या ७२ अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सरकारच्या नगरविकास विभागाकडे परवानगी मागितली आहे. यासंदर्भातील अहवाल महापालिका आयुक्तांनी ‘नगरविकास’कडे पाठवलेला नाही. त्यामुळे हा अहवाल न पाठवल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कारवाईची परवानगी दिली जाईल, अशी तंबीच नगरविकास विभागाने महापालिका आयुक्तांना दिली आहे.बेकायदा बांधकामप्रकरणी २००४ मध्ये कौस्तुभ गोखले व श्रीनिवास घाणेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आॅगस्ट २००६ मध्ये झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने बेकायदा बांधकामे झाल्यास प्रभाग अधिकाºयाला जबाबदार धरावे. त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असे आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कारवाई झालेलीच नाही.२००६ च्या आदेशानंतर २०१७ पर्यंत १८ हजार बेकायदा बांधकामे झाली आहेत. या बांधकामांना महापालिकेने मालमत्ताकर लागू केला आहे. मात्र, कराच्या बिलांवर ‘बेकायदा बांधकाम’ असा शिक्काही मारला आहे. याचाच अर्थ बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई केली जाऊ शकते. कर लागू केला असला, तरी त्या कारवाईस बाधा येणार नाही, असा स्पष्ट उल्लेख असताना बेकायदा बांधकामप्रकरणी कारवाई झालेली नाही.२०१७ मध्ये शीळफाटा येथील लकी कम्पाउंड ही बेकायदा इमारत पडली. त्यात अनेक जणांना प्राण गमवावे लागले. लकी कम्पाउंड प्रकरणात ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांविरोधात कारवाई झाली. तशा प्रकारची कारवाई कल्याण-डोंबिवली महापालिकेत झालेली नाही. महापालिका हद्दीत अग्यार समितीच्या अहवालानुसार ६८ हजार बेकायदा बांधकामे आहेत. हा आकडा पाहता लकी कम्पाउंडच्या घटनेनंतर महापालिकेकडून अशा प्रकारची कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, ती झालेली नसल्याने घाणेकर यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. ‘लाचलुचपत’ने घाणेकर यांचा जबाब घेतला होता. त्यानंतर, या विभागाने नगरविकास विभागाकडे कारवाईसाठी परवानगी मागितली. मात्र, नगरविकास विभागाने महापालिकेकडे विचारणा करत दोषी अधिकाऱ्यांची नावे पाठवण्याची सूचना केली होती. त्यानंतरही महापालिकेने बेकायदा बांधकाम प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाºयांची नावे पाठवली नाहीत. महापालिकेचा हा प्रतिसाद पाहता नगरविकास विभागाने महापालिकेस बजावले आहे की, नावे न कळवल्यास कारवाईसाठी परवानगी दिली जाईल.पत्रे देऊनही कारवाई नाहीमागच्या वर्षी अग्यार समितीने सादर केलेला बेकायदा बांधकाम प्रकरणाचा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे. नगरविकास विभागाने तसे पत्रही महापालिका आयुक्तांना पाठवले होेत. त्यानंतरही आयुक्तांनी दोषींच्या विरोधात कारवाई केलेली नाही, याकडे याचिकाकर्ते घाणेकर यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका