शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वाढवणं बंदराच्या भूमिपूजना विरोधात राज्यातील सर्व मच्छिमार आंदोलन करणार

By धीरज परब | Updated: August 28, 2024 16:49 IST

मच्छीमारांचा वाढवण बंदरास विरोध असून आमच्या अस्तित्वासाठी शेवट पर्यंत सरकार विरुद्ध लढू असा इशारा देण्यात आला आहे.

धीरज परब

मीरारोड - पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरचे भूमिपूजन ३० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून त्याला विरोध करण्याचा निर्धार बुधवारी भाईंदरच्या उत्तन येथील मच्छिमार संघटनेच्या बैठकीत करण्यात आला आहे. मच्छीमारांचा वाढवण बंदरास विरोध असून आमच्या अस्तित्वासाठी शेवट पर्यंत सरकार विरुद्ध लढू असा इशारा देण्यात आला आहे.

अदानीसाठी मच्छीमार व स्थानिक भूमीपुत्रांना उध्वस्त करत वाढवण बंदर सत्तेच्या पाशवी बळावर लादण्याची ब्रिटिश वृत्ती सरकारची दिसत आहे. ह्या भूमिपूजन कार्यक्रमाला विरोध दर्शविण्याकरीता बुधवारी तातडीची सभा उत्तन येथे बोलाविण्यात आली होती अशी माहिती मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी दिली.

  सभेला मुंबई, ठाणे आणि पालघर येथील मच्छिमार सहकारी संस्थेचे पदाधिकारी तसेच मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल, कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो, सरचिटणीस संजय कोळी, युवा अध्यक्ष मिल्टन सौदिया, उत्तन वाहतूक संस्थेचे चेअरमन विंसन बांड्या, उत्तन विकास संस्थेचे जॉन गऱ्या , वसई मच्छिमार संस्थेचे चेअरमन नाझरेथ गोडबोले, एडविन केळीखादया, जॉन्सन भयाजी, डिकसन डीमेकर, पास्कु मनभाट, स्टीफन कासुघर, डोंगरी चौक मच्छिमार संस्थेचे विलियम गोविंद, पास्कोल पाटील,  मनोरी मच्छिमार संस्त्थेचे चंद्रकांत फाजींदार,  पाली मच्छिमार संस्थेचे माल्कम कासुकर,  लीन्टन मुनिस, लॉरेन्स घोसाल, सचिन मिरांडा, भाटी मच्छिमार संस्थेचे जितेंद्र कोळी, उत्तन मच्छिमार विविध संस्थेचे अंतोनी ताण्या, किशोर कोळी, भाटेबंदर मच्छिमार संस्थेचे रुपेश डिमेकर आदी उपस्थित होते.

ह्या सभेत भूमिपूजनाचा कार्यक्रमाला एकमताने विरोध करण्याचा व वाढवण किनाऱ्यावर होणाऱ्या सरकारच्या प्रेत यात्रा आंदोलनात मोठ्या संख्येने मच्छिमार सहभागी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे   पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते होणाऱ्या वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यामुळे राज्यातील मच्छिमारांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून ह्या भूमिपूजनाला राज्यातील मच्छिमार कडाडून विरोध करणार असल्याचा निर्धार मिल्टन सौदिया यांनी व्यक्त केला.  वाढवण बंदर उभारणीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ६० पेक्षा जास्त मच्छिमार गावांवर विपरीत परिणाम होणार असून लाखो मच्छिमार आपला व्यवसाय कायमस्वरूपी गमावणार आहेत.  मच्छिमार समाज आजतागायत कधीच विकासाच्या आड आला नाही. परंतु विकासाच्या नावाखाली मच्छिमारांचा व्यवसाय नष्ट  होत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही आणि अश्या विध्वंसक प्रकल्पनां कडाडून विरोध हा समाज शेवट पर्यंत करत राहणार असल्याचे समितीचे संजय कोळी यांनी सांगितले.   मच्छिमारांचे कोण कोणत्या पद्धतीने नुकसान होणार ह्याचे सविस्तर चर्चा करण्यात आली.  ह्या प्रकल्पामुळे फक्त डहाणू तालुक्यातील मच्छिमार बाधित होणार नसून मुंबई, ठाणे, उत्तन, वसई, अर्नाळा, सातपाटी येथील मासेमारी व्यवसाय बाधित होणार आहे. कारण समुद्रातील एकूण ३० हजार एकर क्षेत्र मासेमारीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार असल्याचे भारतीय मत्स्यकी संशोधन संस्थेच्या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले असल्यामुळे ह्या प्रकल्पाला राज्यातील सर्व किनारपट्टीवरून  विरोध होणार असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी सांगितले.  वसई येथील मच्छिमार भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या विरोधात वसई तहसील कार्यालयावर मोर्चा नेणार  आहेत. उत्तन, मढ, मर्वे, गोराई येथील मच्छिमार समुद्रात काळे झेंडे दाखवून विरोध करणार आहेत.