शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

वाढवणं बंदराच्या भूमिपूजना विरोधात राज्यातील सर्व मच्छिमार आंदोलन करणार

By धीरज परब | Updated: August 28, 2024 16:49 IST

मच्छीमारांचा वाढवण बंदरास विरोध असून आमच्या अस्तित्वासाठी शेवट पर्यंत सरकार विरुद्ध लढू असा इशारा देण्यात आला आहे.

धीरज परब

मीरारोड - पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदरचे भूमिपूजन ३० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून त्याला विरोध करण्याचा निर्धार बुधवारी भाईंदरच्या उत्तन येथील मच्छिमार संघटनेच्या बैठकीत करण्यात आला आहे. मच्छीमारांचा वाढवण बंदरास विरोध असून आमच्या अस्तित्वासाठी शेवट पर्यंत सरकार विरुद्ध लढू असा इशारा देण्यात आला आहे.

अदानीसाठी मच्छीमार व स्थानिक भूमीपुत्रांना उध्वस्त करत वाढवण बंदर सत्तेच्या पाशवी बळावर लादण्याची ब्रिटिश वृत्ती सरकारची दिसत आहे. ह्या भूमिपूजन कार्यक्रमाला विरोध दर्शविण्याकरीता बुधवारी तातडीची सभा उत्तन येथे बोलाविण्यात आली होती अशी माहिती मच्छीमार नेते बर्नड डिमेलो यांनी दिली.

  सभेला मुंबई, ठाणे आणि पालघर येथील मच्छिमार सहकारी संस्थेचे पदाधिकारी तसेच मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल, कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो, सरचिटणीस संजय कोळी, युवा अध्यक्ष मिल्टन सौदिया, उत्तन वाहतूक संस्थेचे चेअरमन विंसन बांड्या, उत्तन विकास संस्थेचे जॉन गऱ्या , वसई मच्छिमार संस्थेचे चेअरमन नाझरेथ गोडबोले, एडविन केळीखादया, जॉन्सन भयाजी, डिकसन डीमेकर, पास्कु मनभाट, स्टीफन कासुघर, डोंगरी चौक मच्छिमार संस्थेचे विलियम गोविंद, पास्कोल पाटील,  मनोरी मच्छिमार संस्त्थेचे चंद्रकांत फाजींदार,  पाली मच्छिमार संस्थेचे माल्कम कासुकर,  लीन्टन मुनिस, लॉरेन्स घोसाल, सचिन मिरांडा, भाटी मच्छिमार संस्थेचे जितेंद्र कोळी, उत्तन मच्छिमार विविध संस्थेचे अंतोनी ताण्या, किशोर कोळी, भाटेबंदर मच्छिमार संस्थेचे रुपेश डिमेकर आदी उपस्थित होते.

ह्या सभेत भूमिपूजनाचा कार्यक्रमाला एकमताने विरोध करण्याचा व वाढवण किनाऱ्यावर होणाऱ्या सरकारच्या प्रेत यात्रा आंदोलनात मोठ्या संख्येने मच्छिमार सहभागी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे   पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते होणाऱ्या वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यामुळे राज्यातील मच्छिमारांमध्ये कमालीची नाराजी पसरली असून ह्या भूमिपूजनाला राज्यातील मच्छिमार कडाडून विरोध करणार असल्याचा निर्धार मिल्टन सौदिया यांनी व्यक्त केला.  वाढवण बंदर उभारणीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ६० पेक्षा जास्त मच्छिमार गावांवर विपरीत परिणाम होणार असून लाखो मच्छिमार आपला व्यवसाय कायमस्वरूपी गमावणार आहेत.  मच्छिमार समाज आजतागायत कधीच विकासाच्या आड आला नाही. परंतु विकासाच्या नावाखाली मच्छिमारांचा व्यवसाय नष्ट  होत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही आणि अश्या विध्वंसक प्रकल्पनां कडाडून विरोध हा समाज शेवट पर्यंत करत राहणार असल्याचे समितीचे संजय कोळी यांनी सांगितले.   मच्छिमारांचे कोण कोणत्या पद्धतीने नुकसान होणार ह्याचे सविस्तर चर्चा करण्यात आली.  ह्या प्रकल्पामुळे फक्त डहाणू तालुक्यातील मच्छिमार बाधित होणार नसून मुंबई, ठाणे, उत्तन, वसई, अर्नाळा, सातपाटी येथील मासेमारी व्यवसाय बाधित होणार आहे. कारण समुद्रातील एकूण ३० हजार एकर क्षेत्र मासेमारीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार असल्याचे भारतीय मत्स्यकी संशोधन संस्थेच्या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले असल्यामुळे ह्या प्रकल्पाला राज्यातील सर्व किनारपट्टीवरून  विरोध होणार असल्याचे समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी सांगितले.  वसई येथील मच्छिमार भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या विरोधात वसई तहसील कार्यालयावर मोर्चा नेणार  आहेत. उत्तन, मढ, मर्वे, गोराई येथील मच्छिमार समुद्रात काळे झेंडे दाखवून विरोध करणार आहेत.