शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

ठाण्यातील सहाही विधानसभांमध्ये युतीचाच बोलबाला, आघाडीमध्ये चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:12 IST

विधानसभेत आव्हान : २१ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, राष्ट्रवादीचे मताधिक्य वाढले

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा शिवसेनेचे राजन विचारे यांनी विक्रमी चार लाख १२ हजार १४५ एवढ्या फरकाचे मताधिक्य मिळवून राष्टÑवादीचे आनंद परांजपे यांचा पराभव केला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही आघाडीला शिवसेनेचा गड खेचण्यात अपयश येणार, हे आता जवळजवळ निश्चित मानले जात आहे.

राजन विचारे यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झाले आहे. त्यांची सातवी निवडणूक होती. या निवडणुकीत आधीच त्यांनी आपण साडेतीन ते साडेचार लाख मतांच्या फरकांनी विजयी होऊ, असा दावा केला होता. तो खरा ठरला आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून विचारे यांनी आघाडी घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे चौथ्या फेरीत निर्विवाद ४८ हजारांच्यावर आघाडी घेतल्याने राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. दरम्यान, रात्री ११.४० वाजता ३४ फेºया झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी निकाल जाहीर केला. यावेळी विजयी राजन विचारे यांना तब्बल सात लाख ४० हजार ९६९ मते मिळाली. मागील वेळेस त्यांना विचारे यांना पाच लाख ९५ हजार ३६४ मते मिळाली होती. त्यात यंदा तब्बल एक लाख ४५ हजार ६०५ मतांची वाढ झाल्याचे दिसून आले. एकूण मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास मागील वेळेपेक्षा ६.८४ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तर, दुसºया क्रमांकावरील राष्टÑवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना तीन लाख २८ हजार ८२४ मते मिळाली. मागील वेळेस राष्टÑवादीचे उमेदवार संजीव नाईक यांना तीन लाख १४ हजार ६५ मते मिळाली होती. मागील वेळेच्या तुलनेत राष्टÑवादीचे मताधिक्य हे १४ हजार ७५९ मतांनी वाढल्याचे दिसून आले.

मताधिक्य वाढले असले, तरी मागील वेळेच्या तुलनेत टक्केवारीत घट झाल्याचे दिसून आले. यंदा १.६९ टक्के घट झाल्याचे दिसून आले आहे. तर, मागील वेळेस मनसेच्या मनसेचे अभिजित पानसे यांना ४८ हजार ८६३ आणि आपचे संजीव साने यांना ४१ हजार ४९९ मते मिळाली.

परंतु, यंदा मनसे आणि आप या दोनही पक्षांनी निवडणूक न लढवल्याने त्या दोघांच्या मतांचा फायदा हा राष्टÑवादीच्या उमेदवाराला होऊ शकतो, असा कयास लावला जात होता. परंतु, तो फोल ठरला आहे.

मनसेची मते तर नाहीच नाही, शिवाय आपची मतेही राष्टÑवादीच्या वाट्याला आलेली नाहीत. त्यात, शिवसेनेला भाजपची साथ लाभल्याने त्याचा फायदा विचारे यांना झाल्याचे दिसून आले. परंतु, राष्टÑवादीला काँग्रेसची साथ न लाभल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याचाही फटका राष्टÑवादीला बसल्याचे बोलले जात आहे. आघाडीला मेहनत करावी लागणार हे निश्चित.एकूणच मागील वेळेच्या तुलनेत यंदा जी तीन लाखांहून अधिकची मते वाढली, त्यातील दीड लाखाच्या आसपास मतांचा फायदा हा शिवसेनेच्याच उमेदवाराला अधिक झाल्याचे दिसून आले. याचाच अर्थ नवमतदारांनी पुन्हा मोदींवर विश्वास टाकल्याचे दिसून आले असून त्यामुळेच विचारेंच्या मतांतही वाढ झाल्याचे यंदाच्या मोजणात दिसत आहे.

या निवडणुकीत मनसे किंवा आपचे उमेदवार नसले, तरी वंचित बहुजन आघाडी यात उतरल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, त्याचा फटका नवी मुंबईत राष्टÑवादीलाच बसल्याचे दिसून आले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी हे नवी मुंबईतील स्थायिक असल्याने त्यांना या पट्ट्यातूनच अधिक मते मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.शिवसेनेने ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, मीरा-भार्इंदर, ऐरोली आणि बेलापूर या सहा विधानसभेत पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येणार आहे. युतीच्या हातून हे सर्व विधानसभा मतदारसंघ काढण्यासाठी आघाडीला कसरत करावी लागणार आहे. मागील वेळेस १३ हजार १७४ मतदारांनी नोटाला पसंती दिली.