शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

नितीन वारिंगे हत्येतील सर्व आरोपी निर्दोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 00:50 IST

अंबरनाथमधील शिवसेना नगरसेवक नितीन वारिंगे यांची २०११ मध्ये हत्या करण्यात आली.

अंबरनाथ : अंबरनाथमधील शिवसेना नगरसेवक नितीन वारिंगे यांची २०११ मध्ये हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी सहा आरोपींना अटक झाली होती. या प्रकरणाचा निकाल गुरुवारी कल्याण न्यायालयात लागला. या सहाही आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दाेष सोडण्यात आले आहे. त्यातील एका आरोपीचा याआधीच अपघातात मृत्यू झाला आहे.वारिंगे यांचा भाचा समीर गोसावी याची २००९ मध्ये पेट्रोलपंपावर हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात भालचंद्र भोईर आणि त्यांच्या तीन भावांसह काही कुटुंबीयांना तुरुंगात जावे लागले होते. या हत्येचा पाठपुरावा वारिंगे करत असल्याने त्यांचा काटा काढण्यासाठी भोईर याने हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ६ मे २०११ रोजी वारिंगे हे आपल्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी करत असताना दोघांनी त्यांच्यावर गोळीबार करून पळ काढला. या हल्ल्यात वारिंगे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर वारिंगे यांचे कोणासोबत वैर होते, याची चाचपणी करण्यात आली. या तपासात भालचंद्र या तुरुंगात असलेल्या आरोपीवर संशय आला. या प्रकरणात पोलिसांनी तपास करताना महेंद्र केवट आणि दत्तात्रेय गायकवाड या दोघांना अटक केली.या दोघांनीच वारिंगे यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. भालचंद्र याने तुरुंगात असताना त्याच्यासोबत असलेल्या सुमित येरुणकर याच्यासोबत मैत्री वाढवली. वारिंगे यांना मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तर, सुमितवर महेंद्र आणि दत्तात्रेय यांच्या मदतीने हत्येचा आरोप होता. या मारेकऱ्यांना नितीन ठाणगे आणि संतोष यादव या रिक्षाचालकाने मदत केल्याचा आरोप केला होता.>सात वर्षांनंतर निकालया प्रकरणात नितीन हा जामिनावर सुटलेला असताना अपघातात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा निकाल सात वर्षांनंतर कल्याण न्यायालयाने दिला आहे. वारिंगे यांच्या हत्या प्रकरणात सबळ पुरावा नसल्याने सर्व सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली.