शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:58 IST

रायता येथील उल्हास नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद; कल्याण-मुरबाड-नगर वाहतूक अन्य मार्गाने, १२ गावांचा संपर्क तुटला, शेतीचे प्रचंड नुकसान

म्हारळ : पावसाने शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा जोर धरल्याने कल्याण तालुक्यातील १० ते १२ गावांचा संपर्क तुटला आहे. उल्हास नदीची पातळी वाढल्याने रायता पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कल्याण-मुरबाड महामार्ग आठवड्यात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक गोवेली-आंबिवली-शहाडहून कल्याण, अशी वळवण्यात आली.पावसामुळे आपटी, मांजर्ली, दहागाव, पोई, केळणी, वाहोली, बापसई, मामनोली, रायते, दहिवली, चौरे, अंताडे आदी गावांचा संपर्क तुटला. दुसरीकडे कल्याण-मुरबाड महामार्ग कांबा ते टाटा पॉवर हाउसदरम्यान दोनतीन फूट पाणी साचले होते. परिणामी, वाहतुकीवर परिणाम झाला. उल्हास नदीची पातळी वाढल्याने आणि भरतीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने कल्याण-मुरबाड महामार्गावरील कल्याणकडून येणारी वाहतूक म्हारळ येथेच थांबण्यात आली. ही वाहतूक उल्हासनगरमार्गे वळवण्यात आली. तर, मुरबाडहून येणारी वाहतूक गोवेलीहून टिटवाळा-आंबिवली-शहाडमार्गे कल्याण अशी वळवण्यात आली. प्रशासनाने नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. शासकीय यंत्रणेसोबत एनडीआरएफची टीमही अलर्ट होती.म्हारळ येथील सखल भागांतील म्हारळ सोसायटी, शिवानीनगर, बोडके चाळ, अण्णासाहेब पाटीलनगर, साईदीप कॉलनीत सकाळी पाणी भरले. त्यामुळे गटारांतील पाणी नागरिकांच्या घराघरांमध्ये घुसल्याने रहिवाशांचे हाल झाले. म्हारळमध्ये कचराकुंड्या नसल्याने ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. त्यामुळे वारंवार पावसाचे पाणी तुंबत असल्याने रोगराई पसरण्याचा धोका वाढतच असल्याचे मनसे कार्यकर्ते विवेक गंभीरराव यांनी सांगितले.शहाड येथेही सकाळी मोहना रोडवर दोन फूट पाणी आले. गटाराचे पाणी परिसरातील गुरु दर्शन, मधुसूदन, अंबिकानगर सोसायट्यांमध्ये गुडघाभर पाणी साठले होते. शिवाय, म्हारळ येथे वाहतूक थांबवल्याने शहाड पुलावर वाहनांच्या रांगा पाहावयास मिळाल्या. त्यामुळे शहाड-बिर्ला गेट येथे प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली. दरम्यान, उल्हास नदीच्या पुराचे पाणी आपटी, मांजर्ली, आणे आणि रायते गावांतील शेतात शिरल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.मी स्वत: परिसरात फिरून परिस्थितीची पाहणी करीत आहे. एनडीआरएफची टीमही सतर्क आहे.- दीपक आकडे, तहसीलदार, कल्याण

टॅग्स :Rainपाऊस