शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 23:58 IST

रायता येथील उल्हास नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद; कल्याण-मुरबाड-नगर वाहतूक अन्य मार्गाने, १२ गावांचा संपर्क तुटला, शेतीचे प्रचंड नुकसान

म्हारळ : पावसाने शुक्रवारी रात्रीपासून पुन्हा जोर धरल्याने कल्याण तालुक्यातील १० ते १२ गावांचा संपर्क तुटला आहे. उल्हास नदीची पातळी वाढल्याने रायता पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कल्याण-मुरबाड महामार्ग आठवड्यात तिसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक गोवेली-आंबिवली-शहाडहून कल्याण, अशी वळवण्यात आली.पावसामुळे आपटी, मांजर्ली, दहागाव, पोई, केळणी, वाहोली, बापसई, मामनोली, रायते, दहिवली, चौरे, अंताडे आदी गावांचा संपर्क तुटला. दुसरीकडे कल्याण-मुरबाड महामार्ग कांबा ते टाटा पॉवर हाउसदरम्यान दोनतीन फूट पाणी साचले होते. परिणामी, वाहतुकीवर परिणाम झाला. उल्हास नदीची पातळी वाढल्याने आणि भरतीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने कल्याण-मुरबाड महामार्गावरील कल्याणकडून येणारी वाहतूक म्हारळ येथेच थांबण्यात आली. ही वाहतूक उल्हासनगरमार्गे वळवण्यात आली. तर, मुरबाडहून येणारी वाहतूक गोवेलीहून टिटवाळा-आंबिवली-शहाडमार्गे कल्याण अशी वळवण्यात आली. प्रशासनाने नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. शासकीय यंत्रणेसोबत एनडीआरएफची टीमही अलर्ट होती.म्हारळ येथील सखल भागांतील म्हारळ सोसायटी, शिवानीनगर, बोडके चाळ, अण्णासाहेब पाटीलनगर, साईदीप कॉलनीत सकाळी पाणी भरले. त्यामुळे गटारांतील पाणी नागरिकांच्या घराघरांमध्ये घुसल्याने रहिवाशांचे हाल झाले. म्हारळमध्ये कचराकुंड्या नसल्याने ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. त्यामुळे वारंवार पावसाचे पाणी तुंबत असल्याने रोगराई पसरण्याचा धोका वाढतच असल्याचे मनसे कार्यकर्ते विवेक गंभीरराव यांनी सांगितले.शहाड येथेही सकाळी मोहना रोडवर दोन फूट पाणी आले. गटाराचे पाणी परिसरातील गुरु दर्शन, मधुसूदन, अंबिकानगर सोसायट्यांमध्ये गुडघाभर पाणी साठले होते. शिवाय, म्हारळ येथे वाहतूक थांबवल्याने शहाड पुलावर वाहनांच्या रांगा पाहावयास मिळाल्या. त्यामुळे शहाड-बिर्ला गेट येथे प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली. दरम्यान, उल्हास नदीच्या पुराचे पाणी आपटी, मांजर्ली, आणे आणि रायते गावांतील शेतात शिरल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.मी स्वत: परिसरात फिरून परिस्थितीची पाहणी करीत आहे. एनडीआरएफची टीमही सतर्क आहे.- दीपक आकडे, तहसीलदार, कल्याण

टॅग्स :Rainपाऊस