शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

माजिवडा, मानपाडा, नौपाडासह कळव्यात धोक्याची घंटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:43 IST

ठाणे : वर्षभरापासून ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी-अधिक प्रमाणात वाढताना दिसत आहे; परंतु आता मार्च महिन्यातही दिवसाला २०० ...

ठाणे : वर्षभरापासून ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी-अधिक प्रमाणात वाढताना दिसत आहे; परंतु आता मार्च महिन्यातही दिवसाला २०० हून अधिक रुग्ण रोज नव्याने सापडत असल्याने महापालिकेची चिंता वाढू लागली आहे. यामध्ये माजिवडा - मानपाडा, कळवा, वर्तकनगर, नौपाडा या भागातही पुन्हा कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. असे असले तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यात महापालिकेला कुठेतरी यश येताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यात केवळ २७ तर मार्च महिन्यात पहिल्या सात दिवसात सात जणांचाच मृत्यू झाला आहे. रुग्ण वाढत असताना ते बरे होण्याचे प्रमाणही ९६ टक्क्यांच्या आसपास आहे.

गेल्या मागील मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ठाण्यात आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत ६३ हजार ६८१ रुग्ण बाधित झाले आहेत. तर तब्बल एक हजार ४०० जणांचा मृत्यू झाला असून, ६० हजार ३९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या एक हजार ९४८ एवढी आहे. सुरुवातीला कोरोनावर काय उपचार करावेत, मृत्युदर कसा रोखावा, यासाठी महापालिकेच्या यंत्रणेबरोबर खासगी यंत्रणादेखील चाचपडत होती; परंतु आता कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी ते बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण जास्त असल्याची माहिती महापालिकेने दिली. गेल्या मार्च महिन्यात रोज रुग्ण आढळण्याचे प्रमाण सरासरी १० एवढे होते, तर बरे होण्याचे प्रमाण हे २ एवढेच होते. तर आताच्या मार्च महिन्यात रोज रुग्ण आढळण्याचे सरासरी प्रमाण १८७ च्या आसपास असले तरी ते बरे होण्याचे प्रमाण हे १४६ एवढे आहे. तर मागील एप्रिल महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९.७३ टक्के एवढे होते. तेच आता मार्च महिन्यात ९५.०९ टक्के एवढे असल्याचे दिसत आहे. मागील एप्रिल महिन्यात १७ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर हे प्रमाण जूनमध्ये सरासरी ३१७ वर गेले होते. तर आता हेच प्रमाण ७ च्या आसपास दिसत आहे.

महापालिकेने आजही कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी केलेले नाही. मागील वर्षी एप्रिल महिन्यात रोज सरासरी १९३ चाचण्या केल्या जात होत्या. तर जेव्हा रुग्णांची संख्या वाढत गेली तेव्हा हे प्रमाण दिवसाला साडेपाच हजारच्या घरात गेले होते. तर आजघडीला दिवसाला सरासरी चार हजार ६३९ चाचण्या केल्या जात आहेत. मागील एप्रिल महिन्यात रुग्णवाढीचा दर हा सरासरी ६.६० टक्के होता. जून महिन्यात तो २०.८४ टक्क्यांच्या घरात गेला होता. तर आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात तो ५.५८ टक्के एवढा आहे. मागील वर्षी एप्रिल महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी अर्थात डबलिंग रेट ८.२५ दिवसांचा होता. तोच जूनमध्ये ३२.३६ दिवसांवर गेला होता. आता मार्च महिन्यात हाच दर २६५ दिवसांवर आला आहे; परंतु जानेवारी महिन्यात डबलिंगचा दर ५०८ दिवसांवर गेला होता. तो आता खाली आल्याचे दिसत आहे, तर गेल्या एप्रिल महिन्यात मृत्यूदर हा ५.४८ टक्के होता. तोच आज ०.७५ टक्के एवढा आहे. कोरोना रोखण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज असून, पुन्हा आपले कोरोना सेंटरही सज्ज केले आहेत.

चौकट - मागील वर्षी माजिवडा - मानपाडा, वागळे, लोकमान्य सावरकर नगर, कळवा, नौपाडा, उथळसर, वर्तकनगर येथे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत होते. मधल्या काळात महापालिकेने येथे केलेल्या उपाययोजनांमुळे येथील नव्याने रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले होते; परंतु आता पुन्हा माजिवडा - मानपाडा, नौपाडा, वर्तकनगर, नौपाडा आदी भागात कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पालिकेने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.