शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
3
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
4
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
5
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
6
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
7
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
8
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
9
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
10
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
11
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
12
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
13
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
14
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
15
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
16
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
17
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
18
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
19
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
20
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना

रेतीबंदरनजीकच्या ट्रॅकवर हवा ओव्हर ब्रीज!

By admin | Updated: August 28, 2015 00:12 IST

शहराचा द एन्ड समजल्या जाणाऱ्या रेतीबंदर रोडनजीक गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढलेली आहे. त्या पाठोपाठ तेथून शहरभर व बाहेर जाणा-या वाहनांचीही संख्या वाढली आहे.

- अनिकेत घमंडी,  डोंबिवलीशहराचा द एन्ड समजल्या जाणाऱ्या रेतीबंदर रोडनजीक गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढलेली आहे. त्या पाठोपाठ तेथून शहरभर व बाहेर जाणा-या वाहनांचीही संख्या वाढली आहे. असे असूनही या ठिकाणच्या दिवा-वसई मार्गावरील रेल्वेचे फाटक ही वाहनचालकांसाठी मोठी समस्या ठरले आहे. या ठिकाणाहून धावणा-या मालगाड्यांसह अन्य लांबपल्याच्या गाड्या व मेमू ट्रेन आदींची वाहतूक सुरु असते. परिणामी अनेकदा गेट बंद झाल्याने वाहनांची कोंडी होते. त्यासाठी या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूलाची (रोड ओव्हर ब्रीज) ची नितांत गरज आहे.काही दक्ष नागरिकांनी अंडरपासचाही पर्याय सुचवला, परंतू नजीकच खाडी असल्याने तो पर्याय तितकासा योग्य नाही. मोठागांव-ठाकुर्लीचे रहिवासी या समस्येने त्रस्त आहेत. पूर्वी या ठिकाणी पाण्याची समस्या होती, त्यासाठी रेल्वे लाइननजीकच विहिर असून तेथून पाणी भरण्यात येत असे. आता तेथे स्वतंत्र पाण्याची टाकी बांधण्यात आल्याने ती समस्या बहुतांशी प्रमाणात संपुष्टात आली. याच ठिकाणी खाडीलगतच स्मशानभूमी असून सध्या तिचे पॅगोडा पद्धतीने नूतनीकरण होत आहे. रस्ते तुलनेने चांगले असले तरीही रेल्वे फाटकाच्या ठिकाणी गेट बंद झाल्यावरही छोट्या जागेतून दुचाकी कसाबसा मार्ग काढते, पण ते जीवघेणे ठरू शकते, मात्र त्याकडे नगरसेवकांचे लक्ष नाही. याच ठिकाणाहून शहरातील विशेषत: पश्चिमेकडील बहुतांशी घरगुती व सार्वजनिक मोठी मंडळांचे व पूर्वेकडील निवडक मंडळांचे गणपती विसर्जन याच ठिकाणी होते. त्या मंडळांनाही या फाटकामुळे अडथळा होतो. परिणामी रात्री-मध्यरात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरु असते. ही स्थिती बदलण्यासाठीही तेथे रेल्वे ओव्हर ब्रीज होणे गरजेचे आहे. बहुतांशी शाळकरी मुले, त्यांचे पालक गेट बंद असतांनाही केवळ वेळ पाळण्यासाठी रुळ ओलांडून मार्गस्थ होतात. कचरा उचलण्यासाठी मोठी गाडी येथे येऊ शकत नाही, त्यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांना चाळीच्या ठिकाणी व्यक्तीश: डस्टबिन देण्यात आले आहे. आता बहुतांशी प्रमाणात घंटागाडी येत असते. त्यामुळे काही ठिकाणचा अपवाद वगळता कच-याची समस्या कायम आहे. खाडी किना-यालगतच गणेश घाट आहे, त्याचेही काम सुरु असून सुशोभिकरण करण्यात येत आहे. तेथून नजीकच्या गावांमध्ये जाण्यासाठी खासगी बोटी चालविण्यात येतात, साधारणत: माणशी १० रुपये आकारुन ही सुविधा देण्यात येते. परंतू प्रवाशांच्या सुरक्षेची मात्र कोणतीही हमी देण्यात येत नाही. ही सुविधा सुरक्षित करून मगच ती महापालिकेतर्फे उपलब्ध करून द्यावी, अशी जनतेची मागणी आहे.