शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

रेतीबंदरनजीकच्या ट्रॅकवर हवा ओव्हर ब्रीज!

By admin | Updated: August 28, 2015 00:12 IST

शहराचा द एन्ड समजल्या जाणाऱ्या रेतीबंदर रोडनजीक गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढलेली आहे. त्या पाठोपाठ तेथून शहरभर व बाहेर जाणा-या वाहनांचीही संख्या वाढली आहे.

- अनिकेत घमंडी,  डोंबिवलीशहराचा द एन्ड समजल्या जाणाऱ्या रेतीबंदर रोडनजीक गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढलेली आहे. त्या पाठोपाठ तेथून शहरभर व बाहेर जाणा-या वाहनांचीही संख्या वाढली आहे. असे असूनही या ठिकाणच्या दिवा-वसई मार्गावरील रेल्वेचे फाटक ही वाहनचालकांसाठी मोठी समस्या ठरले आहे. या ठिकाणाहून धावणा-या मालगाड्यांसह अन्य लांबपल्याच्या गाड्या व मेमू ट्रेन आदींची वाहतूक सुरु असते. परिणामी अनेकदा गेट बंद झाल्याने वाहनांची कोंडी होते. त्यासाठी या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूलाची (रोड ओव्हर ब्रीज) ची नितांत गरज आहे.काही दक्ष नागरिकांनी अंडरपासचाही पर्याय सुचवला, परंतू नजीकच खाडी असल्याने तो पर्याय तितकासा योग्य नाही. मोठागांव-ठाकुर्लीचे रहिवासी या समस्येने त्रस्त आहेत. पूर्वी या ठिकाणी पाण्याची समस्या होती, त्यासाठी रेल्वे लाइननजीकच विहिर असून तेथून पाणी भरण्यात येत असे. आता तेथे स्वतंत्र पाण्याची टाकी बांधण्यात आल्याने ती समस्या बहुतांशी प्रमाणात संपुष्टात आली. याच ठिकाणी खाडीलगतच स्मशानभूमी असून सध्या तिचे पॅगोडा पद्धतीने नूतनीकरण होत आहे. रस्ते तुलनेने चांगले असले तरीही रेल्वे फाटकाच्या ठिकाणी गेट बंद झाल्यावरही छोट्या जागेतून दुचाकी कसाबसा मार्ग काढते, पण ते जीवघेणे ठरू शकते, मात्र त्याकडे नगरसेवकांचे लक्ष नाही. याच ठिकाणाहून शहरातील विशेषत: पश्चिमेकडील बहुतांशी घरगुती व सार्वजनिक मोठी मंडळांचे व पूर्वेकडील निवडक मंडळांचे गणपती विसर्जन याच ठिकाणी होते. त्या मंडळांनाही या फाटकामुळे अडथळा होतो. परिणामी रात्री-मध्यरात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरु असते. ही स्थिती बदलण्यासाठीही तेथे रेल्वे ओव्हर ब्रीज होणे गरजेचे आहे. बहुतांशी शाळकरी मुले, त्यांचे पालक गेट बंद असतांनाही केवळ वेळ पाळण्यासाठी रुळ ओलांडून मार्गस्थ होतात. कचरा उचलण्यासाठी मोठी गाडी येथे येऊ शकत नाही, त्यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांना चाळीच्या ठिकाणी व्यक्तीश: डस्टबिन देण्यात आले आहे. आता बहुतांशी प्रमाणात घंटागाडी येत असते. त्यामुळे काही ठिकाणचा अपवाद वगळता कच-याची समस्या कायम आहे. खाडी किना-यालगतच गणेश घाट आहे, त्याचेही काम सुरु असून सुशोभिकरण करण्यात येत आहे. तेथून नजीकच्या गावांमध्ये जाण्यासाठी खासगी बोटी चालविण्यात येतात, साधारणत: माणशी १० रुपये आकारुन ही सुविधा देण्यात येते. परंतू प्रवाशांच्या सुरक्षेची मात्र कोणतीही हमी देण्यात येत नाही. ही सुविधा सुरक्षित करून मगच ती महापालिकेतर्फे उपलब्ध करून द्यावी, अशी जनतेची मागणी आहे.