शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

'निवडणुकीतील व्होटबँकेसाठी दिल्लीत आंदोलन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:56 IST

माधव भंडारी यांचा आरोप : नोटाबंदीच्या पोटदुखीतूनही नागरिकत्व कायद्याबाबत दिशाभूल

कल्याण : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि येऊ घातलेला राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) कायदा हा अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही. तो बाहेरच्या देशांतून आलेल्या नागरिकांसाठी लागू केलेला आहे. नोटाबंदीमुळे झालेल्या नुकसानीच्या पोटदुखीतून विरोधकांनी या कायद्याबाबत गैरसमज पसरवण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत या कायद्याविरोधात सुरू असलेले आंदोलन हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्होटबँकेसाठी सुरू केल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते माधव भंडारी यांनी रविवारी कल्याणमध्ये केला.स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ आणि कल्याण विकास फाउंडेशनतर्फे झालेल्या ३१ व्या अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचा सांगता सोहळा पश्चिमेतील टिळक चौक परिसरातील कॅप्टन ओक हायस्कूल सभागृहात पार पडला. यात ‘सीएए-एनआरसी’ समज-गैरसमज या विषयावर भंडारी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते आणि सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे, संमेलनाचे अध्यक्ष सच्चिदानंद शेवडे, स्वागताध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार, माजी शिक्षक आमदार प्रभाकर संत उपस्थित होते.

भंडारी म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा कायदा मानवतावादी आहे. घटनेच्या चौकटीत राहूनच कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. कायदा अल्पसंख्याकांच्या विरोधात असल्याचा गैरसमज विरोधक पसरवत आहेत. देशात धर्माचा आधार घेऊन भेदभाव करता येणार नाही, हे स्पष्ट करणाऱ्या घटनेच्या १४ व्या कलमाविरोधात हा कायदा असल्याची अफवाही पसरवली जात आहे.नोटाबंदीच्या काळात ज्यांना आपला राग आणि दु:ख व्यक्त करता आले नाही, तेच या कायद्यांच्या बाबतीत खोटेनाटे पसरवत आहेत. दरम्यान, पूर्वी काय बोललो, याच्याशी त्यांनी बांधीलकी ठेवली असती, तर ते आज आमच्याबरोबर असते, असे सांगत भंडारी यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला.सावरकरांच्या विरोधामागे जातीचे राजकारण : पोंक्षेच्स्वा. सावरकरांची लढाई ही मनुष्यजातीच्या स्वातंत्र्यासाठी होती. त्यांनी जात हा शब्द मिटवण्यासाठी आपले आयुष्य वेचले. पण, त्यांना जातीच्या पठडीत बांधून ठेवले गेल्याची खंत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली. नाव वेगळे असते, तर विरोध झाला नसता. यामागे जातीच्या मतांचे राजकारण दडले आहे.च्मी स्पष्ट बोलणारा आहे, जे पटत नाही त्याबाबत मी व्यक्त होतोच, असे सांगत शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या सूत्रामध्ये कोणी फार काळ टिकू शकत नाही. एकमेकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला की, भयंकर मैत्रीची निर्मिती होते, असे मतही त्यांनी सध्याच्या सत्तेच्या समीकरणाबाबत व्यक्त केले.च्अस्पृश्यता मिटवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य मोठे आहेच, पण सावरकरांनी आपल्या जातीच्या विचारसरणीविरोधात जाऊन अस्पृश्यता मिटवण्यासाठी काम केले, ते मला इतरांपेक्षा काकणभर श्रेष्ठ वाटते, असेही यावेळी पोंक्षे म्हणाले.‘त्यांची’ गत भुंकणाºया कुत्र्यासारखी! : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल जाणीवपूर्वक घाणेरडे गैरसमज पसरवले जात आहेत. ज्याप्रमाणे रस्त्यावरून जाणाºया हत्तीवर कुत्रे भुंकतात, तशी गत सावरकर विरोधकांची झाल्याचा घणाघात संमेलनाचे अध्यक्ष तथा सावरकर अभ्यासक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी यावेळी केला.

टॅग्स :BJPभाजपाthaneठाणेdelhiदिल्ली