शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

पुनर्वसनाला फेरीवाल्यांचा विरोध'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:48 IST

कल्याण-डोंबिवली शहरांतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी उशिरा का होईना केडीएमसीने पावले उचलली आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी उशिरा का होईना केडीएमसीने पावले उचलली आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात अडीच टक्के फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी प्रभागांमध्ये पांढरे पट्टे मारले जात आहेत. परंतु, डोंबिवलीत फेरीवाला संघटनांनी या धोरणाचे स्वागत केले असताना कल्याणमध्ये मात्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांच्या दालनात गुरुवारी विशेष बैठक होणार आहे. त्यात कोणता तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे.कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये फेरीवाला अतिक्रमणाचा मुद्दा गाजत आहे. फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आजवर कोणतीही ठोस कृती केडीएमसीकडून झालेली नव्हती. एल्फिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार फेरीवाल्यांना रेल्वेस्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास मनाई आहे. केडीएमसी हद्दीतील अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर इतरत्र कारवाई सुरू असताना डोंबिवली पूर्वेकडील रेल्वेस्थानक परिसरात मात्र फेरीवाल्यांची मुजोरी कायम आहे. यात महापालिकेच्या पथकांसह फेरीवाला हटवण्यासाठी आग्रही असलेली मनसेही थंड पडल्याचे चित्र आहे. केडीएमसीविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची मनसेची घोषणाही हवेत विरली आहे.केडीएमसीने निश्चित केलेल्या ३७ हॉकर्स झोनमध्ये स्थलांतरित करा, अन्यथा तोपर्यंत आम्ही आहोत तिथेच व्यवसाय करू, असा पवित्रा रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांनी घेतला आहे. परंतु, आता केडीएमसीने उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पुनर्वसनाला सुरुवात केली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात अडीच टक्के फेरीवाले असतील, असे धोरण राबवण्यास प्रारंभ केला आहे. त्यादृष्टीने डोंबिवली पूर्वेकडील टाटा पॉवर लाइनखालील रस्ता तसेच अन्य प्रभागातील रस्त्यांवर पांढरे पट्टे मारले आहेत. तेथे लवकरच फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. डोंबिवलीतील कष्टकरी हॉकर्स भाजीविक्रेता संघटनेने या धोरणाचे स्वागत केले आहे. रेल्वेस्थानक परिसरात कारवाई चालू असताना आम्ही पुनर्वसनाची मागणी लावून धरली होती. महापालिकेने आता जी कृती सुरू केली आहे, ती निश्चितच स्वागतार्ह आहे. सर्व फेरीवाल्यांना व्यवसाय करता यावा, हीच आमची मागणी असल्याचे संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी सांगितले.