शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

पुनर्वसनाला फेरीवाल्यांचा विरोध'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:48 IST

कल्याण-डोंबिवली शहरांतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी उशिरा का होईना केडीएमसीने पावले उचलली आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी उशिरा का होईना केडीएमसीने पावले उचलली आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात अडीच टक्के फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी प्रभागांमध्ये पांढरे पट्टे मारले जात आहेत. परंतु, डोंबिवलीत फेरीवाला संघटनांनी या धोरणाचे स्वागत केले असताना कल्याणमध्ये मात्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांच्या दालनात गुरुवारी विशेष बैठक होणार आहे. त्यात कोणता तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे.कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये फेरीवाला अतिक्रमणाचा मुद्दा गाजत आहे. फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आजवर कोणतीही ठोस कृती केडीएमसीकडून झालेली नव्हती. एल्फिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार फेरीवाल्यांना रेल्वेस्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास मनाई आहे. केडीएमसी हद्दीतील अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर इतरत्र कारवाई सुरू असताना डोंबिवली पूर्वेकडील रेल्वेस्थानक परिसरात मात्र फेरीवाल्यांची मुजोरी कायम आहे. यात महापालिकेच्या पथकांसह फेरीवाला हटवण्यासाठी आग्रही असलेली मनसेही थंड पडल्याचे चित्र आहे. केडीएमसीविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची मनसेची घोषणाही हवेत विरली आहे.केडीएमसीने निश्चित केलेल्या ३७ हॉकर्स झोनमध्ये स्थलांतरित करा, अन्यथा तोपर्यंत आम्ही आहोत तिथेच व्यवसाय करू, असा पवित्रा रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांनी घेतला आहे. परंतु, आता केडीएमसीने उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पुनर्वसनाला सुरुवात केली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात अडीच टक्के फेरीवाले असतील, असे धोरण राबवण्यास प्रारंभ केला आहे. त्यादृष्टीने डोंबिवली पूर्वेकडील टाटा पॉवर लाइनखालील रस्ता तसेच अन्य प्रभागातील रस्त्यांवर पांढरे पट्टे मारले आहेत. तेथे लवकरच फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. डोंबिवलीतील कष्टकरी हॉकर्स भाजीविक्रेता संघटनेने या धोरणाचे स्वागत केले आहे. रेल्वेस्थानक परिसरात कारवाई चालू असताना आम्ही पुनर्वसनाची मागणी लावून धरली होती. महापालिकेने आता जी कृती सुरू केली आहे, ती निश्चितच स्वागतार्ह आहे. सर्व फेरीवाल्यांना व्यवसाय करता यावा, हीच आमची मागणी असल्याचे संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी सांगितले.