शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाला फेरीवाल्यांचा विरोध'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:48 IST

कल्याण-डोंबिवली शहरांतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी उशिरा का होईना केडीएमसीने पावले उचलली आहेत.

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांतील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी उशिरा का होईना केडीएमसीने पावले उचलली आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात अडीच टक्के फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी प्रभागांमध्ये पांढरे पट्टे मारले जात आहेत. परंतु, डोंबिवलीत फेरीवाला संघटनांनी या धोरणाचे स्वागत केले असताना कल्याणमध्ये मात्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांच्या दालनात गुरुवारी विशेष बैठक होणार आहे. त्यात कोणता तोडगा निघतो, याकडे लक्ष लागले आहे.कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये फेरीवाला अतिक्रमणाचा मुद्दा गाजत आहे. फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आजवर कोणतीही ठोस कृती केडीएमसीकडून झालेली नव्हती. एल्फिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार फेरीवाल्यांना रेल्वेस्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास मनाई आहे. केडीएमसी हद्दीतील अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर इतरत्र कारवाई सुरू असताना डोंबिवली पूर्वेकडील रेल्वेस्थानक परिसरात मात्र फेरीवाल्यांची मुजोरी कायम आहे. यात महापालिकेच्या पथकांसह फेरीवाला हटवण्यासाठी आग्रही असलेली मनसेही थंड पडल्याचे चित्र आहे. केडीएमसीविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची मनसेची घोषणाही हवेत विरली आहे.केडीएमसीने निश्चित केलेल्या ३७ हॉकर्स झोनमध्ये स्थलांतरित करा, अन्यथा तोपर्यंत आम्ही आहोत तिथेच व्यवसाय करू, असा पवित्रा रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांनी घेतला आहे. परंतु, आता केडीएमसीने उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पुनर्वसनाला सुरुवात केली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात तेथील लोकसंख्येच्या प्रमाणात अडीच टक्के फेरीवाले असतील, असे धोरण राबवण्यास प्रारंभ केला आहे. त्यादृष्टीने डोंबिवली पूर्वेकडील टाटा पॉवर लाइनखालील रस्ता तसेच अन्य प्रभागातील रस्त्यांवर पांढरे पट्टे मारले आहेत. तेथे लवकरच फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. डोंबिवलीतील कष्टकरी हॉकर्स भाजीविक्रेता संघटनेने या धोरणाचे स्वागत केले आहे. रेल्वेस्थानक परिसरात कारवाई चालू असताना आम्ही पुनर्वसनाची मागणी लावून धरली होती. महापालिकेने आता जी कृती सुरू केली आहे, ती निश्चितच स्वागतार्ह आहे. सर्व फेरीवाल्यांना व्यवसाय करता यावा, हीच आमची मागणी असल्याचे संघटनेचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी सांगितले.