शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विरोधात 'सेवा नाही तर कर नाही’ लाक्षणिक मूक धरणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 16:15 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे कर भरणा-या नागरिकांना सेवा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ ‘सेवा नाही तर कर नाही’ असा निर्धार व्यक्त करणारे जागरुक नागरिकांचे आंदोलन आज महापालिका मुख्यालयासमोरील शंकरराव चौकात करण्यात आले.

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे कर भरणा-या नागरिकांना सेवा पुरविल्या जात नसल्याच्या निषेधार्थ ‘सेवा नाही तर कर नाही’ असा निर्धार व्यक्त करणारे जागरुक नागरिकांचे आंदोलन आज महापालिका मुख्यालयासमोरील शंकरराव चौकात करण्यात आले. एक तास मूक धरणे आंदोलन करून प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवलीतील नागरिक महापालिकेच्या सेवा न पुरविण्याच्या वृत्तीच्या विरोधात एकवटले आहे. त्यासाठी नागरिकांनी बैठका घेतल्या. तसेच महापालिका मुख्यालयात आयुक्तांनी भेट नाकारल्याप्रकरणी ठिय्या आंदोलन केले. मात्र सेवा नाही तर कर नाही ही आंदोलनाची टॅगलाइन ठरविण्यात आली आहे. माहिती अधिकाराचे कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी या आंदोलनासाठी पुढाकार घेत 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीचे औचित्य साधून महापालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा महापालिका प्रशासनास दिला होता. त्यानुसार आज सकाळी शंकरराव चौकात एक तासाचे मूक धरणे देण्यात आले. या मूक धरणे आंदोलनात घाणेकर यांच्यासह माजी नगरसेवक इफ्तेखार खान, उमेश बोरगावकर, उमंग सामाजिक संस्थेचे गफ्फार शेख, काँग्रेस महिला आघाडीच्या कांचन कुलकर्णी, जागरुक नागरिक शैलेंद्र नेहरे, शैलेश जोशी, मदन शंकलेषा, संदीप देसाई आदी सहभागी झाले होते. घाणेकर यांनी सांगितले की, सेवा नाही तर कर नाही या आंदोलनास आजपासून सुरुवात झालेली आहे. हे आंदोलन ठिकठिकाणी करण्यात येणार आहे. आज सायंकाळी कल्याण पूर्व भागातील ड प्रभाग कार्यालयापासून लोकग्रामपर्यंत मेणबत्ती घेऊन कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे. कर भरणा-या नागरिकांना महापालिकेकडून सेवा पुरविल्या जात नसल्याने आयुक्तांना भेटीची वेळ मागितली होती. आयुक्तांनी भेटीची वेळ दिली नाही. तेव्हा ठिय्या आंदोलन केले. त्यावर आयुक्तांनी 29 सप्टेंबर रोजी भेटीची वेळ दिली होती. पुन्हा त्यांना काही काम आल्याने त्यांना 29 सप्टेंबरच्या तारखेला भेटता आले नाही. नव्याने 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता आयुक्त आंदोलनाविषयी चर्चेसाठी भेटणार आहेत. आज गांधी जयंती दिनाची सुट्टी असल्याने निवेदन देण्याचा विषय आज नव्हताच असे घाणोकर यांनी स्पष्ट केले.