शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

अखेर आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर शहरातील हॉटेल, बारवाल्यांनी बंद घेतला मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 16:33 IST

ठाण्यातील सुमारे ५०० हॉटेल व्यावसायिकांनी पुकारलेला बंद अखेर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला आहे. आयुक्तांनी पॅनेल्टी चार्जेस कमी करण्याचे आश्वासन दिल्याने हा बंद मागे घेण्यात आला.

ठळक मुद्देदोन दिवस बंद होते शहरातील हॉटेल, बारदिड तासांच्या चर्चेनंतर निघाला तोडगा

ठाणे - महापालिकेच्या अग्नीशमन दलाने नोटीस देवूनही त्यावर कोणतीही कार्यवाही न करणा ऱ्या ८६ हॉटेल व बारपैकी ३६ हॉटेल व बार सील करण्याची कारवाई अग्नीशमन विभागाने केली होती. परंतु त्यानंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवार पासून शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी दुपारी चार वाजल्यापासून बंद पुकारला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही बंदची हाक कायम ठेवण्यात आली होती. परंतु बुधवारी दुपारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अखेर हॉटेल व्याविसायिकांनी बंद मागे घेतला आहे. आयुक्तांनी अ‍ॅडमेस्ट्रेटीव्ह टॅक्स कमी करण्याचे आश्वास दिल्यानंतर आणि सील केलेले हॉटेल तत्काळ खुले करण्याचे आदेश दिल्याची माहिती हॉटेल, बार असोसिएशनने दिली आहे. त्यानंतर अखेर हा बंद मागे घेण्यात आला आहे.               अग्निशमन दलाचा ना हरकत दाखला नसलेल्या ठाणे शहरातील एकूण ४२६ हॉटेल्स, बार, लाऊंज यांना यापूर्वी अग्निशमन दलाच्यावतीने नोटीसी देण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास ८० आस्थापनांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्याने ती हॉटेल्स नियमित करण्यात आली आहेत. तसेच २६० प्रकरणे शहर विकास विभागाकडे नियमित करण्याच्या कार्यवाहीसाठी सादर करण्यात आली आहेत. परंतु नोटीस दिल्यानंतरही त्यावर काहीही कार्यवाही न केलेले एकूण ८६ हॉटेल्स, बार, लाऊंज तीन दिवसांत सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दिले होते. त्यानंतर शनिवारी पासून मंगळवार पर्यंत ३६ हॉटेल, बार सील करण्यात आले होते. परंतु, अग्निशमन दलाच्या जाचक अटीच्या विरोधात आणि पॅनल्टी चार्जेस कमी करण्याच्या उद्देशाने शहरातील सुमारे ५०० हॉटेल, बारवाल्यांनी मंगळवार पासून बंदची हाक दिली होती.दरम्यान बुधवारी दुपारी ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्रात आयुक्त आणि हॉटेल, बार असोसिएशनच्या शिष्ठ मंडळाची एक बैठक पार पडली. या बैठकीला अग्निशमन विभाग, आस्थापना आणि शहर विकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तब्बल दिड तास ही बैठक चालली. त्यानंतर आयुक्तांनी अ‍ॅडमेस्ट्रेटीव्ह टॅक्स कमी करण्याचे आश्वासन दिले. तसेच ज्या हॉटेल, बारवाल्यांनी अग्निशमन दलाच्या कागदपत्रांची पुर्तता केलेली नसले त्यांनी ती पुर्तता करावी असेही आश्वासन दिले. याशिवाय ज्या हॉटेल बारला आतापर्यंत सील ठोकण्यात आले होते, ते सील काढण्याचे आदेशही दिले असल्याची माहिती हॉटेल बार असोसिएशनने दिली.

आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बरोबर समाधानकारक चर्चा झाली असून त्यांनी पॅनेल्टी कमी करण्याचे आश्वासन दिल्याने आणि सील ठोकण्यात आलेले हॉटेल तत्काळ सुरु करण्याचे आश्वासन दिल्याने हा बंद मागे घेण्यात आला आहे.(रत्नाकर शेट्टी - हॉटेल, बार असोसिएशनचे जेष्ठ पदाधिकारी)हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा होऊन त्यांच्या मागणीचा विचार करुन जे चार्जेस लावण्यात आले होते. त्याचे आता स्लॅब करण्यात आले असून, पूर्वीचे असलेले चार्जेस कमी करण्यात आले आहेत. तसेच फायर एनओसी बाबतही पुर्तता करण्याच्या सुचना त्यांना देण्यात आल्या आहेत.(संजीव जयस्वाल - आयुक्त, ठामपा)असे असणार चार्जेसचे स्लॅबयापूर्वी थेट २५ लाखापर्यंत अ‍ॅडमेस्ट्रेटीव्ह टॅक्स भरण्याच्या नोटीसा हॉटेल, बारवाल्यांना बजावण्यात आल्या होत्या. परंतु केवळ ठाणे महापालिका हद्दीतच अशा पध्दतीने ही वसुली केली जात असल्याचा मुद्दा हॉटेल व्यावसायिकांनी उपस्थित केला होता. त्यानुसार आता ५०० स्केअर फुटापर्यंत - २५ हजार, ५०० ते दोन हजार पर्यंत - १ लाख, दोन हजार ते पाच हजारपर्यंत - २ लाख आणि पाच हजार स्केअरफुटाच्या पुढील बांधकामासाठी ५ लाख असे स्लॅब आता तयार करण्यात आले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाhotelहॉटेल