शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

विस्कळीतपणाच्या ‘शोभायात्रे’नंतर ढोल पथकांना नो-एण्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 03:36 IST

यंदा नववर्ष स्वागतयात्रेत काही ढोलपथकांनी यात्रेसोबत चालताना वादन करण्यामध्ये वेळ खर्च केल्याने शोभायात्रेत विस्कळीतपणा आल्याने पुढील वर्षीच्या यात्रेत ढोल-ताशा पथकांना ‘नो एण्ट्री’, अशी भूमिका श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केली.

अनिकेत घमंडी डोंबिवली : यंदा नववर्ष स्वागतयात्रेत काही ढोलपथकांनी यात्रेसोबत चालताना वादन करण्यामध्ये वेळ खर्च केल्याने शोभायात्रेत विस्कळीतपणा आल्याने पुढील वर्षीच्या यात्रेत ढोल-ताशा पथकांना ‘नो एण्ट्री’, अशी भूमिका श्री गणेश मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांनी ‘लोकमत’कडे स्पष्ट केली.पुढील वर्षी लेझीम, झांज आणि ध्वज पथकांना संधी देण्याचा मानस असून तसा प्रस्ताव संस्थानच्या आगामी बैठकीत मांडणार असल्याचे संस्थानचे विश्वस्त प्रवीण दुधे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, शोभायात्रेला १९ वर्षे झाली. आधी पुणे-मावळ आदी भागातून ढोल पथके बोलावली जायची. त्यानंतर शोभायात्रेमुळेच डोंबिवलीत ढोल पथकांची बांधणी झाली. आता ती पथके स्थिरस्थावर झाली आहेत. ढोलपथक हे ‘स्थिर’ वादन असून लेझीम, झांज, ध्वज पथक हे ‘चल’ वादन आहे. त्यामुळे ती शोभायात्रेसोबत सहजपणे पुढे जातील, वेळ वाचेल, विस्कळीतपणा येणार नाही. तसेच ही संस्कृतीदेखील महाराष्ट्राची शान व परंपराच आहे. त्यामुळे आगामी वर्षाकरिता शाळाशाळांमधून लेझीम, झांज पथकांना यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले जाईल. बहुतांश विश्वस्त, सदस्य, पदाधिकारी ही भूमिका मान्य करतील, असा विश्वास दुधे यांनी व्यक्त केला. ढोलपथकांचा प्रत्यक्ष यात्रेत सहभाग नसला तरी त्यांनी एका ठिकाणी वादन करावे. यासाठी त्या पथकांच्या प्रमुखांसमवेत समन्वय साधला जाणार आहे. ढोल पथकांचा यात्रेत सहभाग नसेल, तर ध्वनिप्रदूषणालाही आळा बसेल, असे ते म्हणाले. लेझीम, झांज पथकांचा आवाज ढोल-ताशांच्या तुलनेत कमी असतो, तसेच त्यात जास्तीतजास्त जणांना सहभागी होता येते.>अर्धा तास वाया गेल्याचे नोंदवले मतयंदाची शोभायात्रा ही भागशाळेपासून वेळेत निघाली, पण पूर्व-पश्चिम उड्डाणपूल येथे शोभायात्रेची शृंखला तुटली. पश्चिमेला द्वारका हॉटेलनजीकच्या चौकात एक पथक वादन करत बसले. त्यामुळे हे घडले.शोभायात्रेचे एक टोक पश्चिमेकडून पूर्वेला रामनगरभागात आले, पण शृंखला तुटल्याने यात्रा विस्कळीत झाली. संस्थानचे दामले आणि दुधे यांची विस्कळीत यात्रे पूर्ववत करताना धावपळ झाली.आयोजक आणि ढोल पथक यांच्यात भरयात्रेदरम्यान चढ्या आवाजात चर्चा झाली, अखेरीस पथकाने शोभायात्रेसोबत चालण्याचा प्रयत्न केला. यामुळे यात्रेचा अर्ध्या तासाहून अधिक वेळ गेला. त्यामुळे आगामी वर्षापासून शोभायात्रेत ढोल पथकांना प्रवेश न देण्याच्या निर्णयावर दामले यांनी शिक्कामोर्तब केले.